शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी ५०० कोटी

By admin | Updated: July 2, 2016 03:21 IST

विकास आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम मंजुरी दिली असल्याचे माहिती कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी रायगडावर दिली

महाड : किल्ले रायगडाच्या संवर्धनासाठी ५०० कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम मंजुरी दिली असल्याचे माहिती कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी रायगडावर दिली. छत्रपती शिवराय, राजमाता जिजाऊ आणि तमाम शिवभक्तांच्या मनातील रायगड घडवण्यासाठी शिवाजी महाराजांनी दिलेला हा अमूल्य ठेवा अखंडपणे जतन करण्यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही देखील देशमुख यांनी यावेळी दिली.कृषी दिनानिमित्त रायगड किल्ल्यावर ११ हजार वृक्षलागवडीचा कार्यक्रम आज देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेळी महाडचे आ. भरत गोगावले, मा. आ. माणिक जगताप, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, हिरवळ संस्थेचे अध्यक्ष किशोर धारिया, प्रांताधिकारी सुषमा सातपुते, तहसीलदार संदीप कदम, पं. स. सभापती दीप्ती फळसकर, कृषी अधिकारी साळवे यांच्यासह विविध विभागांचे शासकीय अधिकारी, सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने या वृक्षारोपणासाठी सहभागी झाले होते.रायगडावर २५ हजार झाडे लावण्याचा संकल्प असून, त्यापैकी आज ११ हजार झाडे लावण्यात आल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. रायगडावर लावण्यात आलेल्या या झाडांचे संगोपन करण्याचे काम गडावरील धनगर समाजबांधवांना व परिसरातील ग्रामस्थांना दिले जाणार असून, त्यासाठी नरेगा योजनेतून त्यांना मोबदला दिला जाईल, असेही देशमुख यांनी सांगितले. आ. भरत गोगावले यांनी गड विकासाच्या कामात आयुक्त देशमुख यांनी पुढाकार घेतल्याने ५०० कोटींचा निधी मंजूर झाल्याचे सांगितले. महाराजांवरील श्रद्धेपोटी ग्रामविकास खात्याचे प्रधान सचिव पद नाकारून गडाचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने प्रभाकर देशमुख यांनी कोकण आयुक्तपद स्वीकारले. त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र असल्याचे माणिक जगताप यांनी सांगितले. (वार्ताहर)२५,000 झाडे लावणार रायगडावर २५ हजार झाडे लावण्याचा संकल्प असून, त्यापैकी आज ११ हजार झाडे लावण्यात आल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. रायगडावर लावण्यात आलेल्या या झाडांचे संगोपन करण्याचे काम गडावरील धनगर समाजबांधवांना व परिसरातील ग्रामस्थांना दिले जाणार असून, त्यासाठी नरेगा योजनेतून त्यांना मोबदला दिला जाईल, असेही कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी सांगितले.