शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

४00 लग्नातून बॅण्डबाजा, फटाके, घोडा हद्दपार!

By admin | Updated: July 13, 2014 21:38 IST

लाखो रुपयांची बचत: विदर्भ-खान्देशात बारी समाजाने उभा केला आदर्श

जळगाव जामोद: लग्नामधून बॅण्डबाजा, फटाके व घोडा हद्दपार करण्याचा अनुसरणीय निर्णय घेत, विदर्भ व खान्देशातील बारी समाजाने उभ्या महाराष्ट्रापुढे एक चांगला आदर्श ठेवला आहे. गेल्या लग्नसराईच्या हंगामात विदर्भ व खान्देशात, बारी समाजातील ३00 विवाह सोहळे या निर्णयाला अनुसरून पार पडले. बारी समाजाचा आदर्श समोर ठेवून इतर काही समाजातही सुमारे १00 विवाह याच पद्धतीने पार पडले. या क्रांतीकारी निर्णयामुळे अनेक कुटुंबांची लाखो रुपयांची बचत झाली आणि सोबतच परंपरागत अनिष्ट चालिरितींनाही फाटा मिळाला. बारी समाजाच्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत झाले. इतर काही समाजांनीही त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला. सत्यशोधक ओबीसी परिषदेने माळी समाजातही हा निर्णय राबविण्याचा प्रयत्न केला. कुणबी, पाटील या मोठ्या समाजांसह काही लहान समाजांनीही या निर्णयाचे स्वागत केले; मात्र फार मोठय़ा प्रमाणात त्याचा अं गिकार झाला नाही. बारी समाजात मात्र या निर्णयाची चांगली अंमलबजावणी झाली. बारी समाजातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील जळगाव जामोद, संग्रामपूर, अकोट, अंजनगाव, अमरावती, यवतमाळ या भागांमधील बारी समाजबांधवांनी हा विचार स्वीकारला. खान्देशमध्ये वडोदा, कुर्‍हा, शेंदुर्णीसह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात, बारी समाजाने बॅण्डबाजा, घोडा आणि फटाके हद्दपार करुन लग्ने लावली. बारी समाजात ३00 पेक्षा जास्त लग्न या तत्वानुसार झाली, तर इतर काही समाजांमध्येही सुमारे १00 लग्ने बॅण्डबाजा, घोडा आणि फटाक्यांना फाटा देत लागली. या निर्णयाचा अंगिकार करणार्‍या प्रत्येक वरपित्याची किमान ३0 ते ४0 हजार रुपयांची बचत झाली. त्याचबरोबर लग्न वेळेवर लागली, दारु पिऊन धिंगाणा घालणारे तरुण दिसले नाहीत आणि लग्नात मानपानासाठी वाद झाले नाहीत, तसेच रुसवे-फुगवे दिसले नाहीत. त्याशिवाय ध्वनी प्रदूषणाला आळा बसला तो वेगळाच! या निर्णयाचे बिजारोपण झालेल्या जळगाव जामोद व संग्रामपूर त्या दोन तालुक्यातच, पुढील लग्नसराईत या तत्वावर किमान १00 लग्न पार पडतील.** २२ नवरदेवांचा सत्कारया निर्णयाचा अंगीकार करुन बारी समाजातील यंदाच्या हंगामात लग्न झालेल्या २२ नवरदेवांचा, बारी समाजाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी ही परंपरा भविष्यातही अशीच सुरू ठेवून, इतर समाजांपुढे आदर्श निर्माण करण्याचे आवाहन करण्यात आले.