शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

रोज ५० हजार किलो तूरडाळ बाजारात

By admin | Updated: November 8, 2015 01:18 IST

व्यापारी सरकारसोबतच दुटप्पी राजकारण करत असल्याचे पाहून, अखेर सरकारने बिग बझार, रिलायन्स, सहकार भांडार या साखळी दुकानांना हाताशी धरले आणि ९९ रुपये किलो

- अतुल कुलकर्णी,  मुंबईव्यापारी सरकारसोबतच दुटप्पी राजकारण करत असल्याचे पाहून, अखेर सरकारने बिग बझार, रिलायन्स, सहकार भांडार या साखळी दुकानांना हाताशी धरले आणि ९९ रुपये किलो दराने तूरडाळ उपलब्ध करून दिली. आततायीपणे अधिकाऱ्यांनी डाळीवर प्रक्रिया करणाऱ्या काही मिलदेखील ताब्यात घेतल्या होत्या. त्यावरील बंधने काढण्यात आल्याने रविवारपासून महाराष्ट्रातल्या बाजारात रोज ५० हजार किलो तूरडाळ उपलब्ध करून दिली जाणार आहे.ज्यांनी साठे करून ठेवले व जे १७० रुपयांच्या खाली डाळ विकण्यास तयार नव्हते, त्यांनादेखील आता डाळ १०० रुपये किलोने विकावी लागणार आहे. शुक्रवारी अन्न व पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी बिग बझारसोबत चर्चा केली आणि त्यांना तातडीने डाळीचा पुरवठाही केला. शनिवारी बिग बझारने ९९ रुपये किलोने डाळ विकणार, अशा जाहिराती दिल्या. दरम्यानच्या काळात सहकार भांडार आणि रिलायन्स यांच्याशीही बोलणी पूर्ण करून त्यांनाही ९४ रुपये किलो दराने डाळीचा पुरवठा सुरू केला. त्यावर हाताळणी खर्च म्हणून त्यांनी ६ रुपये घ्यावे आणि १०० रुपये किलोने डाळ विकावी, असे सांगण्यात आले. मंगळवारनंतर दररोज १ लाख किलो डाळीचा पुरवठा सुरूहोईल, असेही मंत्री बापट यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.राज्यात डाळीची मागणी व या संदर्भातील केंद्र शासनाने आदेश काढले का, या विषयी मुंबई ग्राहक पंचायतीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले, तेव्हा असे आदेश आपल्याकडे आलेत का, याचा शोध घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांनी केल्या. मंत्रालयातील अधिकाऱ्यांमधील सुस्तपणाबद्दल मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली व अधिकाऱ्यांना राज्यभर दौरे करण्याचे आदेशही दिले. मुंबई ग्राहक पंचायतीने मागितली माहितीराज्यात दरवर्षी किती किलो डाळ लागते?, राज्यात डाळीचे उत्पन्न किती होते?, परदेशातून येणारी किती डाळ आपल्या राज्यात राहते आणि किती डाळ अन्य राज्यांत जाते? अशा कोणत्याही प्रश्नांचा अभ्यास अन्न व पुरवठा विभागाने केलेला नाही. त्यांच्याकडे या संबंधीची आकडेवारी उपलब्ध नाही. मुंबई ग्राहक पंचायतीने या विषयावर लक्ष वेधण्यासाठी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून या संबंधी केंद्र शासनाने कोणते आदेश काढले आहेत का, याची माहिती विचारली होती.