शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

राज्यात दोन महिन्यांत ४४१ बालमृत्यू

By admin | Updated: July 16, 2016 01:15 IST

आरोग्याच्या असंख्य योजना आणि कोट्यवधी रुपयांची तरतूद असतानाही राज्यातील बालमृत्यूचे प्रमाण मात्र खूप मोठे असल्याचे राज्य कुटुंबकल्याणकडून मिळालेल्या आकडेवारीवरून समोर आले

पुणे : आरोग्याच्या असंख्य योजना आणि कोट्यवधी रुपयांची तरतूद असतानाही राज्यातील बालमृत्यूचे प्रमाण मात्र खूप मोठे असल्याचे राज्य कुटुंबकल्याणकडून मिळालेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे. ही संख्या थोडीथोडकी नसून दोन महिन्यांत राज्यात विविध कारणांनी ४४१ बालकांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आदिवासी भागातील जनतेच्या आरोग्यात सुधारणा करण्याच्या हेतूने राज्यभरात नवसंजीवनी योजना राबविण्यात येते. यामध्ये आदिवासी जनतेला आरोग्याच्या सुविधा पुरविणे, पिण्याचे शुद्ध व पुरेसे पाणी उपलब्ध करून देणे, अन्नधान्यपुरवठा निश्चित करून योग्य आहार देणे, कुपोषित बालकांवर वेळीच योग्य ते उपचार करणे अशा प्रकारच्या सुविधा राज्य शासनाकडून पुरविल्या जातात. गरोदर माता व अर्भकमृत्यू कमी करणे हा या योजनेमागील मूळ उद्देश असून तो साध्य होत नसल्याचेच उघडपणे समोर येत आहे. यामध्येही ० ते १ वर्षे वयोगटातील ३५० बालकांचा, तर १ ते ६ वर्षे वयोगटातील ९१ बालकांचा मृत्यू झाला आहे. नंदुरबार येथे सवार्धिक म्हणजे एप्रिल व मे या केवळ दोन महिन्यांत ८४ बालके मृत्युमुखी पडली असून सर्वात कमी म्हणजे ३ बालमृत्यू हे जळगाव येथे झाले आहेत. महाराष्ट्र राज्याचा बालमृत्यूदर दर हजारी जन्मदरामागे २४ इतका असून इतर राज्यांच्या तुलनेत हा कमी असल्याचे कुटुंब कल्याण विभागाकडून सांगण्यात आले. मात्र मागील जवळपास २० वर्षांपासून चालविण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत एकूण १६ जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यात येते. यामध्ये १०३ ग्रामीण रुग्णालये, ४११ प्राथमिक आरोग्य केंद्रे, २३२२ उपकेंद्रे व १३६८१ अंगणवाड्यांमध्ये योजनेमधील विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.