शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

ठाणो, मेळघाटात पाच महिन्यांत 400 बालमृत्यू

By admin | Updated: December 13, 2014 01:54 IST

ठाणो जिल्ह्यात 220 बालके व 11 मातांचे तर जुलै ते ऑक्टोबर या चार महिन्यांच्या कालावधीत अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात 180 बालकांचे मृत्यू झाले आहेत.

कुपोषणाचा इन्कार : वैद्यकीय कारणास्तव बळी गेल्याचा सरकारचा पवित्र
नागपूर- जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांच्या कालावधीत ठाणो जिल्ह्यात 220 बालके व 11 मातांचे तर जुलै ते ऑक्टोबर या चार महिन्यांच्या कालावधीत अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात 180 बालकांचे मृत्यू झाले आहेत.
आतार्पयत विरोधी बाकावर बसलेले असताना हे मृत्यू कुपोषणामुळे झाल्याचा दावा करणा:यांनी सत्तेत येताच विविध वैद्यकीय कारणास्तव हे मृत्यू झाल्याचा पवित्र घेतला आहे. विधान परिषदेत ठाणो जिल्ह्यातील बालमृत्यूंबाबत धनंजय मुंडे, नरेंद्र पाटील आदींनी विचारलेल्या प्रश्नावर आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे की, जून ते ऑक्टोबर 2क्14 या कालावधीत 11 माता व 22क् नवजात बालकांचे मृत्यू झाले आहेत. मागील वर्षी याच कालावधीत 7 माता मृत्यू व 234 नवजात बालकांचे मृत्यू झाले होते. 
माता मृत्यूमधील वाढ वैद्यकीय कारणास्तव झालेली आहे. गरोदर मातांची नोंदणी करून त्यांना धनुर्वाताचे इंजेक्शन देणो व लोहयुक्त गोळ्या देणो, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमात प्रसूतीपूर्व, प्रसूतीदरम्यान व प्रसूतीपश्चात देण्यात येणा:या वैद्यकीय सुविधांची माहिती डॉ. सावंत यांनी दिली. 
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट भागात जुलै ते ऑक्टोबर 2क्14 या कालावधीत 18क् बालकांचे मृत्यू झालेले आहेत, अशी कबुली सुनील तटकरे, हेमंत टकले आदींनी विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली आहे. त्यामध्ये कमी वजनामुळे 18, तापसदृश आजारामुळे 1क्, डायरियामुळे 5, न्युमोनियामुळे 28, कमी दिवसाच्या प्रसूतीमुळे 11, अॅसपेक्शियामुळे 23, सेप्टीसिमियामुळे 19, इतर आजारांमुळे 42 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.
राज्यात काँग्रेस प्रणीत सरकार असताना ठाणो, मेळघाट येथील बालमृत्यू विविध आजारांमुळे होत असल्याचे शिवसेना मान्य करीत नव्हती. कुपोषण हीच मूळ समस्या असल्याचा दावा करीत होती. आता आरोग्य खाते शिवसेनेकडे आल्यावर मात्र कुठेही हे बालमृत्यू कुपोषणाने झाल्याचे मान्य केलेले नाही, असे विरोधकांचे म्हणणो आहे. (विशेष प्रतिनिधी)