शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळसाठी ४५० कोटींचे ‘पॉवर पॅकेज’

By admin | Updated: May 3, 2015 00:48 IST

जिल्ह्यातील वीज वितरणाची समस्या दूर करण्यासाठी तब्बल ४५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये २५० कोटी रुपये पाच सब सेंटरसाठी

यवतमाळ : जिल्ह्यातील वीज वितरणाची समस्या दूर करण्यासाठी तब्बल ४५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये २५० कोटी रुपये पाच सब सेंटरसाठी, १०० कोटी रुपये इन्फ्रास्ट्रक्चर वाढविण्यासाठी, ५५ कोटी कृषीच्या वीज जोडणीसाठी आणि ३३ कोटी फिडर सेप्रेशनसाठी खर्च करणार असल्याचे ऊर्जा राज्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत सांगितले.यवतमाळ जिल्ह्याच्या मागासलेपणासाठी ऊर्जा खाते जबाबदार असल्याची कबुली देत ऊर्जामंत्री म्हणाले, येथे फिडर सेप्रेशनचे काम न झाल्यामुळे तब्बल २०० गावांना भारनियमन सोसावे लागत आहे. ज्या कंपन्यांनी अर्धवट काम सोडून पळ काढला, त्या आयव्हीआरसीएल आणि नागार्जुन यांना ब्लॅक लिस्टेड करण्यात आले आहे. जिल्ह्यात ट्रान्समिशन वाढविण्यासाठी २२० केव्हीचे सहा सब सेंटर प्रस्तावित आहेत. मारेगाव, बाभूळगाव, राळेगाव, मुकुटबन येथे प्रत्येकी १३२ केव्हीचे तर नेर, पांढरकवडा येथे २२० केव्हीचे सब सेंटर मंजूर करण्यात आले आहे. याशिवाय कृषीच्या वीज जोडणीसाठी ५५ कोटींची तरतूद केली असून धडक सिंचनच्या सहा हजार विहिरींना तसेच प्रलंबित असलेल्या ९९०० वीज जोडण्या निकाली काढण्यात येणार आहे. येत्या वर्षभरात हे काम पूर्ण केले जाणार आहे. ३१ मार्च २०१६ पर्यंत १०० कोटींचे इन्फ्रास्ट्रक्चर तयार केले जाणार आहे. आणखी येणाऱ्या १५०० वीज जोडणीसाठी ट्रान्समिशन मजबूत करण्याची गरज आहे. ३१ मार्च २०१६ पर्यंत जिल्ह्यातील वीजसमस्या निकाली काढण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. ३० डिसेंबर २०१६ नंतर शेतकऱ्यांना कृषिपंपाच्या वीज कनेक्शनचा प्रस्ताव सादर करताच सात दिवसांच्या आत वीजजोडणी देण्यात येईल, अशीही ग्वाही त्यांनी दिली. वीजचोरी थांबविण्यासाठी सोशल इंजिनीअरिंंगचा प्रयोग राबविण्यात येणार आहे. ग्राहक सेवा मजबूत करण्यात येईल. आज एका जेईकडे पाच कर्मचारी असून अनेक फिडरचा प्रभार त्यांच्यावर आहे. त्यामुळे सर्वत्र बेबंदशाही निर्माण झाली आहे. बीई इलेक्ट्रिकल झालेल्या बेरोजगार अभियंत्यांना यापुढे आर्थिक वर्षात १५ लाखांची तीन कामे दिली जातील. पुढे हे बेरोजगार अभियंते दीड कोटीची कामे घेण्यासाठी पात्र होतील. स्थानिक पातळीवरचे अभियंते असल्याने कामातील उणिवा दूर होतील, असेही त्यांनी सांगितले.