शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

५५ कोटी धमकावून नेणारे मोकाटच

By admin | Updated: June 7, 2015 02:19 IST

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या सहा जिल्हा कार्यालयांमधून तब्बल ५५ कोटी १८ लाख रुपये काढण्यात आले.

यदु जोशी,  मुंबईसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या सहा जिल्हा कार्यालयांमधून तब्बल ५५ कोटी १८ लाख रुपये काढण्यात आले. ही रक्कम काही माणसांनी आमच्याकडून तत्काळ नेली, असे या कार्यालयांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आता तपासात सांगितल्याने संपूर्ण प्रकरणाचे गूढ वाढले आहे. आम्ही मुख्यालयातून आलेल्या आदेशानुसार रोखीने किंवा आरटीजीएसद्वारे आमच्या नावावर पाठविण्यात आलेली रक्कम काढली पण ती आम्ही घेतली नाही, असे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. आम्ही रक्कम बँकेतून काढायचो, महामंडळाच्या मुख्यालयातून आलो आहोत ती रक्कम आम्हाला द्या, असे धमकावले जायचे आणि आम्ही ती त्यांना द्यायचो. हे लोक आमच्याकडून पैसे घेत असल्याचे बँकांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आले असल्याचे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. काही अधिकाऱ्यांनी महामंडळाचे तत्कालिन अध्यक्ष रमेश कदम यांच्या आदेशाने व्यवहार केल्याचे म्हटले आहे. या १३ अधिकारी/कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. मात्र ते या अफरातफरीत असल्याचे स्पष्ट दिसत असूनही कुणालाच अजून अटक करण्यात आलेली नाही. शिवाय, बेअरर चेकद्वारे कोट्यवधी रुपये काढले कसे गेले?संबंधित बँकांमधील अधिकाऱ्यांनी या प्रकाराला मान्यता तरी कशी दिली, याची चौकशी होण्याची गरज आहे. बीडसारख्या ठिकाणी एका शाखेतून एकावेळी ५ कोटी रुपये रोखीने काढण्याचे प्रकरण धक्कादायक आहे. रोखीने वा आरटीजीएसद्वारे द्यावयाच्या रकमेबाबतचे नियम बँकांनी पाळले नाहीत असे दिसते. घोटाळ्यांची महामंडळाची कबुली- महामंडळात २०१२-१३ ते २०१४-१५ या काळात आर्थिक अनियमितता, अफरातफर झाली, ही वस्तूस्थिती आहे, असे कबुल करीत अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी आज लोकमतला पत्र पाठविले आणि लोकमतच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केले. या गैरव्यवहारांची चौकशी तीन स्तरावर सुरू करण्यात आली आहे. - बीड, जालना, परभणी व बुलडाणा जिल्ह्णात अधिकारी/ कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पण, महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापकांनी संबंधित पोलीस ठाण्यामध्ये कागदपत्रांसह पत्र दिले व पाठपुरावाही केला तरी भंडारा व हिंगोली जिल्ह्णात पोलिसांनी अद्याप गुन्हे दाखल केलेले नाहीत, असे महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी म्हटले आहे. अशी काढली रक्कमजिल्हाकाढण्यात आलेली रक्कम (आकडे कोटी रु.)रोख आरटीजीएसएकूणजिल्हा व्यवस्थापक कार्यालय सचिव बीड ५.०७१.५२ ६.५९ बापुराव महादेव नेटके श्रावण श्रीपती हातागळेजालना८.०८०.३६८.४४ मधुकर बाबुराव वैद्य अशोक एकनाथ खंदारेपरभणी३.३००.३६३.६६ एस.जी.गायकवाड सुषमा कसबे/सी.व्ही.डोंगरेहिंगोली०.५००.३००.८० एस.जी.गायकवाड सुजित शंकरराव पाटीलअतिरिक्त कार्यभार बुलडाणा६.१९४.८१११.००प्रल्हाद तानबाजी पवारविजय जाधव भंडारा२४.६९- २४.६९प्रल्हाद तानबाजी पवार शारदा केवलराम कांबळे एकूण४७.८३७.३५५५.१८या १३ अधिकारी निलंबित करण्यात आले आहे. मात्र या व्यवहारांमागील भ्रष्टाचारी मोकाटच आहेत. ते धमकावणारे लोक कोण होते, ते कोणासाठी पैसा घेऊन गेले याची चौकशी होण्याची गरज आहे.