शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

४५ मिनिटांचा प्रवास आता ६ मिनिटांत

By admin | Updated: April 30, 2016 02:07 IST

मुंबई महापालिकेतर्फे बांधण्यात आलेला गोरेगाव येथील मृणालताई गोरे उड्डाणपूल शनिवारी (३० एप्रिल) वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार

मुंबई : मुंबई महापालिकेतर्फे बांधण्यात आलेला गोरेगाव येथील मृणालताई गोरे उड्डाणपूल शनिवारी (३० एप्रिल) वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असून, हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर गोरेगाव पश्चिम ते गोरेगाव पूर्वेकडील प्रवासासाठी केवळ सहा मिनिटांचा कालावधी लागणार आहे. तत्पूर्वी हेच अंतर कापण्यासाठी तब्बल ३५ ते ४५ मिनिटांचा कालावधी लागत होता.गोरेगाव पूर्व-पश्चिमेला जोडणारा उड्डाणपूल मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प (एमयूटीपी) योजनेंतर्गत २००४ साली प्रस्तावित करण्यात आला. हा प्रकल्प २००८ मध्ये मुंबई महापालिकेकडे हस्तांरित करण्यात आला. प्रकल्पग्रस्त, अतिक्रमणे, झोपडपट्टी व रेल्वे खात्याची परवानगी या सर्व बाबींवर प्रशासकीय व तांत्रिक अडचणी जलद पाठपुराव्यानिशी दूर करून या पुलाच्या बांधकामासाठी परवानगी घेण्यात आली. निवासी २१८, व्यावसायिक १४० अशी एकूण ३५८ अतिक्रमणे या प्रकल्पाच्या मार्गामधील प्रमुख अडचणी होत्या. ही अतिक्रमणे हटवून/ पुनर्स्थापन करून हा प्रकल्प मार्गी लावण्यात आला. (प्रतिनिधी)>गोरेगाव पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलामुळे स्वामी विवेकानंद मार्ग ते पश्चिम द्रुतगती महामार्ग या दरम्यान पूर्व-पश्चिम अशी अतिरिक्त मार्गाची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे स्वामी विवेकानंद मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. ओशिवरा रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी अतिरिक्त रस्तादेखील या माध्यमातून उपलब्ध झाला आहे. गोरेगाव पश्चिम ते वांद्रे-वरळी सागरी सेतूपर्यंत विनाअडथळा वाहतूक शक्य होणार आहे.>२००९ साली महापालिकेतर्फे या उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले. अतिरिक्त मार्गिका आणि चढ/उतारांसह सुमारे २.३ किलोमीटर लांबीचा हा उड्डाणपूल आता पूर्ण झाला आहे. पुलाच्या रुंदीमध्ये ४ पदरी मार्गिका, उत्तर दिशेला जाणाऱ्या वाहतुकीकरिता ४ मीटर रुंदीची पूर्व भागातील मार्गिका तसेच भविष्यातील स्वामी विवेकानंद मार्गाच्या पश्चिमेस होणाऱ्या विस्तारासाठी ७.५ मीटर रुंदीच्या दोन मार्गिकांचा समावेश आहे.>सामाजिक, राजकीय चळवळीतील नेत्या, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेतेपद, खासदारपद भूषविलेल्या आणि जनमानसात लोकप्रिय असलेल्या मृणालताई गोरे यांच्या विविध क्षेत्रांतील योगदानाची स्मृती चिरंतर राहावी म्हणून या उड्डाणपुलाला त्यांचे नाव देण्यात आले आहे.