शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
5
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
6
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
7
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
8
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
9
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
10
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
11
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
12
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
13
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
14
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
15
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
16
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
17
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
18
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
19
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
20
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना

नाश्त्याच्या पोह्यातून ५० जणांना विषबाधा

By admin | Updated: April 23, 2017 14:43 IST

धार्मिक कार्यक्रमात नाश्त्यासाठी तयार केलेल्या पोह्यातून ५० जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे.

ऑनलाइन लोकमतमानवत (जि. परभणी ), दि. 23 - धार्मिक कार्यक्रमात नाश्त्यासाठी तयार केलेल्या पोह्यातून ५० जणांना विषबाधा झाल्याची घटना तालुक्यातील राजुरा येथे २२ एप्रिल रोजी १० वाजेच्या सुमारास घडली. या सर्व रुग्णांना परभणीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी रुग्णांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.मानवत तालुक्यातील राजुरा येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरु असून या कार्यक्रमात सकाळी १० वाजेच्या सुमारास नाश्त्यासाठी पोहे देण्यात आले. त्यापैकी काही जणांना दुपारी ४ नंतर उलट्या आणि मळमळ सुरु झाली. लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिकांना हा त्रास होत असल्याचे स्पष्ट झाले. शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास दोन जीप आणि शासकीय रुग्णवाहिकेने रुग्णांना परभणी येथील जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले. रविवारी या सर्वांची प्रकृती सुधारली असल्याचे सांगण्यात आले.शाम खंडागळे, धनंजय निर्वळ, अतुल निर्वळ, कल्याण सुरवसे, मुंजा निर्वळ, अजय निर्वळ, बापु निर्वळ, दिलीप निर्वळ, सुनील निर्वळ, रवि निर्वळ, सुधीर निर्वळ, अर्जून निर्वळ, मुंजा खंडागळे यांना विषबाधा झाल्याची माहिती मिळाली आहे.पोहे करण्यासाठी वापरलेली कढई गंजलेली असल्याने विषबाधा झाली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.