शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

रायगड किल्ला संवर्धनासाठी ५२० कोटी मंजूर

By admin | Updated: August 23, 2016 02:51 IST

रायगड किल्ला जतन संवर्धनाच्या ५२० कोटी रुपयांच्या आराखड्यास सोमवारी रायगड जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

अलिबाग : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड किल्ल्यावर घोषित केलेला रायगड किल्ला जतन संवर्धनाच्या ५२० कोटी रुपयांच्या आराखड्यास सोमवारी रायगड जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. हा आराखडा पुढे मुख्य सचिवांच्या समितीकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी दिली. मेहता यांच्या अध्यक्षतेखाली रायगड जिल्हास्तरीय समितीची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते.रायगड किल्ला संवर्धन आराखड्यामध्ये प्रामुख्याने रायगड किल्ल्यावरील प्राचीन वास्तूचे संवर्धन, तत्कालीन पध्दतीच्या मार्गिकेचे बांधकाम, पर्यटकांच्या सोयी तसेच सुरक्षेच्या बाबी, राजमाता जिजाऊंचा वाडा तसेच राजमाता जिजाऊंची समाधी आदि ठिकाणच्या दुरु स्ती व निगडीत कामे, रायगड परिक्र मा मार्ग, रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी रज्जू मार्ग या व अन्य विविध कामांचा समावेश आहे. यावेळी आमदार भरत गोगावले यांनीही काही कामांबाबत महत्वपूर्ण सूचना केल्या. उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांनी प्रास्ताविक करून आराखड्याची माहिती उपस्थितांना दिली. अवयवदान मोहीम महत्वाची असून अनेकांना जीवनदान देणारी आहे. त्यामुळे या मोहिमेची जनजागृती करावी व लोकांपर्यंत याचे महत्व सर्व माध्यमांतून पोहोचवावे असे आवाहन पालकमंत्री मेहता यांनी यावेळी केले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.एस.नागावकर यांनी अवयवदान मोहिमेबद्दल बैठकीत माहिती दिली. दि. ३०, ३१ आॅगस्ट व १ सप्टेंबर असे तीन दिवस ही मोहीम जिल्ह्यात सर्वत्र राबविण्यात येणार असून प्रत्येक तालुक्यातून कमीत कमी एक हजार अर्ज भरु न घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या मोहिमेत लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी यांनीही सहभाग नोंदवावा असे आ. मनोहर भोईर यांनी सुचवले त्यास जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनीही अनुमोदन दर्शविले. यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे, आमदार प्रशांत ठाकूर, भरत गोगावले, सुभाष पाटील आदि उपस्थित होते.निमंत्रित सदस्यांच्या अनुपस्थितीतच बैठक : सभागृहातील गर्दीमुळे या बैठकीकरिता निमंत्रितांना सभागृहाबाहेर थांबावे लागले. निमंत्रित सदस्यांच्या अनुपस्थितीत बैठक झाली आणि त्यानंतर निमंत्रित सदस्यांच्या उपस्थितीबाबत स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. केवळ सरकारी सोपस्कार म्हणून ही बैठक उरकण्यात आल्याची प्रतिक्रिया निमंत्रित सदस्यांनी देवून, तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.