शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
4
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
5
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
6
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
7
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
8
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
9
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
10
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
11
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
12
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
13
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
14
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
15
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
16
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
17
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
19
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
20
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार

रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी ५०० कोटी

By admin | Updated: July 2, 2016 03:21 IST

विकास आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम मंजुरी दिली असल्याचे माहिती कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी रायगडावर दिली

महाड : किल्ले रायगडाच्या संवर्धनासाठी ५०० कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम मंजुरी दिली असल्याचे माहिती कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी रायगडावर दिली. छत्रपती शिवराय, राजमाता जिजाऊ आणि तमाम शिवभक्तांच्या मनातील रायगड घडवण्यासाठी शिवाजी महाराजांनी दिलेला हा अमूल्य ठेवा अखंडपणे जतन करण्यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही देखील देशमुख यांनी यावेळी दिली.कृषी दिनानिमित्त रायगड किल्ल्यावर ११ हजार वृक्षलागवडीचा कार्यक्रम आज देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेळी महाडचे आ. भरत गोगावले, मा. आ. माणिक जगताप, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, हिरवळ संस्थेचे अध्यक्ष किशोर धारिया, प्रांताधिकारी सुषमा सातपुते, तहसीलदार संदीप कदम, पं. स. सभापती दीप्ती फळसकर, कृषी अधिकारी साळवे यांच्यासह विविध विभागांचे शासकीय अधिकारी, सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने या वृक्षारोपणासाठी सहभागी झाले होते.रायगडावर २५ हजार झाडे लावण्याचा संकल्प असून, त्यापैकी आज ११ हजार झाडे लावण्यात आल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. रायगडावर लावण्यात आलेल्या या झाडांचे संगोपन करण्याचे काम गडावरील धनगर समाजबांधवांना व परिसरातील ग्रामस्थांना दिले जाणार असून, त्यासाठी नरेगा योजनेतून त्यांना मोबदला दिला जाईल, असेही देशमुख यांनी सांगितले. आ. भरत गोगावले यांनी गड विकासाच्या कामात आयुक्त देशमुख यांनी पुढाकार घेतल्याने ५०० कोटींचा निधी मंजूर झाल्याचे सांगितले. महाराजांवरील श्रद्धेपोटी ग्रामविकास खात्याचे प्रधान सचिव पद नाकारून गडाचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने प्रभाकर देशमुख यांनी कोकण आयुक्तपद स्वीकारले. त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र असल्याचे माणिक जगताप यांनी सांगितले. (वार्ताहर)२५,000 झाडे लावणार रायगडावर २५ हजार झाडे लावण्याचा संकल्प असून, त्यापैकी आज ११ हजार झाडे लावण्यात आल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. रायगडावर लावण्यात आलेल्या या झाडांचे संगोपन करण्याचे काम गडावरील धनगर समाजबांधवांना व परिसरातील ग्रामस्थांना दिले जाणार असून, त्यासाठी नरेगा योजनेतून त्यांना मोबदला दिला जाईल, असेही कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी सांगितले.