शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दरमहा ४०० नवजातांचे मृत्यू

By admin | Updated: November 24, 2015 02:29 IST

ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात उत्कृष्ट आरोग्यसेवा उपलब्ध आहेत. तरीही मुंबईसारख्या शहरात दर महिन्याला सरासरी ४०० नवजात बालकांचे मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे

मुंबई : ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात उत्कृष्ट आरोग्यसेवा उपलब्ध आहेत. तरीही मुंबईसारख्या शहरात दर महिन्याला सरासरी ४०० नवजात बालकांचे मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या आकडेवारीवरून हे सत्य समोर आले आहे. पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने यंदा प्रसिद्ध केलेल्या अहवालात, २००८ ते २०१२ पर्यंतची आकडेवारी दिली आहे. या पाच वर्षांच्या कालावधीत ३२ हजार ६६४ बालमृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. संसर्ग, न्यूमोनिया, अतिसार, तापाचे विकार आणि श्वसनविकारामुळे मुंबई शहरातील बालकांचे मृत्यू होत असल्याची माहिती डॉक्टरांकडून मिळाली. नवजात शिशुंची योग्य ती निगा राखल्यास, ५० ते ६० टक्के अर्भकांचा मृत्यू टाळता येणे शक्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. देशात दररोज तीन हजार बालके कुपोषणामुळे निर्माण होणाऱ्या आजारांमुळे मृत्युमुखी पडतात. या संदर्भात जागृती करण्यासठी ‘नवजात बालक काळजी सप्ताह’ मुंबईतील रुग्णालयांमध्ये राबवण्यात आला. नवजात बाळाची काळजी जन्मापासून ते २८ दिवसांपर्यंत घ्यायची असते. या काळातली निगा ही अत्यंत महत्त्वाची असते. कारण याच दिवसांत नवजात बालकांना जंतू संसर्गाची जास्त शक्यता असते. गर्भधारणा झाल्यापासून बालकाला जन्म देईपर्यंतचा काळ अतिशय काळजीचा असतो. त्याचसोबत व अधिक महत्त्वाचा काळ जन्मलेल्या नवजात बाळाच्या संगोपनाचा असतो. बाळाला जन्म दिल्यानंतर त्याची काळजी कशी घ्यावी, याबाबत विधीवत शिक्षण घेणे अमेरिकेसारख्या देशात सक्तीचे करण्यात आलेले आहे. आपल्याकडे मात्र जन्म देणाऱ्या मातेची ती जबाबदारी आहे, असेच मानले जाते. -डॉ. समीर शेख, नवजात अतिदक्षता विभाग प्रमुख व नवजात शिशुतज्ज्ञ, वोक्हार्ट रुग्णालय