शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

रत्नागिरीत १०७ जागांसाठी ४७३ उमेदवार

By admin | Updated: October 31, 2016 05:26 IST

जिल्ह्यातील चार नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीसाठीच्या १०७ जागांसाठी तब्बल विक्रमी ४७३ उमेदवारी अर्ज दाखल झाले

रत्नागिरी : जिल्ह्यातील चार नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीसाठीच्या १०७ जागांसाठी तब्बल विक्रमी ४७३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल करण्याची शनिवार ही शेवटची मुदत असल्याने सर्वच ठिकाणी उमेदवारांची तुडुंब गर्दी झाली होती. चार नगरपरिषदांमध्ये होणाऱ्या थेट नगराध्यक्ष निवडणुकीसाठी २५ अर्ज दाखल झाले आहेत.रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी, चिपळूण, खेड, राजापूर या चार नगरपरिषदांची आणि दापोली नगरपंचायतीची निवडणूक २७ नोव्हेंबरला होत आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शनिवार शेवटचा दिवस होता. त्यामुळे सर्वच ठिकाणी उमेदवारांची रीघ लागली होती. रत्नागिरीमध्ये नगरसेवकांच्या ३0 जागांसाठी १२0 अर्ज दाखल झाले आहेत. नगराध्यक्ष निवडणुकीसाठी ११ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. सर्वाधिक जागा रत्नागिरी नगरपरिषदेतच असल्याने येथील निवडणूक अधिक चुरशीची होणार आहे. शिवसेना, भाजप स्वबळावर लढत असून, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आघाडी केली आहे. (प्रतिनिधी)>चिपळूणमध्ये सर्व पक्षांची स्वबळावर लढतचिपळूणमध्ये २६ जागांसाठी ११३ अर्ज दाखल झाले आहेत, तर नगराध्यक्षपदासाठी ५ अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांची जास्त गर्दी झाल्यामुळे सायंकाळी ७ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याचे काम सुरू होते. येथे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे चार पक्ष स्वबळावर लढत आहेत. राष्ट्रवादीतील अंतर्गत वादामुळे यावेळी राष्ट्रवादीतील काही मंडळी शिवसेनेला सहकार्य करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.>सेनेला कडवे आव्हानखेडमध्ये नगरसेवकांच्या १७ जागांसाठी ६३ उमेदवारांनी आणि नगराध्यक्षपदासाठी ६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. येथे मनसे आणि राष्ट्रवादीने शहर विकास आघाडी केल्यामुळे शिवसेनेला कडवे आव्हान उभे झाले आहे. भाजप येथेही स्वबळावर लढत आहे. दापोली नगरपंचायतीमध्ये १७ जागांसाठी १0८ अर्ज दाखल झाले आहेत. खेड अणि राजापूरमध्ये अर्जांची संख्या कमी असली तरी दापोलीमध्ये मात्र ही संख्या मोठी आहे.२ नोव्हेंबरला या उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. ११ नोव्हेंबर ही अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.>नगरसेवकपदासाठी विक्रमी अर्जनगर परिषदजागाअर्जरत्नागिरी३0१२0चिपळूण२६११३खेड१७६३राजापूर१७६९दापोली१७१0८अर्थात या आघाडीतील जागा वाटपावर अजून अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. रत्नागिरीत जनजागृती संघाने निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली असून, काही अपक्ष उमेदवार या संघाकडून उभे केले आहेत.