शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
3
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
4
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
5
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
6
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
7
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
8
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
9
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
10
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
11
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
12
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
13
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
14
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
15
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
16
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
17
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
18
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
19
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
20
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...

नीरा-देवघर धरणात ४४ टक्के पाणीसाठा

By admin | Updated: February 27, 2017 00:56 IST

नीरा-देवघर (ता़ भोर) धरणातून दीड महिन्यापूर्वी नदीपात्रात, तर दहा दिवसांपूर्वी डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले.

नेरे : नीरा-देवघर (ता़ भोर) धरणातून दीड महिन्यापूर्वी नदीपात्रात, तर दहा दिवसांपूर्वी डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले. या पाण्याचा उपयोग धरणाच्या खालील पट्ट्यातील शेतकऱ्यांना रब्बी पिकासाठी झाला असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे़ मात्र, सध्या धरणाची पाणीपातळी झपाट्याने कमी होत असून पाणीसाठा ४४ टक्के आहे.नीरा-देवघर धरण भोर तालुक्यासाठी वरदान ठरत असले, तरी नदीपात्रात व कालव्याद्वारे पाणी सोडण्याचे नियोजन नसल्याने पाण्याची नासाडी होत आहे़ कालव्याचे अस्तरीकरणाचे काम अर्धवट असल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे़ या कालव्या खालील शेतकऱ्यांच्या शेतात पावसाळ्याप्रमाणे पाणी साठून राहत आहे़ यामुळे शेतात आलेल्या पिकांची नासाडी होत आहे़ यावर्षी शंभर टक्के धरण भरूनही नियोजनाअभावी फेब्रवारीच्या शेवटच्या आठवड्यातच धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे़ उन्हाळ्याचे अजून तीन महिने बाकी आहेत. मात्र, कालव्यातून गळती होणारे पाणी थांबवले नाही तर ते पाणी वाया जाऊन पुढील काळात पाणी पुरेल की नाही, अशी चिंता शेतकरी व भागातील नागरिकांना लागून राहिली आहे.