शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

४५ मिनिटांचा प्रवास आता ६ मिनिटांत

By admin | Updated: April 30, 2016 02:07 IST

मुंबई महापालिकेतर्फे बांधण्यात आलेला गोरेगाव येथील मृणालताई गोरे उड्डाणपूल शनिवारी (३० एप्रिल) वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार

मुंबई : मुंबई महापालिकेतर्फे बांधण्यात आलेला गोरेगाव येथील मृणालताई गोरे उड्डाणपूल शनिवारी (३० एप्रिल) वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असून, हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर गोरेगाव पश्चिम ते गोरेगाव पूर्वेकडील प्रवासासाठी केवळ सहा मिनिटांचा कालावधी लागणार आहे. तत्पूर्वी हेच अंतर कापण्यासाठी तब्बल ३५ ते ४५ मिनिटांचा कालावधी लागत होता.गोरेगाव पूर्व-पश्चिमेला जोडणारा उड्डाणपूल मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प (एमयूटीपी) योजनेंतर्गत २००४ साली प्रस्तावित करण्यात आला. हा प्रकल्प २००८ मध्ये मुंबई महापालिकेकडे हस्तांरित करण्यात आला. प्रकल्पग्रस्त, अतिक्रमणे, झोपडपट्टी व रेल्वे खात्याची परवानगी या सर्व बाबींवर प्रशासकीय व तांत्रिक अडचणी जलद पाठपुराव्यानिशी दूर करून या पुलाच्या बांधकामासाठी परवानगी घेण्यात आली. निवासी २१८, व्यावसायिक १४० अशी एकूण ३५८ अतिक्रमणे या प्रकल्पाच्या मार्गामधील प्रमुख अडचणी होत्या. ही अतिक्रमणे हटवून/ पुनर्स्थापन करून हा प्रकल्प मार्गी लावण्यात आला. (प्रतिनिधी)>गोरेगाव पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलामुळे स्वामी विवेकानंद मार्ग ते पश्चिम द्रुतगती महामार्ग या दरम्यान पूर्व-पश्चिम अशी अतिरिक्त मार्गाची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे स्वामी विवेकानंद मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. ओशिवरा रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी अतिरिक्त रस्तादेखील या माध्यमातून उपलब्ध झाला आहे. गोरेगाव पश्चिम ते वांद्रे-वरळी सागरी सेतूपर्यंत विनाअडथळा वाहतूक शक्य होणार आहे.>२००९ साली महापालिकेतर्फे या उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले. अतिरिक्त मार्गिका आणि चढ/उतारांसह सुमारे २.३ किलोमीटर लांबीचा हा उड्डाणपूल आता पूर्ण झाला आहे. पुलाच्या रुंदीमध्ये ४ पदरी मार्गिका, उत्तर दिशेला जाणाऱ्या वाहतुकीकरिता ४ मीटर रुंदीची पूर्व भागातील मार्गिका तसेच भविष्यातील स्वामी विवेकानंद मार्गाच्या पश्चिमेस होणाऱ्या विस्तारासाठी ७.५ मीटर रुंदीच्या दोन मार्गिकांचा समावेश आहे.>सामाजिक, राजकीय चळवळीतील नेत्या, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेतेपद, खासदारपद भूषविलेल्या आणि जनमानसात लोकप्रिय असलेल्या मृणालताई गोरे यांच्या विविध क्षेत्रांतील योगदानाची स्मृती चिरंतर राहावी म्हणून या उड्डाणपुलाला त्यांचे नाव देण्यात आले आहे.