शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मद्यनिर्मिती कारखान्यांच्या पाण्यात ५० टक्के कपात - औरंगाबाद खंडपीठाचा आदेश

By admin | Updated: April 26, 2016 18:13 IST

पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील दारू उद्योगांची बुधवारपासून ५० टक्के पाणीकपात करण्याचे आंतरिम आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आज प्रशासनाला दिले.

इतर उद्योगांचीही २० टक्के पाणी कपात
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. २६ -  : पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आणि दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मद्यनिर्मिती कारखान्यांच्या पाणीपुरवठ्यात २७ एप्रिलपासून ५० टक्के आणि १० मे ते १० जूनपर्यंत आणखी १० टक्के म्हणजे एकूण ६० टक्के पाणी कपात करावी, असे अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. संगीतराव पाटील यांनी मंगळवारी राज्य शासनास दिले. या कपातीमधून वाचणारे पाणी केवळ पिण्यासाठीच वापरावे, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. 

शिवाय इतर उद्योगांचीही बुधवारपासून २० टक्के आणि १० मेपासून १० जूनपर्यंत आणखी ५ टक्के म्हणजे एकूण २५ टक्के कपात करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. उरणाऱ्या पाण्याचे नियोजन संबंधित विभागीय आयुक्तांनी करावे. तसेच प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी पाणी वाटपाबाबत देखरेख करावी. १० जूनपर्यंत याचा अहवाल दर आठवड्यास उच्च न्यायालयाचे प्रबंधक आणि सरकारी वकील यांच्याकडे सादर करावा, असेही आदेश खंडपीठाने दिले. या जनहित याचिकेची पुढील सुनावणी १० जून २०१६ रोजी होणार आहे. कोपरगाव येथील संजय भास्करराव काळे यांनी अ‍ॅड. सतीश बी. तळेकर यांच्यामार्फत दाखल केलेल्या जनहित याचिकेवर मंगळवारी खंडपीठाने वरीलप्रमाणे अंतरिम आदेश दिला. राज्य पाणी धोरण २०११ नुसार महाराष्ट्रातील मद्यनिर्मिती कारखान्यांचा पाणीपुरवठा बंद करून ते पाणी पिण्यासाठी आणि शेतीसाठी पुरविण्याचा आदेश राज्य शासनास देण्याची विनंती याचिकाकर्त्याने केली आहे. तसेच मद्याच्या (दारूच्या) दुष्परिणामांचा विचार करून मद्याचे अतिरिक्त उत्पादन आणि सेवन थांबविण्यासाठी परिणामकारक कायदा करण्याचे, विशेष तपासणी पथक (एसआयटी) स्थापन करून राज्यातील बेकायदेशीर मद्य उत्पादन, विक्री, वितरण आणि सेवन थांबविण्याचे, त्याचप्रमाणे २३ फेब्रुवारी २००५ च्या शासन निर्णयानुसार यासंदर्भात कार्यवाही न करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाच्या कारवाईचे निर्देश द्यावेत आदी विनंत्या याचिकाकर्त्याने केल्या आहेत. सध्या राज्यभरात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असल्यामुळे पुढील किमान ४० दिवस मद्यनिर्मिती कारखान्यांचा पाणीपुरवठा बंद करून राज्यातील ज्या जिल्ह्यांत पाण्याची तीव्र टंचाई आहे, त्यांना पाणीपुरवठा केला जावा, अशी अपेक्षा खंडपीठाने यापूर्वीच्या सुनावणीच्या वेळी व्यक्त केली होती. 

‘लोकमत’ ने केला पाठपुरावाएकीकडे संपूर्ण महाराष्ट्र भीषण पाणीटंचाईने होरपळत असताना औरंगाबादेतील मद्य कंपन्यांमध्ये दारू, बीअर बनविण्यासाठी जायकवाडीतील पिण्याच्या पाण्याचा महापूर आलेला आहे, हे वृत्त ‘लोकमत’ने ७ एप्रिलच्या अंकात प्रसिद्ध केले. महसुलाच्या मोहापोटी शासन मद्य कंपन्यांच्या पाणी कपातीकडे कसे दुर्लक्ष करीत आहे, हेही ‘लोकमत’ने समोर आणले होते. ‘लोकमत’च्या या मालिकेचे राज्यभरात पडसाद उमटले. विरोधकांनी आंदोलने केली. न्यायालयातही याचिका दाखल झाल्या