शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

मद्यनिर्मिती कारखान्यांच्या पाण्यात ५० टक्के कपात - औरंगाबाद खंडपीठाचा आदेश

By admin | Updated: April 26, 2016 18:13 IST

पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील दारू उद्योगांची बुधवारपासून ५० टक्के पाणीकपात करण्याचे आंतरिम आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आज प्रशासनाला दिले.

इतर उद्योगांचीही २० टक्के पाणी कपात
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. २६ -  : पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आणि दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मद्यनिर्मिती कारखान्यांच्या पाणीपुरवठ्यात २७ एप्रिलपासून ५० टक्के आणि १० मे ते १० जूनपर्यंत आणखी १० टक्के म्हणजे एकूण ६० टक्के पाणी कपात करावी, असे अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. संगीतराव पाटील यांनी मंगळवारी राज्य शासनास दिले. या कपातीमधून वाचणारे पाणी केवळ पिण्यासाठीच वापरावे, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. 

शिवाय इतर उद्योगांचीही बुधवारपासून २० टक्के आणि १० मेपासून १० जूनपर्यंत आणखी ५ टक्के म्हणजे एकूण २५ टक्के कपात करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. उरणाऱ्या पाण्याचे नियोजन संबंधित विभागीय आयुक्तांनी करावे. तसेच प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी पाणी वाटपाबाबत देखरेख करावी. १० जूनपर्यंत याचा अहवाल दर आठवड्यास उच्च न्यायालयाचे प्रबंधक आणि सरकारी वकील यांच्याकडे सादर करावा, असेही आदेश खंडपीठाने दिले. या जनहित याचिकेची पुढील सुनावणी १० जून २०१६ रोजी होणार आहे. कोपरगाव येथील संजय भास्करराव काळे यांनी अ‍ॅड. सतीश बी. तळेकर यांच्यामार्फत दाखल केलेल्या जनहित याचिकेवर मंगळवारी खंडपीठाने वरीलप्रमाणे अंतरिम आदेश दिला. राज्य पाणी धोरण २०११ नुसार महाराष्ट्रातील मद्यनिर्मिती कारखान्यांचा पाणीपुरवठा बंद करून ते पाणी पिण्यासाठी आणि शेतीसाठी पुरविण्याचा आदेश राज्य शासनास देण्याची विनंती याचिकाकर्त्याने केली आहे. तसेच मद्याच्या (दारूच्या) दुष्परिणामांचा विचार करून मद्याचे अतिरिक्त उत्पादन आणि सेवन थांबविण्यासाठी परिणामकारक कायदा करण्याचे, विशेष तपासणी पथक (एसआयटी) स्थापन करून राज्यातील बेकायदेशीर मद्य उत्पादन, विक्री, वितरण आणि सेवन थांबविण्याचे, त्याचप्रमाणे २३ फेब्रुवारी २००५ च्या शासन निर्णयानुसार यासंदर्भात कार्यवाही न करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाच्या कारवाईचे निर्देश द्यावेत आदी विनंत्या याचिकाकर्त्याने केल्या आहेत. सध्या राज्यभरात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असल्यामुळे पुढील किमान ४० दिवस मद्यनिर्मिती कारखान्यांचा पाणीपुरवठा बंद करून राज्यातील ज्या जिल्ह्यांत पाण्याची तीव्र टंचाई आहे, त्यांना पाणीपुरवठा केला जावा, अशी अपेक्षा खंडपीठाने यापूर्वीच्या सुनावणीच्या वेळी व्यक्त केली होती. 

‘लोकमत’ ने केला पाठपुरावाएकीकडे संपूर्ण महाराष्ट्र भीषण पाणीटंचाईने होरपळत असताना औरंगाबादेतील मद्य कंपन्यांमध्ये दारू, बीअर बनविण्यासाठी जायकवाडीतील पिण्याच्या पाण्याचा महापूर आलेला आहे, हे वृत्त ‘लोकमत’ने ७ एप्रिलच्या अंकात प्रसिद्ध केले. महसुलाच्या मोहापोटी शासन मद्य कंपन्यांच्या पाणी कपातीकडे कसे दुर्लक्ष करीत आहे, हेही ‘लोकमत’ने समोर आणले होते. ‘लोकमत’च्या या मालिकेचे राज्यभरात पडसाद उमटले. विरोधकांनी आंदोलने केली. न्यायालयातही याचिका दाखल झाल्या