शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

उसाखालील ५० टक्के क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणणार

By admin | Updated: November 24, 2015 03:03 IST

राज्यातील कृषी क्षेत्राचा विकास आणि उत्पादन वाढीसाठी बहुतांशी क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

मुंबई : राज्यातील कृषी क्षेत्राचा विकास आणि उत्पादन वाढीसाठी बहुतांशी क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. उसाखालील किमान ५० टक्के क्षेत्र ठिंबक सिंचनाखाली आणण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे दिले.मंत्रालयात कृषी व पणन विभागाचा आढावा मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. या वेळी कृषी मंत्री एकनाथराव खडसे, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री राम शिंदे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्र १८.८७ लाख हेक्टर आहे. मात्र अवर्षण प्रवण क्षेत्र, अति उपसा झालेले पाणलोट क्षेत्र, जास्त पाण्याची आवश्यकता असणाऱ्या पिकांचे क्षेत्र याकडे आता प्राधान्याने लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे राज्यातील उसाखालील किमान ५० टक्के क्षेत्र ठिंबक सिंचनाखाली आणण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्याची गरज आहे. यासाठी साखर कारखान्यांचा सहभाग आवश्यक आहे. किमान पहिल्या टप्प्यात दोन हेक्टर क्षेत्राचा समावेश करावा आणि उसासाठी ठिंबक सिंचनाचा वापर करण्याला चालना देण्यासाठी प्रयत्न करावा. येत्या ५ वर्षांत ११.२५ लाख हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्न करावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या विकासासाठी पणन मंडळाच्या मूल्यमापनाची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले. या वेळी कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डी.के. जैन यांनी सादरीकरण केले. (विशेष प्रतिनिधी)