शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

दरमहा ४०० नवजातांचे मृत्यू

By admin | Updated: November 24, 2015 02:29 IST

ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात उत्कृष्ट आरोग्यसेवा उपलब्ध आहेत. तरीही मुंबईसारख्या शहरात दर महिन्याला सरासरी ४०० नवजात बालकांचे मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे

मुंबई : ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात उत्कृष्ट आरोग्यसेवा उपलब्ध आहेत. तरीही मुंबईसारख्या शहरात दर महिन्याला सरासरी ४०० नवजात बालकांचे मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या आकडेवारीवरून हे सत्य समोर आले आहे. पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने यंदा प्रसिद्ध केलेल्या अहवालात, २००८ ते २०१२ पर्यंतची आकडेवारी दिली आहे. या पाच वर्षांच्या कालावधीत ३२ हजार ६६४ बालमृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. संसर्ग, न्यूमोनिया, अतिसार, तापाचे विकार आणि श्वसनविकारामुळे मुंबई शहरातील बालकांचे मृत्यू होत असल्याची माहिती डॉक्टरांकडून मिळाली. नवजात शिशुंची योग्य ती निगा राखल्यास, ५० ते ६० टक्के अर्भकांचा मृत्यू टाळता येणे शक्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. देशात दररोज तीन हजार बालके कुपोषणामुळे निर्माण होणाऱ्या आजारांमुळे मृत्युमुखी पडतात. या संदर्भात जागृती करण्यासठी ‘नवजात बालक काळजी सप्ताह’ मुंबईतील रुग्णालयांमध्ये राबवण्यात आला. नवजात बाळाची काळजी जन्मापासून ते २८ दिवसांपर्यंत घ्यायची असते. या काळातली निगा ही अत्यंत महत्त्वाची असते. कारण याच दिवसांत नवजात बालकांना जंतू संसर्गाची जास्त शक्यता असते. गर्भधारणा झाल्यापासून बालकाला जन्म देईपर्यंतचा काळ अतिशय काळजीचा असतो. त्याचसोबत व अधिक महत्त्वाचा काळ जन्मलेल्या नवजात बाळाच्या संगोपनाचा असतो. बाळाला जन्म दिल्यानंतर त्याची काळजी कशी घ्यावी, याबाबत विधीवत शिक्षण घेणे अमेरिकेसारख्या देशात सक्तीचे करण्यात आलेले आहे. आपल्याकडे मात्र जन्म देणाऱ्या मातेची ती जबाबदारी आहे, असेच मानले जाते. -डॉ. समीर शेख, नवजात अतिदक्षता विभाग प्रमुख व नवजात शिशुतज्ज्ञ, वोक्हार्ट रुग्णालय