शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

अन्ननलिकेच्या कॅन्सरचे ५० हजार रुग्ण

By admin | Updated: August 17, 2014 00:51 IST

देशात दरवर्षी अन्ननलिकेच्या कॅन्सरचे ५० हजार नवीन रुग्ण आढळून येतात. विशेष म्हणजे यातील बहुसंख्य रुग्ण ‘अ‍ॅडव्हॉन्स स्टेज’मध्ये येतात. यामुळे त्यांच्यावर उपचार करणे कठीण जाते,

‘एमएचसीआय-एआरओआय-२०१४’ : पहिल्यांदाच एकत्र आले कर्करोग विकीरण तज्ज्ञनागपूर : देशात दरवर्षी अन्ननलिकेच्या कॅन्सरचे ५० हजार नवीन रुग्ण आढळून येतात. विशेष म्हणजे यातील बहुसंख्य रुग्ण ‘अ‍ॅडव्हॉन्स स्टेज’मध्ये येतात. यामुळे त्यांच्यावर उपचार करणे कठीण जाते, अशी माहिती डॉ. बी.के. मोहंती यांनी दिली.महाराष्ट्र चॅप्टर अ‍ॅण्ड सेंट्रल इंडिया एआरओआय याच्यावतीने दोन दिवसीय ‘एमएचसीआय-एआरओआय-२०१४’ ही परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते ‘लोकमत’शी बोलत होते. या परिषदेच्या निमित्ताने नागपुरात पहिल्यांदाच कर्करोग विकीरण तज्ज्ञ एकत्र आले होते.डॉ. मोहंती म्हणाले, पुरुष व महिलांमध्ये अन्ननलिकेचा कॅन्सरचा क्रमांक पाचवा लागतो. हा कॅन्सर वयाच्या ४० ते ५० व्या वर्षी सर्वात जास्त दिसून येतो. याची भयानकता म्हणजे साधारण ८० टक्के रुग्ण ‘अ‍ॅडव्हॉन्स स्टेज’मध्ये येतात. अशावेळी उपचार करणे कठीण जाते. या मागील कारण म्हणजे, जेव्हा रुग्णाला अन्न गिळणे फार कठीण जाते तेव्हाच तो डॉक्टरकडे जातो. यातच अनेक सामान्य डॉक्टर अशा रुग्णांना छाती किंवा घशाचा संसर्ग म्हणून उपचार करतात. यामुळे रुग्ण ‘अ‍ॅडव्हॉन्स स्टेज’ला पोहचतो. याचे निदान ‘इंडोस्कोपी’ व ‘सिटी स्कॅन’मधून होते. वयाच्या ४० व्या वर्षी ज्यांना अन्न किंवा पाणी गिळणे कठीण जात असेल, वजन कमी झालेले असेल, थकवा वाटत असेल, ताप येत असेल अशांनी त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करणे आवश्यक आहे. अतितैलिय पदार्थ, लोणची व मसाल्याच्या पदार्थांच्या सेवनाने हा कॅन्सर होतो. महिलांमध्ये हिमोग्लोबीनची कमी हेही या आजाराला कारणीभूत ठरते. अत्याधुनिक ‘लिनियर एक्सिलेटर’ची गरजडॉ. व्ही. कन्नन म्हणाले, २०३० पर्यंत कॅन्सरच्या रुग्णांमध्ये २०० ते ३०० टक्क्यांनी वाढ होऊ शकते. येत्या १५ वर्षात जगातील ५० टक्के कॅन्सरचे रुग्ण ब्राझिल, रशिया, भारत व चीन या देशात आढळून येऊ शकतात. कॅन्सरची लागण झाल्याचे तपासणीत निदान झाल्यानंतर यावरील उपचारासाठी अत्याधुनिक लिनियर एक्सिलेटरची गरज भासते. दुर्दैवाने भारतात फक्त ३० शहरांमध्येच ही मशीन आहे. विशेष म्हणजे, विदर्भात सर्वात जास्त कॅन्सरचे रुग्ण आहेत. परंतु नागपुरातही ही मशीन नाही. यामुळे येथील रुग्णांना मुंबई, पुणे गाठावे लागत आहे. महत्त्वाचे म्हणजे, वाढते रुग्ण व त्यांची आर्थिक स्थिती पाहता भारतात ही मशीन दर ३० किलोमीटरवर असणे आवश्यक आहे. ‘साईड इफेक्ट’चे प्रमाण कमीडॉ.बी.सी.गोस्वामी व डॉ. उमेश महंतशेट्टी यांनी सांगितले, ‘लिनियर एक्सिलेटर’मध्येही आता अ‍ॅडव्हॉन्स टेक्नालॉजी आल्याने रेडिएशन देताना साईड इफेक्टचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की ‘कोबाल्ट युनिट’ बंद करावे. टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आजही ‘कोबाल्ट’चा वापर सुरू आहे. आहे त्या मशीनचा चांगल्यात चांगला वापर केल्यास त्याचा उत्तम परिणाम दिसून येतो, असेही ते म्हणाले. परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. किशोर टावरी व प्रसिद्ध आॅन्कोलॉजिस्ट डॉ. कृष्णा कांबळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)