शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
5
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
6
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
7
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
8
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
9
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
10
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
11
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
12
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
13
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
14
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
15
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
16
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
17
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
18
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
19
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
20
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल

गहू पिकाचे ५0 टक्क्यांपर्यंत नुकसान!

By admin | Updated: December 1, 2015 02:14 IST

यावर्षी सरासरी पाऊस कमी झाला आणि पेरणीनंतर प्रदीर्घ खंडही पडला. हवामानाच्या बदलत्या चक्रात कीड, तसेच विविध रोगांनी या पिकावर आक्रमण केल्याने विदर्भात गहू पिकाचे जवळपास

अकोला : यावर्षी सरासरी पाऊस कमी झाला आणि पेरणीनंतर प्रदीर्घ खंडही पडला. हवामानाच्या बदलत्या चक्रात कीड, तसेच विविध रोगांनी या पिकावर आक्रमण केल्याने विदर्भात गहू पिकाचे जवळपास ३५ ते ५० टक्के नुकसान झाले आहे. मूग, उडीद हातचे गेले, सोयाबीननेही शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आणि आता कापसाचे उत्पादनही कमी येत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे अल्प संरक्षित सिंचनाची सोय आहे, त्या शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी केली होती; परंतु जानेवारी ते मार्च २०१५ या कालावधीत परतीचा पाऊस तर झाला नाहीच, शिवाय संरक्षित ओलितासाठीचे पाणी संपत आल्याने ४६ टक्के शेतकऱ्यांचे जवळपास ३५ ते ५० टक्के गव्हाचे नुकसान झाले. यावर्षी परिस्थिती जास्तच भीषण असल्याने नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये अत्यंत कमी क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे. दरम्यान, विदर्भात सोयाबीनचे हेक्टरी उत्पादन सरासरी १२ ते १५ क्विंटल आहे. यावर्षी हे उत्पादन हेक्टरी दीड ते २ क्ंिवटलपर्यंत मिळाले आहे. राज्यात सोयाबीनखालील क्षेत्र जवळपास ३८ लाख हेक्टर आहे. यातील विदर्भात हे क्षेत्र १९ ते २० लाख हेक्टरपर्यंत आहे. मागील वर्षी विदर्भात १९ लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. उत्पादन जवळपास ७५ लाख क्ंिवटलपर्यंत पोहोेचले होते. यावर्षी प्रतिकूल हवामान व वातावरण असल्याने विदर्भात १६ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. परंतु वातावरणाचा फटका बसल्याने सोयाबीनचा उतारा हेक्टरी दीड ते २ क्ंिवटल आला आहे. हजारो शेतकऱ्यांना तर एकरी २० ते ५० किलोचा उतारा आला आहे. त्यामुळे यावर्षीचे उत्पादन ३० ते ४० लाख क्ंिवटलच्या आतच असून, बहुसंख्य शेतकऱ्यांना यावर्षी प्रचंड तोटा झाला आहे. जानेवारी ते मार्च २०१५ दरम्यान पावसाच्या अनियमिततेचा फटका गहू उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून, ४६ टक्के शेतकऱ्यांचे ३५ ते ५० टक्के गव्हाचे नुकसान झाल्याचे सर्वेक्षणात निदर्शनास आले आहे. यावर्षी पाऊस नसल्याने परिस्थिती प्रतिकूल आहे. - डॉ. एन.एम. काळे, विस्तार शिक्षण, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.