शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

तब्बल ५२ वर्षांनंतर बरी झाली जखम

By admin | Updated: April 26, 2017 01:53 IST

आजाराचे वेळीच योग्य निदान झाले नाही तर संपूर्ण आयुष्यभर दुखण्याचा त्रास सहन करावा लागतो. याचा वेदनादायी अनुभव वसईतील मेरी पीटर (६४) यांना आला.

राजू काळे / भार्इंदरआजाराचे वेळीच योग्य निदान झाले नाही तर संपूर्ण आयुष्यभर दुखण्याचा त्रास सहन करावा लागतो. याचा वेदनादायी अनुभव वसईतील मेरी पीटर (६४) यांना आला. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांच्या उजव्या पायाला एक छोटीशी जखम झाली. मात्र त्यावर परिणामकारक उपचार न झाल्याने त्या जखमेतून सतत रक्तमिश्रित स्राव होत होता. अनेकदा उपचार करुनही ती जखम बरी होत नव्हती. अखेर मीरारोड येथील खासगी इस्पितळात अस्थिव्यंगतज्ज्ञ डॉ. निखिल अग्रवाल यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली आणि मेरी यांची भळभळती जखम बरी झाली. गेल्या ५२ वर्षांत तब्बल १०० हून अधिक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. परंतु त्यांची जखम बरी झाली नाही. ६२ वर्षांच्या मेरी यांना हा आजार कमालीचा त्रासदायक ठरु लागला. त्यांच्या सततच्या आजाराला व शस्त्रक्रियांना कुटुंबही कंटाळले होते. त्यांच्या मुलांनी दोन वर्षांपूर्वी मीरारोड येथील एक खासगी रुग्णालयातील अस्थिव्यंग तज्ज्ञ डॉ. अग्रवाल यांची भेट घेऊन त्यांना आपल्या आईच्या आजाराची माहिती दिली. मेरी यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची एमआरआय चाचणी करण्यात आली. तसेच रक्ताचे नमुने तपासण्यात आले. मेरी यांच्या उजव्या मांडीच्या हाडांमध्ये जंतुसंसर्ग झाल्याचे निदान झाले. डॉ. अग्रवाल यांनी मेरी यांच्या पायावर तत्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.शस्त्रक्रियेद्वारे त्यांच्या मांडीच्या हाडामध्ये ‘अँटीबॉयोटिक लेन्ड सिमेंट रॉड’ बसवण्यात आला. त्यांच्या पायातून होणारा रक्तस्राव थांबल्यानंतर त्यांच्या मांडीत बसवण्यात आलेला रॉड अलीकडेच काढण्यात आला. मेरी यांच्या पायाची जखम पूर्णपणे बरी झाल्याचे डॉ. अग्रवाल यांनी सांगितले.