शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील ५२५ गावांना दुष्काळाची झळ

By admin | Updated: November 20, 2014 01:12 IST

दुष्काळात फक्त मराठवाडाच होरपळतो असे नाही. नागपूर विभागातील २०२९ गावेही या संकटाला तोंड देत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यातील ५२५ गावांनाही दुष्काळाची झळ पोहोचली

आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी : विभागातील २०२९ गावांचा समावेशनागपूर : दुष्काळात फक्त मराठवाडाच होरपळतो असे नाही. नागपूर विभागातील २०२९ गावेही या संकटाला तोंड देत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यातील ५२५ गावांनाही दुष्काळाची झळ पोहोचली असून तेथील शेतकऱ्यांना सरकारी मदतीची अपेक्षा आहे.सलग गत दोन वर्षापासून निसर्गाच्या दुष्टचक्रात राज्यातील शेतकरी सापडला असून केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या मदतीनंतरही तो सावरण्याची शक्यता नाही. यंदा पावसाळा विलंबाने सुरू झाल्याने त्याचा फटका कृषी हंगामाला बसला. त्याची सर्वाधिक झळ मराठवाड्याला बसली असली तरी त्यातून विदर्भ विशेषत: नागपूर विभाग सुटलेला नाही. या विभागातील सहा जिल्ह्यातील २०२९ गावांची हंगामी आणेवारी (पैसेवारी)५० टक्केपेक्षा कमी असून शेतकरी दुष्काळाला तोंड देत आहेत. यात नागपूर जिल्ह्यातील ५२५, वर्धा जिल्ह्यातील १०४९, चंद्रपूर जिल्ह्यातील ४४८ आणि भंडारा जिल्ह्यातील ७ गावांचा समावेश आहे. सर्वाधिक झळ ही विभागातील वर्धा जिल्ह्याला बसली असून त्यानंतर नागपूर जिल्ह्याचा क्रमांक लागतो.नागपूर जिल्ह्याची स्थितीनागपूर जिल्ह्यात एकूण १९५३ गावे आहेत. यापैकी खरीप पिकांची लागवड झालेल्या गावांची संख्या १८४४ आहे. यापैकी १७९५ गावांची हंगामी आणेवारी (पैसेवारी) जाहीर करण्यात आली असून ५२५ गावांची आणेवारी ही ५० टक्केपेक्षा कमी आहे. याचाच अर्थ या गावात दुष्काळसदृश्य स्थिती आहे. उर्वरित १२७० गावांची आणेवारी ही ५० पैशांपेक्षा अधिक आहे. बुडित क्षेत्रातील, प्रकल्पात गेलेली किंवा अकृषक असलेल्या एकूण १४४ गावांची आणेवारी जाहीर करण्यात आली नाही.मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी राज्यात दुष्काळाचे संकट असल्याचे जाहीर केले होते व त्यासाठी केंद्राकडे मदत मागणार असल्याचेही स्पष्ट केले होते. त्यांच्या गृह जिल्ह्यातील ५०० वर गावे दुष्काळाशी झुंज देत असल्याने ही मदत लवकर मिळेल, अशी अपेक्षा आहे. विशेष म्हणजे दुष्काळग्रस्त भागांना आर्थिक मदत करण्यात अडचणीची ठरणारी व्यक्तिगत पंचनाम्याची पारंपरिक पद्धत मुख्यमंत्र्यांनी दूर केली आहे. पंचनाम्यासाठी गावपातळीवरचा निकष यापुढे लागू करण्यात येणार आहे. (ज्या गावातील आणेवारी ५० टक्केपेक्षा कमी आहे अशी) त्याचा फायदा शेतकऱ्यांना यावेळी होऊ शकतो.(प्रतिनिधी)