शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

५0 लाखांत फोडला पेपर!

By admin | Updated: March 1, 2017 05:42 IST

देशभरातील ५२ केंद्रांवर २६ फेब्रुवारी रोजी झालेल्या सैन्य भरतीची प्रश्नपत्रिका ५0 लाख रुपयांमध्ये फोडण्यात आली

ठाणे : देशभरातील ५२ केंद्रांवर २६ फेब्रुवारी रोजी झालेल्या सैन्य भरतीची प्रश्नपत्रिका ५0 लाख रुपयांमध्ये फोडण्यात आली होती, अशी प्राथमिक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. सशस्त्र दलाशी संबंधित असलेल्या या प्रकरणाच्या सूत्रधारापर्यंत पोहोचणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.सैन्य भरती मंडळातर्फे (आर्मी रिक्रुटमेंट बोर्ड) २६ फेब्रुवारी रोजी लिपिक आणि ट्रेड्समनसह ४ पदांसाठी देशभरात लेखी परीक्षा घेण्यात आली. ठाणे पोलिसांनी एकाच वेळी पुणे, नागपूर आणि गोव्यात धाड टाकून या परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश रविवारी केला होता. या प्रकरणी सैन्याच्या ४ आजी-माजी कर्मचाऱ्यांसह २१ आरोपींना अटक करण्यात आली आहे. सैन्य भरतीची तयारी करून घेणाऱ्या वेगवेगळ्या क्लासेसच्या ५ संचालकांचाही आरोपींमध्ये समावेश आहे. परीक्षार्थींपर्यंत प्रश्नपत्रिका पोहोचविण्याच्या गुन्ह्यात या संचालकांचाही मोठा सहभाग असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. परंतु, या संचालकांपर्यंत प्रश्नपत्रिका कुणी पोहोचवल्या या मुख्य प्रश्नाची उकल अद्याप व्हायची आहे. प्रश्नपत्रिका ५0 लाख रुपयांत फोडण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. परंतु, ती दिल्ली येथील सैन्य भरती मंडळाचे (आर्मी रिक्रुटमेंट बोर्ड) कार्यालयातून फुटली, प्रश्नपत्रिकांची छपाई करणाऱ्या छापखान्यातून फुटली की आणखी कुठून, याबाबत पोलिसांना सध्या तरी ठोस माहिती मिळालेली नाही. सध्या अटकेत असलेल्या सैन्याच्या ज्या कर्मचाऱ्यांनी प्रश्नपत्रिका सर्वांना पुरवल्या, त्यांना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे प्रश्नपत्रिका पाठविण्यात आली होती. सध्या अज्ञात असलेल्या या आरोपीने प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न कोऱ्या कागदावर लिहिले होते. कोऱ्या कागदावर प्रश्न उतरवताना प्रश्नांचा क्रम त्याने बदलवला होता. स्वहस्ताक्षरात लिहिलेला हा पेपर त्याने ५0 लाख रुपयांत फोडला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. ५0 लाख रुपयांत मिळालेल्या या प्रश्नपत्रिकेच्या आधारे कोट्यवधी रुपये कमविण्याचा कट टोळीने रचला होता. प्रश्नपत्रिकेच्या मोबदल्यात प्रत्येक परीक्षार्थीकडून साधारणत: ३ ते ४ लाख रुपये ते घेणार होते. परीक्षार्थी जास्त असले तर कमी रक्कम घेण्याची त्यांची योजना होती. ठाणे पोलिसांनी हा कट उधळल्यामुळे ही टोळी गजाआड झाली असली तरी त्यांच्या सूत्रधारापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांना बरेच अडथळे पार करावे लागणार आहेत. या प्रकरणातील आणखी काही महत्त्वाचे आरोपी सैन्याशी संबंधितही असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तपासामध्ये सैन्याकडून कसे सहकार्य मिळते यावरही बरेच काही अवलंबून राहणार आहे. (प्रतिनिधी)>सैन्याच्या गुप्तचर शाखेशी संपर्कसैन्य भरती घोटाळ्यातील आणखी काही आरोपी सैन्याशी संबंधित असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. त्यामुळे तपासादरम्यान ठाणे पोलिसांनी सैन्याशी नियमित संवाद ठेवला आहे. पोलीस यंत्रणेने सैन्य भरती मंडळाच्या संचालकांसह सैन्याच्या गुप्तचर शाखेशीही तपासकामी पत्रव्यवहार सुरू केला आहे. >विद्यार्थ्यांचा जीव टांगणीलापोलिसांनी रविवारी टाकलेल्या छाप्यात महाराष्ट्रातून ३0५ तर गोवा येथून ४५ विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले होते. या विद्यार्थ्यांची प्राथमिक चौकशी करून त्यांना सोडण्यात आले. छाप्यावेळी या प्रकरणातील आरोपींसोबत विद्यार्थीही सापडल्याने त्यांचीही भूमिका लवकरच तपासली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. आवश्यकतेनुसार त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केल्याने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.