शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
3
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
4
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
5
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
6
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
7
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
8
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
9
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
10
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
11
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
12
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
13
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
14
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
15
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
16
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
17
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
18
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
19
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
20
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना

४८ लाख टन उसाचे उत्पादन

By admin | Updated: January 25, 2016 02:57 IST

राज्यातील ९९ सहकारी व ७७ खासगी साखर कारखान्यांनी सुमारे ४४५ लाख टन उसाचे गाळप करत, ४८ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले आहे.

सोमेश्वरनगर (जि. पुणे) : राज्यातील ९९ सहकारी व ७७ खासगी साखर कारखान्यांनी सुमारे ४४५ लाख टन उसाचे गाळप करत, ४८ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले आहे. यंदा सरासरी १०.७० टक्के साखर उतारा मिळाला आहे, अशी माहिती साखर आयुक्तालयाने दिली आहे.पुढील अडीच महिन्यांत शेतातच उभ्या असलेल्या ३२५ लाख टन उसाचे वेळेत गाळप करण्याचे आव्हान साखर कारखान्यांपुढे आहे. राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन तीन महिने उलटले आहेत. मात्र, सर्व कारखान्यांचे मिळून ५५ ते ६० टक्के उसाचे गाळप करण्यात यश आले आहे. सद्यस्थितीत शेतात ४० ते ४५ टक्के ऊस उभा आहे. या वर्षी पाण्याची कमतरता पाहता, राज्यातील अनेक कारखाने पाण्याअभावी बंद पडण्याची भीती आहे. सोलापूर जिल्ह्यातील अनेक कारखाने पाण्याअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. मराठवाड्यातील ७० कारखान्यांपैकी ९० टक्के साखर कारखाने बंद स्थितीत आहेत. गेल्या चार वर्षांपासून मराठवाड्यात अपेक्षित पाऊस पडलेला नाही. एकाही धरणात पुरेसा पाणीसाठा नाही. बीडमधील माजलगाव धरणामध्ये गेल्या वर्षापासूनच शून्य टक्के पाणीसाठा आहे. बीड जिल्ह्यातील अवघे तीन साखर कारखाने सुरू आहेत. पाण्याअभावी ऊस वाळला आहे. त्यामुळे कारखानदारांना कारखाने बंद ठेवण्याशिवाय पर्यायच राहिला नाही. पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांपुढे चालू हंगामात ९० लाख टन उसाच्या गाळपाचा अंदाज होता. त्यापैकी ५४ लाख ३८ लाख २२९ टनाचे गाळप झाले आहे.सहकारातील तज्ज्ञांनी ९० लाख टनांचा केलेला अंदाज पाण्याच्या कमतरतेमुळे ८० लाख टनांवर येण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यात अजून २५ लाख टन ऊस शेतात उभा आहे, असेही आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे. (वार्ताहर)