शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

5 रुपयांत पोट भरतं; छे..

By admin | Updated: July 5, 2014 23:16 IST

पाच रुपयांत पोट कसे काय भरेल. आणि ज्यांना हे शक्य वाटते; त्यांनी तशी जबाबदारी घेत पाच रुपयांत लोकांचे पोट भरून दाखवावे; अशा तिखिट प्रतिक्रिया मुंबईकरांनी ‘लोकमत’ला दिल्या आहेत.

 

मुंबई : ज्या मुंबापुरीत 1क् रुपयांना वडापाव आणि 7 रुपयांना कटींग मिळते; तेथे पाच रुपयांत पोट कसे काय भरेल. आणि ज्यांना हे शक्य वाटते; त्यांनी तशी जबाबदारी घेत पाच रुपयांत लोकांचे पोट भरून दाखवावे; अशा तिखिट प्रतिक्रिया मुंबईकरांनी  ‘लोकमत’ला दिल्या आहेत.
भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांनी भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ‘मुंबईत 5 रुपयांत पोट भरतं’ असे विधान केले आणि एकच वादळ उठले. या विधानावर मुंबईकरांशी संवाद साधला असता त्यांनी नाराजी व्यक्त केली. काँग्रेसची सत्ता असताना काँग्रेसचे नेते अशी विधाने करून सर्वसामान्यांना दुखवत होते. आता भाजपाची सत्ता आली आहे. त्यामुळे भाजपाचे नेते अशी विधाने करत सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत; अशा संमिश्र प्रतिक्रिया यावर सर्वसामान्यांनी दिल्या आहेत.
मालाड येथील विनोद घोलप यांनी सांगितले की, आजघडीला मुंबईमध्ये साधा वडापावदेखील दहा रुपयांमध्ये मिळतो. मग पाच रुपयांमध्ये पोट कसे काय भरेल. शेलार यांना म्हणजेच ओघाने भाजपाला, असे वाटत असले तर त्यांनी पन्नास लोकांची जबाबदारी घ्यावी. आणि दररोज पाच रुपयांत एका व्यक्तीचे पोट भरून दाखवावे. मग समजेलच की पाच रुपयांत पोट भरते की नाही ते.
बोरीवली येथील विपुल शहा यांनी सांगितले की, जेव्हा काँग्रेसचे नेते राज बब्बर यांनी  ‘मुंबईत बारा रुपयांत पोटभर जेवण मिळते.’ असे वक्तव्य केले होते. तेव्हा भाजपाने आकाश पाताळ एक केले होते. आता मात्र भाजपाची सत्ता आल्यानंतर शेलार यांनी असे वक्तव्य करून सर्वसामान्य माणसाला दुखावले आहे. मुंबईसारख्या शहरात पाच रुपयांत पोट भरणो मुश्कील आहे. शिवाय भाजपाला हे शक्य असेल तर त्यांनी दररोज शंभरएक माणसांची जबाबदारी घ्यावी. आणि पाच रुपयांत एका माणसाचे पोट भरून दाखवावे.
डोंगरी येथील निलेश शेळके यांनी सांगितले की, पाच रुपयांत साधा वडापावही मिळत नाही. कटिंगसाठी सात रुपये लागतात. मग पाच रुपयांत पोट कसे काय भरणार? हातगाडी ओढणा:या माणसाला विचारा की पोट भरण्यासाठी खिशात किती पैसे लागतात. आणि त्यांना जर वाटत असेल की, पाच रुपयांत पोट भरते तर त्यांनी तसे करून दाखवावे. मंत्रलय अथवा तत्सम सरकारी कार्यालयांमधील उपहारगृहात मात्र कमी पैशांत जेवण उपलब्ध होते. परंतू तो भाग निराळा आहे. (प्रतिनिधी)
 
तशी जबाबदारी घ्यावी..
च्कुर्ला येथील कप्तान मलिक यांनी सांगितले की, वडापाव दहा रुपयांत मिळतो. मग पाच रुपयांत पोट कसे भरेल. शेलार यांना तसे वाटत असेल तर त्यांनी तशी जबाबदारी घ्यावी आणि पाच रुपयांत लोकांची पोटं भरून दाखवावीत.
च्घाटकोपर येथील शैलेश शेट्टी यांनी सांगितले की, महागाई एवढी वाढली आहे. महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे. असे असताना पाच रुपयांत पोट कसे काय भरेल? आणि ज्यांना हे शक्य वाटते आणि त्यांनी ते करून दाखवावे.