शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

बीडीडीच्या रहिवाशांना ५०० चौरस फुटांची घरे

By admin | Updated: September 20, 2016 04:16 IST

मुंबईतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुंबई : मुंबईतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याच्या उच्चाधिकार समितीने वरळी वगळता नायगांव आणि लोअर परळ येथील चाळींच्या पुनर्विकासाच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. रहिवाशांना ५०० चौरसफुटाची घरे दिली जाणार आहेत. बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाबाबत मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची नेमण्यात आली होती. या समितीने नायगांव आणि ना. म. जोशी मार्ग येथील चाळींच्या पुनर्विकास प्रस्तावाला मान्यता दिली आहे. वरळी येथील बीडीडी चाळींचा मुद्दा न्यायालयात असल्याने त्याबाबत निर्णय करण्यात आला नाही, असे स्वाधीन क्षत्रिय यांनी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना सांगितले. या प्रस्तावानुसार बीडीडी चाळीतील रहिवाशांना ५०० चौफुटाचे घरे मिळणार आहेत. ५०० चौफुटांच्या या घरात एक मास्टर बेडरुम, टॉयलेट-बाथरुम आणि हॉलचा समावेश असणार आहे. रहिवाशांच्या घरे उभारल्यानंतर शिल्लक राहणा-या जागेपैकी ६० जागा मध्यम उत्पन्न आणि ३० जागेवर उच्च उत्पन्न गटाच्या लोकांसाठी घरे बांधली जातील. तर, उर्वरित १० टक्के जागा व्यावसायिक वापरासाठी ठेवण्यात येणार असल्याचे मुख्य सचिवांनी स्पष्ट केले. या पुर्नविकासासाठी नोडल एजन्सी म्हणून म्हाडाची नियुक्ती करण्यात आली आहे. बीडीडी चाळींच्या पुर्नविकासाचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी विकास नियंत्रण नियमावली ३३ (९) मध्ये नव्या उपनियमावलीचा समावेश करण्यात आला आहे. तसेच २० हजार चौफुटाहून अधिक जागेत बांधकाम होणार असल्याने पर्यावरण विभागाची मान्यता घ्यावी लागणार असल्याचे मुख्य सचिवांनी स्पष्ट केले. उच्चाधिकार समितीने प्रकल्पास मान्यता दिली असून अंतिम मान्यतेसाठी हा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेची मोहर उठल्यानंतर नायगांव आणि ना.म.जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींच्या पुर्नविकासाच्या कामास सुरूवात होईल, असे स्वाधीन क्षत्रिय यांनी सांगितले. बीडीडी चाळींच्या पुर्नविकासाचा घोळ अनेक वर्षांपासून सुरु होता. एकीकडे राजकीय पक्षांमधील कुरघोडीचे राजकारण तर दुसरीकडे रहिवाशांच्या मागण्या या कचाट्यात हा प्रकल्प रखडला होता. त्यातच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने सत्ताधारी पुर्नविकासाचे श्रेय घेण्याच्या प्रयत्नात आहेत. लवकरच वरळी येथे एका जाहिर सभेत पुर्नविकासाची अंतिम घोषणा करण्याची तयारी भाजपाने चालविली आहे. त्यादृष्टीने हालचाली सुरु झाल्या आहेत. ब्रिटीशांनी १९२० साली तब्बल बीडीडी चाळीच्या २०७ इमारती उभारल्या होत्या. वरळी, शिवडी-नायगांव, आणि ना.म.जोशी मार्ग अशा एकूण ९३ एकर परिसरात या चौमजली चाळी उभ्या आहेत. अवघ्या १६० फुटांच्या १६ हजार ५५४ सदनिका येथे आहेत. (प्रतिनिधी)>मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर कामास गतीउच्चाधिकार समितीने प्रकल्पास मान्यता दिली असून अंतिम मान्यतेसाठी हा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेची मोहर उठल्यानंतर नायगांव आणि ना.म.जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींच्या पुर्नविकासाच्या कामास सुरूवात होईल, असे स्वाधीन क्षत्रिय यांनी सांगितले.