शहरं
Join us  
Trending Stories
1
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
2
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
3
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
4
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
5
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
6
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
7
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
8
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
9
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
10
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
11
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
12
'झुरळे गोपीनाथ' मंदिर ! ३०० वर्षांपूर्वीच्या मंदिरात झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास
13
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
14
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
15
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
16
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
17
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
18
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
19
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
20
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका

‘त्या’ कारखान्यांना दिवसाला ५ लाख दंड

By admin | Updated: January 3, 2016 02:40 IST

साखर कारखान्यांकडे १५ डिसेंबरपर्यंत गाळपास आलेल्या उसाला एफआरपीच्या ८० टक्के बिलाची रक्कम देणे बंधनकारक आहे. डिसेंबरअखेर ज्या कारखान्यांनी शेतकऱ्यांना पैसे

कोल्हापूर : साखर कारखान्यांकडे १५ डिसेंबरपर्यंत गाळपास आलेल्या उसाला एफआरपीच्या ८० टक्के बिलाची रक्कम देणे बंधनकारक आहे. डिसेंबरअखेर ज्या कारखान्यांनी शेतकऱ्यांना पैसे दिलेले नाहीत त्यांच्यावरील कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत दिली.एकरकमी रास्त आणि किफायतशीर किमतीवरून (एफआरपी) राज्यात त्रांगडे निर्माण झाले होते. शेतकरी संघटनांनी दोन पावले मागे घेत राज्य सरकारबरोबर चर्चा करून ८०:२०चा फार्म्युला निश्चित केला. एफआरपीच्या ८० टक्के पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना द्यायचे आणि उर्वरित २० टक्के दुसऱ्या टप्प्यात देण्याचे मान्य केले होते. पण गळीत हंगाम सुरू होऊन दोन महिने उलटले तरी कारखान्यांनी शेतकऱ्यांना पैसे दिलेले नाहीत. याबाबत सहकारमंत्र्यांना विचारले असता, किती कारखान्यांनी हे पैसे दिले त्याचा आढावा घेण्याचे काम विभागीय साखर सहसंचालकांच्या पातळीवर सुरू आहे. ज्यांनी दिलेले नाहीत, त्यांच्यावरील कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. संबंधित कारखान्याचे गाळप परवाने निलंबित करून त्यांच्याकडून दिवसाला ५ लाख रुपये दंड वसूल केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. बाजार समितीमधील अडत कोणी द्यायची, याबाबतच्या नेमलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झालेला आहे. याबाबत येत्या ८ ते १५ दिवसांत निर्णय घेण्यात येणार असल्याचेही पाटील म्हणाले. (प्रतिनिधी)