शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील ५२५ गावांना दुष्काळाची झळ

By admin | Updated: November 20, 2014 01:12 IST

दुष्काळात फक्त मराठवाडाच होरपळतो असे नाही. नागपूर विभागातील २०२९ गावेही या संकटाला तोंड देत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यातील ५२५ गावांनाही दुष्काळाची झळ पोहोचली

आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी : विभागातील २०२९ गावांचा समावेशनागपूर : दुष्काळात फक्त मराठवाडाच होरपळतो असे नाही. नागपूर विभागातील २०२९ गावेही या संकटाला तोंड देत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यातील ५२५ गावांनाही दुष्काळाची झळ पोहोचली असून तेथील शेतकऱ्यांना सरकारी मदतीची अपेक्षा आहे.सलग गत दोन वर्षापासून निसर्गाच्या दुष्टचक्रात राज्यातील शेतकरी सापडला असून केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या मदतीनंतरही तो सावरण्याची शक्यता नाही. यंदा पावसाळा विलंबाने सुरू झाल्याने त्याचा फटका कृषी हंगामाला बसला. त्याची सर्वाधिक झळ मराठवाड्याला बसली असली तरी त्यातून विदर्भ विशेषत: नागपूर विभाग सुटलेला नाही. या विभागातील सहा जिल्ह्यातील २०२९ गावांची हंगामी आणेवारी (पैसेवारी)५० टक्केपेक्षा कमी असून शेतकरी दुष्काळाला तोंड देत आहेत. यात नागपूर जिल्ह्यातील ५२५, वर्धा जिल्ह्यातील १०४९, चंद्रपूर जिल्ह्यातील ४४८ आणि भंडारा जिल्ह्यातील ७ गावांचा समावेश आहे. सर्वाधिक झळ ही विभागातील वर्धा जिल्ह्याला बसली असून त्यानंतर नागपूर जिल्ह्याचा क्रमांक लागतो.नागपूर जिल्ह्याची स्थितीनागपूर जिल्ह्यात एकूण १९५३ गावे आहेत. यापैकी खरीप पिकांची लागवड झालेल्या गावांची संख्या १८४४ आहे. यापैकी १७९५ गावांची हंगामी आणेवारी (पैसेवारी) जाहीर करण्यात आली असून ५२५ गावांची आणेवारी ही ५० टक्केपेक्षा कमी आहे. याचाच अर्थ या गावात दुष्काळसदृश्य स्थिती आहे. उर्वरित १२७० गावांची आणेवारी ही ५० पैशांपेक्षा अधिक आहे. बुडित क्षेत्रातील, प्रकल्पात गेलेली किंवा अकृषक असलेल्या एकूण १४४ गावांची आणेवारी जाहीर करण्यात आली नाही.मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी राज्यात दुष्काळाचे संकट असल्याचे जाहीर केले होते व त्यासाठी केंद्राकडे मदत मागणार असल्याचेही स्पष्ट केले होते. त्यांच्या गृह जिल्ह्यातील ५०० वर गावे दुष्काळाशी झुंज देत असल्याने ही मदत लवकर मिळेल, अशी अपेक्षा आहे. विशेष म्हणजे दुष्काळग्रस्त भागांना आर्थिक मदत करण्यात अडचणीची ठरणारी व्यक्तिगत पंचनाम्याची पारंपरिक पद्धत मुख्यमंत्र्यांनी दूर केली आहे. पंचनाम्यासाठी गावपातळीवरचा निकष यापुढे लागू करण्यात येणार आहे. (ज्या गावातील आणेवारी ५० टक्केपेक्षा कमी आहे अशी) त्याचा फायदा शेतकऱ्यांना यावेळी होऊ शकतो.(प्रतिनिधी)