शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
4
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
5
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
6
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
7
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
8
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
9
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
10
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
11
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
12
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
13
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
14
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
15
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
16
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
17
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
18
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
19
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
20
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं

रोज ५० हजार किलो तूरडाळ बाजारात

By admin | Updated: November 8, 2015 01:18 IST

व्यापारी सरकारसोबतच दुटप्पी राजकारण करत असल्याचे पाहून, अखेर सरकारने बिग बझार, रिलायन्स, सहकार भांडार या साखळी दुकानांना हाताशी धरले आणि ९९ रुपये किलो

- अतुल कुलकर्णी,  मुंबईव्यापारी सरकारसोबतच दुटप्पी राजकारण करत असल्याचे पाहून, अखेर सरकारने बिग बझार, रिलायन्स, सहकार भांडार या साखळी दुकानांना हाताशी धरले आणि ९९ रुपये किलो दराने तूरडाळ उपलब्ध करून दिली. आततायीपणे अधिकाऱ्यांनी डाळीवर प्रक्रिया करणाऱ्या काही मिलदेखील ताब्यात घेतल्या होत्या. त्यावरील बंधने काढण्यात आल्याने रविवारपासून महाराष्ट्रातल्या बाजारात रोज ५० हजार किलो तूरडाळ उपलब्ध करून दिली जाणार आहे.ज्यांनी साठे करून ठेवले व जे १७० रुपयांच्या खाली डाळ विकण्यास तयार नव्हते, त्यांनादेखील आता डाळ १०० रुपये किलोने विकावी लागणार आहे. शुक्रवारी अन्न व पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी बिग बझारसोबत चर्चा केली आणि त्यांना तातडीने डाळीचा पुरवठाही केला. शनिवारी बिग बझारने ९९ रुपये किलोने डाळ विकणार, अशा जाहिराती दिल्या. दरम्यानच्या काळात सहकार भांडार आणि रिलायन्स यांच्याशीही बोलणी पूर्ण करून त्यांनाही ९४ रुपये किलो दराने डाळीचा पुरवठा सुरू केला. त्यावर हाताळणी खर्च म्हणून त्यांनी ६ रुपये घ्यावे आणि १०० रुपये किलोने डाळ विकावी, असे सांगण्यात आले. मंगळवारनंतर दररोज १ लाख किलो डाळीचा पुरवठा सुरूहोईल, असेही मंत्री बापट यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.राज्यात डाळीची मागणी व या संदर्भातील केंद्र शासनाने आदेश काढले का, या विषयी मुंबई ग्राहक पंचायतीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले, तेव्हा असे आदेश आपल्याकडे आलेत का, याचा शोध घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांनी केल्या. मंत्रालयातील अधिकाऱ्यांमधील सुस्तपणाबद्दल मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली व अधिकाऱ्यांना राज्यभर दौरे करण्याचे आदेशही दिले. मुंबई ग्राहक पंचायतीने मागितली माहितीराज्यात दरवर्षी किती किलो डाळ लागते?, राज्यात डाळीचे उत्पन्न किती होते?, परदेशातून येणारी किती डाळ आपल्या राज्यात राहते आणि किती डाळ अन्य राज्यांत जाते? अशा कोणत्याही प्रश्नांचा अभ्यास अन्न व पुरवठा विभागाने केलेला नाही. त्यांच्याकडे या संबंधीची आकडेवारी उपलब्ध नाही. मुंबई ग्राहक पंचायतीने या विषयावर लक्ष वेधण्यासाठी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून या संबंधी केंद्र शासनाने कोणते आदेश काढले आहेत का, याची माहिती विचारली होती.