शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
7
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
8
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
9
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
10
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
11
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
12
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
13
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
14
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
15
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
16
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
17
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
18
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
19
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
20
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान

तब्बल ५२ वर्षांनंतर बरी झाली जखम

By admin | Updated: April 26, 2017 01:53 IST

आजाराचे वेळीच योग्य निदान झाले नाही तर संपूर्ण आयुष्यभर दुखण्याचा त्रास सहन करावा लागतो. याचा वेदनादायी अनुभव वसईतील मेरी पीटर (६४) यांना आला.

राजू काळे / भार्इंदरआजाराचे वेळीच योग्य निदान झाले नाही तर संपूर्ण आयुष्यभर दुखण्याचा त्रास सहन करावा लागतो. याचा वेदनादायी अनुभव वसईतील मेरी पीटर (६४) यांना आला. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांच्या उजव्या पायाला एक छोटीशी जखम झाली. मात्र त्यावर परिणामकारक उपचार न झाल्याने त्या जखमेतून सतत रक्तमिश्रित स्राव होत होता. अनेकदा उपचार करुनही ती जखम बरी होत नव्हती. अखेर मीरारोड येथील खासगी इस्पितळात अस्थिव्यंगतज्ज्ञ डॉ. निखिल अग्रवाल यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली आणि मेरी यांची भळभळती जखम बरी झाली. गेल्या ५२ वर्षांत तब्बल १०० हून अधिक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. परंतु त्यांची जखम बरी झाली नाही. ६२ वर्षांच्या मेरी यांना हा आजार कमालीचा त्रासदायक ठरु लागला. त्यांच्या सततच्या आजाराला व शस्त्रक्रियांना कुटुंबही कंटाळले होते. त्यांच्या मुलांनी दोन वर्षांपूर्वी मीरारोड येथील एक खासगी रुग्णालयातील अस्थिव्यंग तज्ज्ञ डॉ. अग्रवाल यांची भेट घेऊन त्यांना आपल्या आईच्या आजाराची माहिती दिली. मेरी यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची एमआरआय चाचणी करण्यात आली. तसेच रक्ताचे नमुने तपासण्यात आले. मेरी यांच्या उजव्या मांडीच्या हाडांमध्ये जंतुसंसर्ग झाल्याचे निदान झाले. डॉ. अग्रवाल यांनी मेरी यांच्या पायावर तत्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.शस्त्रक्रियेद्वारे त्यांच्या मांडीच्या हाडामध्ये ‘अँटीबॉयोटिक लेन्ड सिमेंट रॉड’ बसवण्यात आला. त्यांच्या पायातून होणारा रक्तस्राव थांबल्यानंतर त्यांच्या मांडीत बसवण्यात आलेला रॉड अलीकडेच काढण्यात आला. मेरी यांच्या पायाची जखम पूर्णपणे बरी झाल्याचे डॉ. अग्रवाल यांनी सांगितले.