शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

४५० कोटी थकविले

By admin | Updated: April 10, 2017 05:40 IST

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत गरीब विद्यार्थ्यांनाही चांगल्या इंग्रजी शाळेत शिक्षण घेता यावे, यासाठी सरकारने

बदलापूर : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत गरीब विद्यार्थ्यांनाही चांगल्या इंग्रजी शाळेत शिक्षण घेता यावे, यासाठी सरकारने कायदा केला. मात्र, सरकारने कायदा केला असला, तरी त्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. आरटीईअंतर्गत २५ टक्के प्रवेश गरीब विद्यार्थ्यांना दिले जातात. मात्र, त्याच्या मोबदल्यात या शाळांना फीचा परतावा करण्याची जबाबदारी सरकारची आहे. मात्र, राज्य सरकारने महाराष्ट्रातील इंग्रजी शाळांचे तब्बल ४५० कोटी थकवले आहे. सरकारकडून हा परतावा येण्यास विलंब होत असल्याने आता इंग्रजी शाळा या अडचणीत सापडत असल्याचा आरोप महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनचे अध्यक्ष संजय तायडे-पाटील यांनी केला. महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनच्या वतीने ‘जिल्हा मेळावा’ अंबरनाथमध्ये झाला. या मेळाव्याचे अध्यक्षस्थान मेस्टाचे संस्थापक-अध्यक्ष तायडे-पाटील यांनी, तर मुंबई प्रदेशाध्यक्ष विनोद कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष पुन्नालूर के. वसंतन, अनिल असळकर, महेश्वरी यांची प्रमुख उपस्थिती होती. पाटील म्हणाले की, सीबीएसई शाळा १ एप्रिलपासून सुरू झाल्या असून सर्व विद्यार्थ्यांनी पुस्तके व शालेय साहित्य विकत घेतलेले आहे. अभ्यासक्र माला सुरुवातही झाली असताना आता सरकारने आदेश काढून ‘एनसीईआरटीची पुस्तके’वापरण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे आता पालकांची आणि शाळेची तारांबळ उडत आहे, असे त्यांनी सांगितले. शाळांसाठी स्वतंत्र संरक्षण कायदा करावा, पीटीई स्थापन करताना शुल्क विनियम कायदा रद्द किंवा शिथिल करावा, उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पूर्व प्राथमिक प्रवेशाचा मागील चार वर्षांचा फी परतावा द्यावा, एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेण्याच्यावेळी पूर्वीच्या शाळेचा दाखला अनिवार्य करण्यात यावा, सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांवर होणारा प्रतिविद्यार्थी खर्च अंदाजे ६० हजारांपेक्षा जास्त होतो. हा खर्च किंवा शाळेने ठरवलेली फी यापैकी जी रक्कम कमी असेल, ती आरटीईप्रमाणे मोफत प्रवेश घेणाऱ्या मुलांना तत्काळ द्यावी. ज्या इमारतीमध्ये शाळा चालते, त्या इमारतीला व्यावसायिक दराने वीजबिल व शाळांवर लादलेले सर्व प्रकारचे कर रद्द करण्यात यावेत. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांना रोड टॅक्सव्यतिरिक्त कोणतेही कर लावू नयेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळांना स्थलांतरणाची परवानगी देण्यात यावी. विद्यार्थ्यांना सोयीसुविधा पुरवण्याची आणि लोकप्रतिनिधींचा निधी वापरण्याची परवानगी द्यावी. आरटीईनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना यापुढील प्रवेशाचा फी परतावा देण्याचीही मागणी आहे. (प्रतिनिधी)काय आहेत मागण्या?शाळांसाठी स्वतंत्र संरक्षण कायदा करावा, पीटीई स्थापन करताना शुल्क विनियम कायदा रद्द किंवा शिथिल करावा, उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पूर्व प्राथमिक प्रवेशाचा मागील चार वर्षांचा फी परतावा द्यावा, एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेण्याच्यावेळी पूर्वीच्या शाळेचा दाखला अनिवार्य करण्यात यावा, यांसह अन्य अनेक मागण्यांबाबत महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनचे अध्यक्ष संजय तायडे-पाटील पाठपुरावा करत आहेत.