शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

४५० कोटी थकविले

By admin | Updated: April 10, 2017 05:40 IST

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत गरीब विद्यार्थ्यांनाही चांगल्या इंग्रजी शाळेत शिक्षण घेता यावे, यासाठी सरकारने

बदलापूर : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत गरीब विद्यार्थ्यांनाही चांगल्या इंग्रजी शाळेत शिक्षण घेता यावे, यासाठी सरकारने कायदा केला. मात्र, सरकारने कायदा केला असला, तरी त्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. आरटीईअंतर्गत २५ टक्के प्रवेश गरीब विद्यार्थ्यांना दिले जातात. मात्र, त्याच्या मोबदल्यात या शाळांना फीचा परतावा करण्याची जबाबदारी सरकारची आहे. मात्र, राज्य सरकारने महाराष्ट्रातील इंग्रजी शाळांचे तब्बल ४५० कोटी थकवले आहे. सरकारकडून हा परतावा येण्यास विलंब होत असल्याने आता इंग्रजी शाळा या अडचणीत सापडत असल्याचा आरोप महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनचे अध्यक्ष संजय तायडे-पाटील यांनी केला. महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनच्या वतीने ‘जिल्हा मेळावा’ अंबरनाथमध्ये झाला. या मेळाव्याचे अध्यक्षस्थान मेस्टाचे संस्थापक-अध्यक्ष तायडे-पाटील यांनी, तर मुंबई प्रदेशाध्यक्ष विनोद कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष पुन्नालूर के. वसंतन, अनिल असळकर, महेश्वरी यांची प्रमुख उपस्थिती होती. पाटील म्हणाले की, सीबीएसई शाळा १ एप्रिलपासून सुरू झाल्या असून सर्व विद्यार्थ्यांनी पुस्तके व शालेय साहित्य विकत घेतलेले आहे. अभ्यासक्र माला सुरुवातही झाली असताना आता सरकारने आदेश काढून ‘एनसीईआरटीची पुस्तके’वापरण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे आता पालकांची आणि शाळेची तारांबळ उडत आहे, असे त्यांनी सांगितले. शाळांसाठी स्वतंत्र संरक्षण कायदा करावा, पीटीई स्थापन करताना शुल्क विनियम कायदा रद्द किंवा शिथिल करावा, उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पूर्व प्राथमिक प्रवेशाचा मागील चार वर्षांचा फी परतावा द्यावा, एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेण्याच्यावेळी पूर्वीच्या शाळेचा दाखला अनिवार्य करण्यात यावा, सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांवर होणारा प्रतिविद्यार्थी खर्च अंदाजे ६० हजारांपेक्षा जास्त होतो. हा खर्च किंवा शाळेने ठरवलेली फी यापैकी जी रक्कम कमी असेल, ती आरटीईप्रमाणे मोफत प्रवेश घेणाऱ्या मुलांना तत्काळ द्यावी. ज्या इमारतीमध्ये शाळा चालते, त्या इमारतीला व्यावसायिक दराने वीजबिल व शाळांवर लादलेले सर्व प्रकारचे कर रद्द करण्यात यावेत. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांना रोड टॅक्सव्यतिरिक्त कोणतेही कर लावू नयेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळांना स्थलांतरणाची परवानगी देण्यात यावी. विद्यार्थ्यांना सोयीसुविधा पुरवण्याची आणि लोकप्रतिनिधींचा निधी वापरण्याची परवानगी द्यावी. आरटीईनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना यापुढील प्रवेशाचा फी परतावा देण्याचीही मागणी आहे. (प्रतिनिधी)काय आहेत मागण्या?शाळांसाठी स्वतंत्र संरक्षण कायदा करावा, पीटीई स्थापन करताना शुल्क विनियम कायदा रद्द किंवा शिथिल करावा, उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पूर्व प्राथमिक प्रवेशाचा मागील चार वर्षांचा फी परतावा द्यावा, एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेण्याच्यावेळी पूर्वीच्या शाळेचा दाखला अनिवार्य करण्यात यावा, यांसह अन्य अनेक मागण्यांबाबत महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनचे अध्यक्ष संजय तायडे-पाटील पाठपुरावा करत आहेत.