शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
2
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
3
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
4
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
5
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
6
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
7
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
8
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
9
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
10
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
11
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
12
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
13
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
14
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना
15
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
16
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
17
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
18
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
19
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
20
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या

दरमहा ४०० नवजातांचे मृत्यू

By admin | Updated: November 24, 2015 02:29 IST

ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात उत्कृष्ट आरोग्यसेवा उपलब्ध आहेत. तरीही मुंबईसारख्या शहरात दर महिन्याला सरासरी ४०० नवजात बालकांचे मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे

मुंबई : ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात उत्कृष्ट आरोग्यसेवा उपलब्ध आहेत. तरीही मुंबईसारख्या शहरात दर महिन्याला सरासरी ४०० नवजात बालकांचे मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या आकडेवारीवरून हे सत्य समोर आले आहे. पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने यंदा प्रसिद्ध केलेल्या अहवालात, २००८ ते २०१२ पर्यंतची आकडेवारी दिली आहे. या पाच वर्षांच्या कालावधीत ३२ हजार ६६४ बालमृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. संसर्ग, न्यूमोनिया, अतिसार, तापाचे विकार आणि श्वसनविकारामुळे मुंबई शहरातील बालकांचे मृत्यू होत असल्याची माहिती डॉक्टरांकडून मिळाली. नवजात शिशुंची योग्य ती निगा राखल्यास, ५० ते ६० टक्के अर्भकांचा मृत्यू टाळता येणे शक्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. देशात दररोज तीन हजार बालके कुपोषणामुळे निर्माण होणाऱ्या आजारांमुळे मृत्युमुखी पडतात. या संदर्भात जागृती करण्यासठी ‘नवजात बालक काळजी सप्ताह’ मुंबईतील रुग्णालयांमध्ये राबवण्यात आला. नवजात बाळाची काळजी जन्मापासून ते २८ दिवसांपर्यंत घ्यायची असते. या काळातली निगा ही अत्यंत महत्त्वाची असते. कारण याच दिवसांत नवजात बालकांना जंतू संसर्गाची जास्त शक्यता असते. गर्भधारणा झाल्यापासून बालकाला जन्म देईपर्यंतचा काळ अतिशय काळजीचा असतो. त्याचसोबत व अधिक महत्त्वाचा काळ जन्मलेल्या नवजात बाळाच्या संगोपनाचा असतो. बाळाला जन्म दिल्यानंतर त्याची काळजी कशी घ्यावी, याबाबत विधीवत शिक्षण घेणे अमेरिकेसारख्या देशात सक्तीचे करण्यात आलेले आहे. आपल्याकडे मात्र जन्म देणाऱ्या मातेची ती जबाबदारी आहे, असेच मानले जाते. -डॉ. समीर शेख, नवजात अतिदक्षता विभाग प्रमुख व नवजात शिशुतज्ज्ञ, वोक्हार्ट रुग्णालय