शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

राज्यात ५० डिजिटल व्हिलेज !

By admin | Updated: November 6, 2015 02:26 IST

राज्यातील मेळघाटमधील हरिसाल हे गाव मायक्रोसॉफ्टच्या सहकार्यातून पहिले डिजिटल व्हिलेज ठरले आहे. अशाच प्रकारे २०१६ पर्यंत राज्यातील ५० गावे ‘डिजिटल व्हिलेज’ करण्याचे उद्दिष्ट

मुंबई : राज्यातील मेळघाटमधील हरिसाल हे गाव मायक्रोसॉफ्टच्या सहकार्यातून पहिले डिजिटल व्हिलेज ठरले आहे. अशाच प्रकारे २०१६ पर्यंत राज्यातील ५० गावे ‘डिजिटल व्हिलेज’ करण्याचे उद्दिष्ट असून मायक्रोसॉफ्ट कंपनीने त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.मायक्रोसॉफ्ट भारतात सुरू झाल्याच्या २५ व्या वर्षानिमित्त गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये परिषद झाली. त्यात मायक्रोसॉफ्ट इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भास्कर प्रामाणिक यांनी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली. या परिषदेसाठी मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांच्यासह देश-विदेशातील उद्योजक, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, पूर्वी उद्योग उभारण्यासाठी तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागत असे. ७६ परवानग्या घ्याव्या लागत. त्या आमच्या सरकारने ३७ वर आणल्या असून आता त्या २५ वर आणल्या जातील. उद्योगासाठीच्या परवानग्यांसाठी ‘ई-फ्लॅटफॉर्म’ तयार केला आहे. स्मार्ट व्हिलेजबरोबर स्मार्ट एमआयडीसी अंतर्गत राज्यातील उद्योग परिसरही स्मार्ट करण्यात येईल. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने राज्य सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. (विशेष प्रतिनिधी)