शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ कारखान्यांना दिवसाला ५ लाख दंड

By admin | Updated: January 3, 2016 02:40 IST

साखर कारखान्यांकडे १५ डिसेंबरपर्यंत गाळपास आलेल्या उसाला एफआरपीच्या ८० टक्के बिलाची रक्कम देणे बंधनकारक आहे. डिसेंबरअखेर ज्या कारखान्यांनी शेतकऱ्यांना पैसे

कोल्हापूर : साखर कारखान्यांकडे १५ डिसेंबरपर्यंत गाळपास आलेल्या उसाला एफआरपीच्या ८० टक्के बिलाची रक्कम देणे बंधनकारक आहे. डिसेंबरअखेर ज्या कारखान्यांनी शेतकऱ्यांना पैसे दिलेले नाहीत त्यांच्यावरील कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत दिली.एकरकमी रास्त आणि किफायतशीर किमतीवरून (एफआरपी) राज्यात त्रांगडे निर्माण झाले होते. शेतकरी संघटनांनी दोन पावले मागे घेत राज्य सरकारबरोबर चर्चा करून ८०:२०चा फार्म्युला निश्चित केला. एफआरपीच्या ८० टक्के पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना द्यायचे आणि उर्वरित २० टक्के दुसऱ्या टप्प्यात देण्याचे मान्य केले होते. पण गळीत हंगाम सुरू होऊन दोन महिने उलटले तरी कारखान्यांनी शेतकऱ्यांना पैसे दिलेले नाहीत. याबाबत सहकारमंत्र्यांना विचारले असता, किती कारखान्यांनी हे पैसे दिले त्याचा आढावा घेण्याचे काम विभागीय साखर सहसंचालकांच्या पातळीवर सुरू आहे. ज्यांनी दिलेले नाहीत, त्यांच्यावरील कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. संबंधित कारखान्याचे गाळप परवाने निलंबित करून त्यांच्याकडून दिवसाला ५ लाख रुपये दंड वसूल केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. बाजार समितीमधील अडत कोणी द्यायची, याबाबतच्या नेमलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झालेला आहे. याबाबत येत्या ८ ते १५ दिवसांत निर्णय घेण्यात येणार असल्याचेही पाटील म्हणाले. (प्रतिनिधी)