शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
3
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
4
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
5
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
6
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
7
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
8
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
9
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
10
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
11
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
12
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
13
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
14
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
15
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
16
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
17
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
18
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
19
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
20
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...

शिवशाही पुनर्वसनसाठी ५०० कोटी

By admin | Updated: August 13, 2015 01:56 IST

मुंबई महानगर क्षेत्रात सर्वसामान्यांना परवडणारी घरे बांधण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या निधीतून ५०० कोटी रु पये शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाला देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रात सर्वसामान्यांना परवडणारी घरे बांधण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या निधीतून ५०० कोटी रु पये शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाला देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले. मुंबई शहरातील झोपडपट्टी समुहाची (क्लस्टर) व योजनांच्या बाहेरील हद्दीची मोजणी ईटीएस/जीपीएस या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुढाकार घेणार आहे. ही प्रक्रि या जलद करण्यासाठी खासगी संस्थेची मदत घेतली जाणार आहे. त्याद्वारे विकास नियोजन आराखड्याच्या व नगरभूमापनाच्या हद्दीसह अद्ययावत जीआयएस मॅप तयार करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सांगितले. (विशेष प्रतिनिधी)झोपू योजनेत सुलभता..झोपडीधारकांची पात्रता निश्चितीची प्रक्रि या आता सुलभ व जलद करण्यात येणार आहे. तसेच पात्र असलेल्या व बैठकीस उपस्थित झोपडीधारकांपैकी ७० टक्के; परंतु एकूण पात्र झोपडीधारकांच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी नाही या तत्त्वावर गुप्त मतदानाद्वारे विकासकाची नेमणूक करण्यात येणार आहे. यापूर्वी विकासकाची नेमणूक ही विकास नियंत्रण नियमावलीनुसार ७० टक्के झोपडीधारकांच्या संमतीने होत होती. मात्र, या संमती मिळण्याच्या प्रक्रि येस विलंब होऊन प्रकल्प रखडत होता. आता या प्रक्रि येत सुधारणा केल्यामुळे पुनर्वसन प्रकल्प जलद पूर्ण होण्यास मदत होणार आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. खासगी मालकांना संधी..झोपडपट्टी असलेल्या खासगी जमिनीच्या मालकांना प्राधान्याने तीन महिन्यांच्या कालावधीत पुनर्वसन योजना दाखल करण्याची संधी देण्यात येणार आहे. वेळेत योजना दाखल न केल्यास या जमिनीचे नियमानुसार संपादन करण्यात येईल. तसेच शासकीय व निमशासकीय जमिनींवरील झोपडीधारकांना पुनर्वसन योजना सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत दिली जाणार असून ती त्यांनी मुदतीत सादर न केल्यास प्राधिकरणामार्फत निविदेद्वारे विकासकाची नेमणूक करु न ही योजना राबविली जाईल....तर वास्तव्य करणाऱ्यास सदनिका...सर्व झोपडधारकांची पात्रता निश्चित करण्याच्या दृष्टीने प्राधिकरणाने आपल्या पातळीवर जीआयएस सक्षम बायोमेट्रिक सर्वेक्षणाद्वारे माहिती संकलित करावी असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, जुलै २०१५ पूर्वी झालेल्या सदनिकांचे अनधिकृत हस्तांतरण झाले असल्यास प्रत्यक्ष वास्तव्य करणाऱ्या व्यक्तींना सदनिकांचे पुनर्वाटप करण्याचे धोरण ठरविण्यात येईल. त्यानुसार पूर्वीचा मालक शासनाच्या योजनेतील नवीन घरासाठी अपात्र ठरविणार आहे.