शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

७00 रूपयांच्या अनुदानासाठी ५00 रूपये खर्च

By admin | Updated: August 7, 2014 21:33 IST

बँक खाते उघडणे अनिवार्य : जननी सुरक्षा योजनेचा लाभ ठरतोय डोकेदुखी

खामगाव: दारिद्रय़रेषेखालील महिलांना प्रसूतीपश्‍चात स्वत:ची काळजी घेता यावी, याकरिता जननी सुरक्षा योजनेतून ७00 रूपये अनुदान दिले जाते; मात्र हा लाभ लाभार्थी महिलेच्या बँक खात्यातच जमा केला जात असल्याने, बँकेत खाते उघडण्यासाठी लाभार्थी महिलांना ५00 रुपयांचा खर्च सोसावा लागत आहेत.केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत १२ एप्रिल २00५ पासून राज्यात जननी सुरक्षा योजना राबविण्यात येत आहे. माता व नवजात अर्भकाचा मृत्यूदर कमी करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. दारिद्रयरेषेखालील तसेच अनुसुचित जाती व जमातीमधील मातांना जननी सुरक्षा योजनेचा लाभ दिला जातो. लाभार्थी महिला प्रसुतीसाठी रूग्णालयात दाखल झाल्यानंतर ७ दिवसांच्या आत ७00 रूपयांचे एकरकमी अनुदान धनादेशाव्दारे दिले जाते. शहरी क्षेत्रामध्ये हे अनुदान ६00 रूपये, तर प्रसुती घरी झाल्यास फक्त दारिद्रयरेषेखालील लाभार्थींनाच ५00 रूपये अनुदान दिले जाते.प्रसुतीनंतर मातेला सकस आहार मिळावा तसेच नवजात बाळाचे कुपोषण होऊ नये, या उद्देशाने आरोग्य विभागाच्यावतीने ही योजना सुरू करण्यात आली आहे.प्रसुतीनंतर लाभार्थी मातेला देण्यात येणारा लाभ हा धनादेशाच्या स्वरूपात असतो. २0१३ च्या पूर्वी हे धनादेश बेअरर स्वरूपात देण्यात येत होते. त्यामुळे ते वठविण्यासाठी लाभार्थीचे बँकेत खाते असणे आवश्यक नव्हते; मात्र आता हे धनादेश लाभार्थींच्या खात्यात जमा केले जात असल्याने, लाभार्थींना बँकेत खाते उघडण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही. बँकेत खाते उघडण्यासाठी ५00 रूपये खर्च येतो. एवढय़ा कमी रकमेच्या अनुदानासाठी ५00 रूपयांचा खर्च सोसणे लाभार्थींना परवडण्यासारखे नाही. त्यामुळे ही योजना लाभार्थींसाठी डोकेदुखी ठरत आहे.** गैरव्यवहारास आळा घालणे शक्यलाभार्थींच्या बँक खात्यात अनुदानाचा धनादेश जमा करण्याची प्रक्रिया पारदश्री आहे. या पद्धतीमुळे गैरव्यवहारास आळा घालणे शक्य आहे. त्यामुळे अनुदान देण्याची हीच पद्धत शासनाने सुरू ठेवली तर ती हिताचीच आहे; मात्र त्यासाठी बँकेत झीरो बॅलेन्सवर खाते उघडण्याची तरतूद करण्याची गरज असल्याचे मत लाभार्थींमधून व्यक्त होत आहे.