शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

विधानसभा निवडणुकीचे ५०८ कोटींचे बजेट!

By admin | Updated: October 13, 2014 05:12 IST

राज्यातील विधानसभा निवडणुकीची संपूर्ण तयारी झाली आहे. प्रशासकीय स्तरावर सर्व यंत्रणा निवडणुकीसाठी सज्ज आहे. २८८ मतदारसंघांतील निवडणुकीचे नियोजन निवडणूक विभागाने केले आहे.

रूपेश उत्तरवार , यवतमाळविधानसभा निवडणुकीत केवळ राजकीय पक्षांचेच बिग बजेट असते असे नाही. विधानसभा निवडणुका निर्भय वातावरणात व्हाव्यात यासाठी निवडणूक विभागाला २८८ मतदार संघासाठी ५०८ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. त्यातील २५४ कोटींचा निधी वळता झाला आहे. मात्र, एवढाच निधी आणखी या निवडणुकीसाठी लागणार आहे.राज्यातील विधानसभा निवडणुकीची संपूर्ण तयारी झाली आहे. प्रशासकीय स्तरावर सर्व यंत्रणा निवडणुकीसाठी सज्ज आहे. २८८ मतदारसंघांतील निवडणुकीचे नियोजन निवडणूक विभागाने केले आहे. त्यानुसार राज्याला निवडणुकीचा खर्च ५०८ कोटी रुपये येणार आहे. यातील अर्धा निधी सामान्य प्रशासन विभागाने जिल्ह्यातील निवडणूक विभागाकडे वळता झाला आहे. प्रशिक्षणापासून ते मतमोजणीपर्यंत प्रत्येक कर्मचाऱ्याला मानधन दिले जाते. यासोबतच निवडणुकीसाठी परराज्यातून मतदान यंत्र आणावे लागले. त्यासाठी वाहतुकीचा खर्च झाला. या मशीन प्रत्येक गावातील मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी वाहनांची आवश्यकता असते. त्या वाहनांनाही भाडे द्यावे लागते. उपद्रवी केंद्रावरच्या हालचाली टिपण्यासाठी आणि निवडणूक काळात उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी व्हीडीओ चित्रीकरण केले जाते. यासाठी कॅमेरे भाड्याने घेतले जातात. कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, भोजन, बॅरिकेटस्, भत्ते, मतदार जागृतीचे फलक, सुरक्षा, निरीक्षक, सुक्ष्म निरीक्षक यांच्यावर हा खर्च होतो.