शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ५२ वर्षांनंतर बरी झाली जखम

By admin | Updated: April 26, 2017 01:53 IST

आजाराचे वेळीच योग्य निदान झाले नाही तर संपूर्ण आयुष्यभर दुखण्याचा त्रास सहन करावा लागतो. याचा वेदनादायी अनुभव वसईतील मेरी पीटर (६४) यांना आला.

राजू काळे / भार्इंदरआजाराचे वेळीच योग्य निदान झाले नाही तर संपूर्ण आयुष्यभर दुखण्याचा त्रास सहन करावा लागतो. याचा वेदनादायी अनुभव वसईतील मेरी पीटर (६४) यांना आला. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांच्या उजव्या पायाला एक छोटीशी जखम झाली. मात्र त्यावर परिणामकारक उपचार न झाल्याने त्या जखमेतून सतत रक्तमिश्रित स्राव होत होता. अनेकदा उपचार करुनही ती जखम बरी होत नव्हती. अखेर मीरारोड येथील खासगी इस्पितळात अस्थिव्यंगतज्ज्ञ डॉ. निखिल अग्रवाल यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली आणि मेरी यांची भळभळती जखम बरी झाली. गेल्या ५२ वर्षांत तब्बल १०० हून अधिक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. परंतु त्यांची जखम बरी झाली नाही. ६२ वर्षांच्या मेरी यांना हा आजार कमालीचा त्रासदायक ठरु लागला. त्यांच्या सततच्या आजाराला व शस्त्रक्रियांना कुटुंबही कंटाळले होते. त्यांच्या मुलांनी दोन वर्षांपूर्वी मीरारोड येथील एक खासगी रुग्णालयातील अस्थिव्यंग तज्ज्ञ डॉ. अग्रवाल यांची भेट घेऊन त्यांना आपल्या आईच्या आजाराची माहिती दिली. मेरी यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची एमआरआय चाचणी करण्यात आली. तसेच रक्ताचे नमुने तपासण्यात आले. मेरी यांच्या उजव्या मांडीच्या हाडांमध्ये जंतुसंसर्ग झाल्याचे निदान झाले. डॉ. अग्रवाल यांनी मेरी यांच्या पायावर तत्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.शस्त्रक्रियेद्वारे त्यांच्या मांडीच्या हाडामध्ये ‘अँटीबॉयोटिक लेन्ड सिमेंट रॉड’ बसवण्यात आला. त्यांच्या पायातून होणारा रक्तस्राव थांबल्यानंतर त्यांच्या मांडीत बसवण्यात आलेला रॉड अलीकडेच काढण्यात आला. मेरी यांच्या पायाची जखम पूर्णपणे बरी झाल्याचे डॉ. अग्रवाल यांनी सांगितले.