शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

४८ लाख टन उसाचे उत्पादन

By admin | Updated: January 25, 2016 02:57 IST

राज्यातील ९९ सहकारी व ७७ खासगी साखर कारखान्यांनी सुमारे ४४५ लाख टन उसाचे गाळप करत, ४८ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले आहे.

सोमेश्वरनगर (जि. पुणे) : राज्यातील ९९ सहकारी व ७७ खासगी साखर कारखान्यांनी सुमारे ४४५ लाख टन उसाचे गाळप करत, ४८ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले आहे. यंदा सरासरी १०.७० टक्के साखर उतारा मिळाला आहे, अशी माहिती साखर आयुक्तालयाने दिली आहे.पुढील अडीच महिन्यांत शेतातच उभ्या असलेल्या ३२५ लाख टन उसाचे वेळेत गाळप करण्याचे आव्हान साखर कारखान्यांपुढे आहे. राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन तीन महिने उलटले आहेत. मात्र, सर्व कारखान्यांचे मिळून ५५ ते ६० टक्के उसाचे गाळप करण्यात यश आले आहे. सद्यस्थितीत शेतात ४० ते ४५ टक्के ऊस उभा आहे. या वर्षी पाण्याची कमतरता पाहता, राज्यातील अनेक कारखाने पाण्याअभावी बंद पडण्याची भीती आहे. सोलापूर जिल्ह्यातील अनेक कारखाने पाण्याअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. मराठवाड्यातील ७० कारखान्यांपैकी ९० टक्के साखर कारखाने बंद स्थितीत आहेत. गेल्या चार वर्षांपासून मराठवाड्यात अपेक्षित पाऊस पडलेला नाही. एकाही धरणात पुरेसा पाणीसाठा नाही. बीडमधील माजलगाव धरणामध्ये गेल्या वर्षापासूनच शून्य टक्के पाणीसाठा आहे. बीड जिल्ह्यातील अवघे तीन साखर कारखाने सुरू आहेत. पाण्याअभावी ऊस वाळला आहे. त्यामुळे कारखानदारांना कारखाने बंद ठेवण्याशिवाय पर्यायच राहिला नाही. पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांपुढे चालू हंगामात ९० लाख टन उसाच्या गाळपाचा अंदाज होता. त्यापैकी ५४ लाख ३८ लाख २२९ टनाचे गाळप झाले आहे.सहकारातील तज्ज्ञांनी ९० लाख टनांचा केलेला अंदाज पाण्याच्या कमतरतेमुळे ८० लाख टनांवर येण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यात अजून २५ लाख टन ऊस शेतात उभा आहे, असेही आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे. (वार्ताहर)