शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गहू पिकाचे ५0 टक्क्यांपर्यंत नुकसान!

By admin | Updated: December 1, 2015 02:14 IST

यावर्षी सरासरी पाऊस कमी झाला आणि पेरणीनंतर प्रदीर्घ खंडही पडला. हवामानाच्या बदलत्या चक्रात कीड, तसेच विविध रोगांनी या पिकावर आक्रमण केल्याने विदर्भात गहू पिकाचे जवळपास

अकोला : यावर्षी सरासरी पाऊस कमी झाला आणि पेरणीनंतर प्रदीर्घ खंडही पडला. हवामानाच्या बदलत्या चक्रात कीड, तसेच विविध रोगांनी या पिकावर आक्रमण केल्याने विदर्भात गहू पिकाचे जवळपास ३५ ते ५० टक्के नुकसान झाले आहे. मूग, उडीद हातचे गेले, सोयाबीननेही शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आणि आता कापसाचे उत्पादनही कमी येत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे अल्प संरक्षित सिंचनाची सोय आहे, त्या शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी केली होती; परंतु जानेवारी ते मार्च २०१५ या कालावधीत परतीचा पाऊस तर झाला नाहीच, शिवाय संरक्षित ओलितासाठीचे पाणी संपत आल्याने ४६ टक्के शेतकऱ्यांचे जवळपास ३५ ते ५० टक्के गव्हाचे नुकसान झाले. यावर्षी परिस्थिती जास्तच भीषण असल्याने नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये अत्यंत कमी क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे. दरम्यान, विदर्भात सोयाबीनचे हेक्टरी उत्पादन सरासरी १२ ते १५ क्विंटल आहे. यावर्षी हे उत्पादन हेक्टरी दीड ते २ क्ंिवटलपर्यंत मिळाले आहे. राज्यात सोयाबीनखालील क्षेत्र जवळपास ३८ लाख हेक्टर आहे. यातील विदर्भात हे क्षेत्र १९ ते २० लाख हेक्टरपर्यंत आहे. मागील वर्षी विदर्भात १९ लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. उत्पादन जवळपास ७५ लाख क्ंिवटलपर्यंत पोहोेचले होते. यावर्षी प्रतिकूल हवामान व वातावरण असल्याने विदर्भात १६ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. परंतु वातावरणाचा फटका बसल्याने सोयाबीनचा उतारा हेक्टरी दीड ते २ क्ंिवटल आला आहे. हजारो शेतकऱ्यांना तर एकरी २० ते ५० किलोचा उतारा आला आहे. त्यामुळे यावर्षीचे उत्पादन ३० ते ४० लाख क्ंिवटलच्या आतच असून, बहुसंख्य शेतकऱ्यांना यावर्षी प्रचंड तोटा झाला आहे. जानेवारी ते मार्च २०१५ दरम्यान पावसाच्या अनियमिततेचा फटका गहू उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून, ४६ टक्के शेतकऱ्यांचे ३५ ते ५० टक्के गव्हाचे नुकसान झाल्याचे सर्वेक्षणात निदर्शनास आले आहे. यावर्षी पाऊस नसल्याने परिस्थिती प्रतिकूल आहे. - डॉ. एन.एम. काळे, विस्तार शिक्षण, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.