शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

5 रुपयांत पोट भरतं; छे..

By admin | Updated: July 5, 2014 23:16 IST

पाच रुपयांत पोट कसे काय भरेल. आणि ज्यांना हे शक्य वाटते; त्यांनी तशी जबाबदारी घेत पाच रुपयांत लोकांचे पोट भरून दाखवावे; अशा तिखिट प्रतिक्रिया मुंबईकरांनी ‘लोकमत’ला दिल्या आहेत.

 

मुंबई : ज्या मुंबापुरीत 1क् रुपयांना वडापाव आणि 7 रुपयांना कटींग मिळते; तेथे पाच रुपयांत पोट कसे काय भरेल. आणि ज्यांना हे शक्य वाटते; त्यांनी तशी जबाबदारी घेत पाच रुपयांत लोकांचे पोट भरून दाखवावे; अशा तिखिट प्रतिक्रिया मुंबईकरांनी  ‘लोकमत’ला दिल्या आहेत.
भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांनी भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ‘मुंबईत 5 रुपयांत पोट भरतं’ असे विधान केले आणि एकच वादळ उठले. या विधानावर मुंबईकरांशी संवाद साधला असता त्यांनी नाराजी व्यक्त केली. काँग्रेसची सत्ता असताना काँग्रेसचे नेते अशी विधाने करून सर्वसामान्यांना दुखवत होते. आता भाजपाची सत्ता आली आहे. त्यामुळे भाजपाचे नेते अशी विधाने करत सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत; अशा संमिश्र प्रतिक्रिया यावर सर्वसामान्यांनी दिल्या आहेत.
मालाड येथील विनोद घोलप यांनी सांगितले की, आजघडीला मुंबईमध्ये साधा वडापावदेखील दहा रुपयांमध्ये मिळतो. मग पाच रुपयांमध्ये पोट कसे काय भरेल. शेलार यांना म्हणजेच ओघाने भाजपाला, असे वाटत असले तर त्यांनी पन्नास लोकांची जबाबदारी घ्यावी. आणि दररोज पाच रुपयांत एका व्यक्तीचे पोट भरून दाखवावे. मग समजेलच की पाच रुपयांत पोट भरते की नाही ते.
बोरीवली येथील विपुल शहा यांनी सांगितले की, जेव्हा काँग्रेसचे नेते राज बब्बर यांनी  ‘मुंबईत बारा रुपयांत पोटभर जेवण मिळते.’ असे वक्तव्य केले होते. तेव्हा भाजपाने आकाश पाताळ एक केले होते. आता मात्र भाजपाची सत्ता आल्यानंतर शेलार यांनी असे वक्तव्य करून सर्वसामान्य माणसाला दुखावले आहे. मुंबईसारख्या शहरात पाच रुपयांत पोट भरणो मुश्कील आहे. शिवाय भाजपाला हे शक्य असेल तर त्यांनी दररोज शंभरएक माणसांची जबाबदारी घ्यावी. आणि पाच रुपयांत एका माणसाचे पोट भरून दाखवावे.
डोंगरी येथील निलेश शेळके यांनी सांगितले की, पाच रुपयांत साधा वडापावही मिळत नाही. कटिंगसाठी सात रुपये लागतात. मग पाच रुपयांत पोट कसे काय भरणार? हातगाडी ओढणा:या माणसाला विचारा की पोट भरण्यासाठी खिशात किती पैसे लागतात. आणि त्यांना जर वाटत असेल की, पाच रुपयांत पोट भरते तर त्यांनी तसे करून दाखवावे. मंत्रलय अथवा तत्सम सरकारी कार्यालयांमधील उपहारगृहात मात्र कमी पैशांत जेवण उपलब्ध होते. परंतू तो भाग निराळा आहे. (प्रतिनिधी)
 
तशी जबाबदारी घ्यावी..
च्कुर्ला येथील कप्तान मलिक यांनी सांगितले की, वडापाव दहा रुपयांत मिळतो. मग पाच रुपयांत पोट कसे भरेल. शेलार यांना तसे वाटत असेल तर त्यांनी तशी जबाबदारी घ्यावी आणि पाच रुपयांत लोकांची पोटं भरून दाखवावीत.
च्घाटकोपर येथील शैलेश शेट्टी यांनी सांगितले की, महागाई एवढी वाढली आहे. महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे. असे असताना पाच रुपयांत पोट कसे काय भरेल? आणि ज्यांना हे शक्य वाटते आणि त्यांनी ते करून दाखवावे.