शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
5
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
6
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
7
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
8
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
9
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
10
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
11
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
12
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
13
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
14
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
15
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
16
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
17
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
18
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
19
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
20
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ

४00 लग्नातून बॅण्डबाजा, फटाके, घोडा हद्दपार!

By admin | Updated: July 13, 2014 21:38 IST

लाखो रुपयांची बचत: विदर्भ-खान्देशात बारी समाजाने उभा केला आदर्श

जळगाव जामोद: लग्नामधून बॅण्डबाजा, फटाके व घोडा हद्दपार करण्याचा अनुसरणीय निर्णय घेत, विदर्भ व खान्देशातील बारी समाजाने उभ्या महाराष्ट्रापुढे एक चांगला आदर्श ठेवला आहे. गेल्या लग्नसराईच्या हंगामात विदर्भ व खान्देशात, बारी समाजातील ३00 विवाह सोहळे या निर्णयाला अनुसरून पार पडले. बारी समाजाचा आदर्श समोर ठेवून इतर काही समाजातही सुमारे १00 विवाह याच पद्धतीने पार पडले. या क्रांतीकारी निर्णयामुळे अनेक कुटुंबांची लाखो रुपयांची बचत झाली आणि सोबतच परंपरागत अनिष्ट चालिरितींनाही फाटा मिळाला. बारी समाजाच्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत झाले. इतर काही समाजांनीही त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला. सत्यशोधक ओबीसी परिषदेने माळी समाजातही हा निर्णय राबविण्याचा प्रयत्न केला. कुणबी, पाटील या मोठ्या समाजांसह काही लहान समाजांनीही या निर्णयाचे स्वागत केले; मात्र फार मोठय़ा प्रमाणात त्याचा अं गिकार झाला नाही. बारी समाजात मात्र या निर्णयाची चांगली अंमलबजावणी झाली. बारी समाजातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील जळगाव जामोद, संग्रामपूर, अकोट, अंजनगाव, अमरावती, यवतमाळ या भागांमधील बारी समाजबांधवांनी हा विचार स्वीकारला. खान्देशमध्ये वडोदा, कुर्‍हा, शेंदुर्णीसह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात, बारी समाजाने बॅण्डबाजा, घोडा आणि फटाके हद्दपार करुन लग्ने लावली. बारी समाजात ३00 पेक्षा जास्त लग्न या तत्वानुसार झाली, तर इतर काही समाजांमध्येही सुमारे १00 लग्ने बॅण्डबाजा, घोडा आणि फटाक्यांना फाटा देत लागली. या निर्णयाचा अंगिकार करणार्‍या प्रत्येक वरपित्याची किमान ३0 ते ४0 हजार रुपयांची बचत झाली. त्याचबरोबर लग्न वेळेवर लागली, दारु पिऊन धिंगाणा घालणारे तरुण दिसले नाहीत आणि लग्नात मानपानासाठी वाद झाले नाहीत, तसेच रुसवे-फुगवे दिसले नाहीत. त्याशिवाय ध्वनी प्रदूषणाला आळा बसला तो वेगळाच! या निर्णयाचे बिजारोपण झालेल्या जळगाव जामोद व संग्रामपूर त्या दोन तालुक्यातच, पुढील लग्नसराईत या तत्वावर किमान १00 लग्न पार पडतील.** २२ नवरदेवांचा सत्कारया निर्णयाचा अंगीकार करुन बारी समाजातील यंदाच्या हंगामात लग्न झालेल्या २२ नवरदेवांचा, बारी समाजाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी ही परंपरा भविष्यातही अशीच सुरू ठेवून, इतर समाजांपुढे आदर्श निर्माण करण्याचे आवाहन करण्यात आले.