शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

रोज ५० हजार किलो तूरडाळ बाजारात

By admin | Updated: November 8, 2015 01:18 IST

व्यापारी सरकारसोबतच दुटप्पी राजकारण करत असल्याचे पाहून, अखेर सरकारने बिग बझार, रिलायन्स, सहकार भांडार या साखळी दुकानांना हाताशी धरले आणि ९९ रुपये किलो

- अतुल कुलकर्णी,  मुंबईव्यापारी सरकारसोबतच दुटप्पी राजकारण करत असल्याचे पाहून, अखेर सरकारने बिग बझार, रिलायन्स, सहकार भांडार या साखळी दुकानांना हाताशी धरले आणि ९९ रुपये किलो दराने तूरडाळ उपलब्ध करून दिली. आततायीपणे अधिकाऱ्यांनी डाळीवर प्रक्रिया करणाऱ्या काही मिलदेखील ताब्यात घेतल्या होत्या. त्यावरील बंधने काढण्यात आल्याने रविवारपासून महाराष्ट्रातल्या बाजारात रोज ५० हजार किलो तूरडाळ उपलब्ध करून दिली जाणार आहे.ज्यांनी साठे करून ठेवले व जे १७० रुपयांच्या खाली डाळ विकण्यास तयार नव्हते, त्यांनादेखील आता डाळ १०० रुपये किलोने विकावी लागणार आहे. शुक्रवारी अन्न व पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी बिग बझारसोबत चर्चा केली आणि त्यांना तातडीने डाळीचा पुरवठाही केला. शनिवारी बिग बझारने ९९ रुपये किलोने डाळ विकणार, अशा जाहिराती दिल्या. दरम्यानच्या काळात सहकार भांडार आणि रिलायन्स यांच्याशीही बोलणी पूर्ण करून त्यांनाही ९४ रुपये किलो दराने डाळीचा पुरवठा सुरू केला. त्यावर हाताळणी खर्च म्हणून त्यांनी ६ रुपये घ्यावे आणि १०० रुपये किलोने डाळ विकावी, असे सांगण्यात आले. मंगळवारनंतर दररोज १ लाख किलो डाळीचा पुरवठा सुरूहोईल, असेही मंत्री बापट यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.राज्यात डाळीची मागणी व या संदर्भातील केंद्र शासनाने आदेश काढले का, या विषयी मुंबई ग्राहक पंचायतीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले, तेव्हा असे आदेश आपल्याकडे आलेत का, याचा शोध घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांनी केल्या. मंत्रालयातील अधिकाऱ्यांमधील सुस्तपणाबद्दल मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली व अधिकाऱ्यांना राज्यभर दौरे करण्याचे आदेशही दिले. मुंबई ग्राहक पंचायतीने मागितली माहितीराज्यात दरवर्षी किती किलो डाळ लागते?, राज्यात डाळीचे उत्पन्न किती होते?, परदेशातून येणारी किती डाळ आपल्या राज्यात राहते आणि किती डाळ अन्य राज्यांत जाते? अशा कोणत्याही प्रश्नांचा अभ्यास अन्न व पुरवठा विभागाने केलेला नाही. त्यांच्याकडे या संबंधीची आकडेवारी उपलब्ध नाही. मुंबई ग्राहक पंचायतीने या विषयावर लक्ष वेधण्यासाठी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून या संबंधी केंद्र शासनाने कोणते आदेश काढले आहेत का, याची माहिती विचारली होती.