शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

उसाखालील ५० टक्के क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणणार

By admin | Updated: November 24, 2015 03:03 IST

राज्यातील कृषी क्षेत्राचा विकास आणि उत्पादन वाढीसाठी बहुतांशी क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

मुंबई : राज्यातील कृषी क्षेत्राचा विकास आणि उत्पादन वाढीसाठी बहुतांशी क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. उसाखालील किमान ५० टक्के क्षेत्र ठिंबक सिंचनाखाली आणण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे दिले.मंत्रालयात कृषी व पणन विभागाचा आढावा मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. या वेळी कृषी मंत्री एकनाथराव खडसे, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री राम शिंदे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्र १८.८७ लाख हेक्टर आहे. मात्र अवर्षण प्रवण क्षेत्र, अति उपसा झालेले पाणलोट क्षेत्र, जास्त पाण्याची आवश्यकता असणाऱ्या पिकांचे क्षेत्र याकडे आता प्राधान्याने लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे राज्यातील उसाखालील किमान ५० टक्के क्षेत्र ठिंबक सिंचनाखाली आणण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्याची गरज आहे. यासाठी साखर कारखान्यांचा सहभाग आवश्यक आहे. किमान पहिल्या टप्प्यात दोन हेक्टर क्षेत्राचा समावेश करावा आणि उसासाठी ठिंबक सिंचनाचा वापर करण्याला चालना देण्यासाठी प्रयत्न करावा. येत्या ५ वर्षांत ११.२५ लाख हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्न करावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या विकासासाठी पणन मंडळाच्या मूल्यमापनाची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले. या वेळी कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डी.के. जैन यांनी सादरीकरण केले. (विशेष प्रतिनिधी)