शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

अन्ननलिकेच्या कॅन्सरचे ५० हजार रुग्ण

By admin | Updated: August 17, 2014 00:51 IST

देशात दरवर्षी अन्ननलिकेच्या कॅन्सरचे ५० हजार नवीन रुग्ण आढळून येतात. विशेष म्हणजे यातील बहुसंख्य रुग्ण ‘अ‍ॅडव्हॉन्स स्टेज’मध्ये येतात. यामुळे त्यांच्यावर उपचार करणे कठीण जाते,

‘एमएचसीआय-एआरओआय-२०१४’ : पहिल्यांदाच एकत्र आले कर्करोग विकीरण तज्ज्ञनागपूर : देशात दरवर्षी अन्ननलिकेच्या कॅन्सरचे ५० हजार नवीन रुग्ण आढळून येतात. विशेष म्हणजे यातील बहुसंख्य रुग्ण ‘अ‍ॅडव्हॉन्स स्टेज’मध्ये येतात. यामुळे त्यांच्यावर उपचार करणे कठीण जाते, अशी माहिती डॉ. बी.के. मोहंती यांनी दिली.महाराष्ट्र चॅप्टर अ‍ॅण्ड सेंट्रल इंडिया एआरओआय याच्यावतीने दोन दिवसीय ‘एमएचसीआय-एआरओआय-२०१४’ ही परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते ‘लोकमत’शी बोलत होते. या परिषदेच्या निमित्ताने नागपुरात पहिल्यांदाच कर्करोग विकीरण तज्ज्ञ एकत्र आले होते.डॉ. मोहंती म्हणाले, पुरुष व महिलांमध्ये अन्ननलिकेचा कॅन्सरचा क्रमांक पाचवा लागतो. हा कॅन्सर वयाच्या ४० ते ५० व्या वर्षी सर्वात जास्त दिसून येतो. याची भयानकता म्हणजे साधारण ८० टक्के रुग्ण ‘अ‍ॅडव्हॉन्स स्टेज’मध्ये येतात. अशावेळी उपचार करणे कठीण जाते. या मागील कारण म्हणजे, जेव्हा रुग्णाला अन्न गिळणे फार कठीण जाते तेव्हाच तो डॉक्टरकडे जातो. यातच अनेक सामान्य डॉक्टर अशा रुग्णांना छाती किंवा घशाचा संसर्ग म्हणून उपचार करतात. यामुळे रुग्ण ‘अ‍ॅडव्हॉन्स स्टेज’ला पोहचतो. याचे निदान ‘इंडोस्कोपी’ व ‘सिटी स्कॅन’मधून होते. वयाच्या ४० व्या वर्षी ज्यांना अन्न किंवा पाणी गिळणे कठीण जात असेल, वजन कमी झालेले असेल, थकवा वाटत असेल, ताप येत असेल अशांनी त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करणे आवश्यक आहे. अतितैलिय पदार्थ, लोणची व मसाल्याच्या पदार्थांच्या सेवनाने हा कॅन्सर होतो. महिलांमध्ये हिमोग्लोबीनची कमी हेही या आजाराला कारणीभूत ठरते. अत्याधुनिक ‘लिनियर एक्सिलेटर’ची गरजडॉ. व्ही. कन्नन म्हणाले, २०३० पर्यंत कॅन्सरच्या रुग्णांमध्ये २०० ते ३०० टक्क्यांनी वाढ होऊ शकते. येत्या १५ वर्षात जगातील ५० टक्के कॅन्सरचे रुग्ण ब्राझिल, रशिया, भारत व चीन या देशात आढळून येऊ शकतात. कॅन्सरची लागण झाल्याचे तपासणीत निदान झाल्यानंतर यावरील उपचारासाठी अत्याधुनिक लिनियर एक्सिलेटरची गरज भासते. दुर्दैवाने भारतात फक्त ३० शहरांमध्येच ही मशीन आहे. विशेष म्हणजे, विदर्भात सर्वात जास्त कॅन्सरचे रुग्ण आहेत. परंतु नागपुरातही ही मशीन नाही. यामुळे येथील रुग्णांना मुंबई, पुणे गाठावे लागत आहे. महत्त्वाचे म्हणजे, वाढते रुग्ण व त्यांची आर्थिक स्थिती पाहता भारतात ही मशीन दर ३० किलोमीटरवर असणे आवश्यक आहे. ‘साईड इफेक्ट’चे प्रमाण कमीडॉ.बी.सी.गोस्वामी व डॉ. उमेश महंतशेट्टी यांनी सांगितले, ‘लिनियर एक्सिलेटर’मध्येही आता अ‍ॅडव्हॉन्स टेक्नालॉजी आल्याने रेडिएशन देताना साईड इफेक्टचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की ‘कोबाल्ट युनिट’ बंद करावे. टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आजही ‘कोबाल्ट’चा वापर सुरू आहे. आहे त्या मशीनचा चांगल्यात चांगला वापर केल्यास त्याचा उत्तम परिणाम दिसून येतो, असेही ते म्हणाले. परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. किशोर टावरी व प्रसिद्ध आॅन्कोलॉजिस्ट डॉ. कृष्णा कांबळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)