शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

गरजू विद्यार्थ्यांसाठी ५१ लाखांचा निधी

By admin | Updated: March 7, 2016 02:05 IST

ग्रामीण भागातून शिकण्यासाठी बीएमसीसी महाविद्यालयात येणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांची भोजनाची सोय व्हावी, यासाठी माजी विद्यार्थ्यांतर्फे वर्षभरात ५१ लाख रुपयांचा निधी जमा करण्यात येईल.

पुणे : ग्रामीण भागातून शिकण्यासाठी बीएमसीसी महाविद्यालयात येणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांची भोजनाची सोय व्हावी, यासाठी माजी विद्यार्थ्यांतर्फे वर्षभरात ५१ लाख रुपयांचा निधी जमा करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या भोजनाबरोबरच माजी विद्यार्थी संघटनेच्या कार्यक्रमांसाठी हा निधी वापरला जाईल, अशी घोषणा पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली. बीएमसीसी माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने आयोजित बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात बापट यांनी रविवारी ही घोषणा करताना या निधीमध्ये स्वत:चे एक लाख रुपये आणि दिवंगत बंधू दीपक बापट यांच्या नावे एक लाख रुपये असे एकूण दोन लाख रुपये देणार असल्याचे जाहीर केले.मेळाव्यात बापट यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते शांतिलाल मुथा, राज्य सहकारी बॅँक फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, व्यवस्थापन शास्त्रातील तज्ज्ञ अशोक जोशी यांना ‘प्राइड आॅफ बीएमसीसी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर अभिनेता अमेय जोग याला बाळासाहेब सरपोतदार पुरस्कार, गायक जितेंद्र भुरुक यांना सुहास कुलकर्णी पुरस्कार, सुहास धारणे यांना वरुणराज भिडे पुरस्कार, दिलीप ओक व संजय चितळे यांना व्यापार भूषण पुरस्कार आणि संजय टकले यांना कांता मगर पुरस्कार देण्यात आला. संगणक अभ्यासक अच्युत गोडबोले यांचे ‘भारतीय अर्थव्यवस्था : आव्हाने आणि संधी’ विषयावर व्याख्यान झाले. गोडबोले म्हणाले, ‘‘जागतिकीकरणातील बदल स्वीकारताना आंतरराष्ट्रीय स्तरावरील बदलही लक्षात घ्यायला हवेत. देशात सक्षम विकास साधताना शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा यावर अधिक गुंतवणूक व्हावी, यासाठी सरकारवर दबाव टाकणे आवश्यक आहे.’’ चिं. ग. वैद्य यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)