शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
2
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
3
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
4
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
5
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
6
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
7
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
8
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
9
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
10
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
11
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
12
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
13
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
14
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
15
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
16
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
17
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
18
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
19
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
20
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा

बीडीडीच्या रहिवाशांना ५०० चौरस फुटांची घरे

By admin | Updated: September 20, 2016 04:16 IST

मुंबईतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुंबई : मुंबईतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याच्या उच्चाधिकार समितीने वरळी वगळता नायगांव आणि लोअर परळ येथील चाळींच्या पुनर्विकासाच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. रहिवाशांना ५०० चौरसफुटाची घरे दिली जाणार आहेत. बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाबाबत मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची नेमण्यात आली होती. या समितीने नायगांव आणि ना. म. जोशी मार्ग येथील चाळींच्या पुनर्विकास प्रस्तावाला मान्यता दिली आहे. वरळी येथील बीडीडी चाळींचा मुद्दा न्यायालयात असल्याने त्याबाबत निर्णय करण्यात आला नाही, असे स्वाधीन क्षत्रिय यांनी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना सांगितले. या प्रस्तावानुसार बीडीडी चाळीतील रहिवाशांना ५०० चौफुटाचे घरे मिळणार आहेत. ५०० चौफुटांच्या या घरात एक मास्टर बेडरुम, टॉयलेट-बाथरुम आणि हॉलचा समावेश असणार आहे. रहिवाशांच्या घरे उभारल्यानंतर शिल्लक राहणा-या जागेपैकी ६० जागा मध्यम उत्पन्न आणि ३० जागेवर उच्च उत्पन्न गटाच्या लोकांसाठी घरे बांधली जातील. तर, उर्वरित १० टक्के जागा व्यावसायिक वापरासाठी ठेवण्यात येणार असल्याचे मुख्य सचिवांनी स्पष्ट केले. या पुर्नविकासासाठी नोडल एजन्सी म्हणून म्हाडाची नियुक्ती करण्यात आली आहे. बीडीडी चाळींच्या पुर्नविकासाचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी विकास नियंत्रण नियमावली ३३ (९) मध्ये नव्या उपनियमावलीचा समावेश करण्यात आला आहे. तसेच २० हजार चौफुटाहून अधिक जागेत बांधकाम होणार असल्याने पर्यावरण विभागाची मान्यता घ्यावी लागणार असल्याचे मुख्य सचिवांनी स्पष्ट केले. उच्चाधिकार समितीने प्रकल्पास मान्यता दिली असून अंतिम मान्यतेसाठी हा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेची मोहर उठल्यानंतर नायगांव आणि ना.म.जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींच्या पुर्नविकासाच्या कामास सुरूवात होईल, असे स्वाधीन क्षत्रिय यांनी सांगितले. बीडीडी चाळींच्या पुर्नविकासाचा घोळ अनेक वर्षांपासून सुरु होता. एकीकडे राजकीय पक्षांमधील कुरघोडीचे राजकारण तर दुसरीकडे रहिवाशांच्या मागण्या या कचाट्यात हा प्रकल्प रखडला होता. त्यातच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने सत्ताधारी पुर्नविकासाचे श्रेय घेण्याच्या प्रयत्नात आहेत. लवकरच वरळी येथे एका जाहिर सभेत पुर्नविकासाची अंतिम घोषणा करण्याची तयारी भाजपाने चालविली आहे. त्यादृष्टीने हालचाली सुरु झाल्या आहेत. ब्रिटीशांनी १९२० साली तब्बल बीडीडी चाळीच्या २०७ इमारती उभारल्या होत्या. वरळी, शिवडी-नायगांव, आणि ना.म.जोशी मार्ग अशा एकूण ९३ एकर परिसरात या चौमजली चाळी उभ्या आहेत. अवघ्या १६० फुटांच्या १६ हजार ५५४ सदनिका येथे आहेत. (प्रतिनिधी)>मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर कामास गतीउच्चाधिकार समितीने प्रकल्पास मान्यता दिली असून अंतिम मान्यतेसाठी हा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेची मोहर उठल्यानंतर नायगांव आणि ना.म.जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींच्या पुर्नविकासाच्या कामास सुरूवात होईल, असे स्वाधीन क्षत्रिय यांनी सांगितले.