शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

यंदा अभियांत्रिकीच्या ४० हजार जागा रिक्त?

By admin | Updated: June 18, 2016 03:25 IST

राज्यातील प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या सुमारे १ लाख ५७ हजार जागांवर प्रवेशासाठी सुमारे १ लाख १४ हजार अर्ज अंतिम झाले आहेत. त्यामुळे यंदाही अभियांत्रिकीच्या ४० हजारांहून

पुणे : राज्यातील प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या सुमारे १ लाख ५७ हजार जागांवर प्रवेशासाठी सुमारे १ लाख १४ हजार अर्ज अंतिम झाले आहेत. त्यामुळे यंदाही अभियांत्रिकीच्या ४० हजारांहून अधिक जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे; मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. राज्यातील शासकीय, खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी ‘एमएचटी-सीईटी’ घेण्यात आली. ही सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा तुलनेने वाढली होती. सुमारे २ लाख ६० हजार विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले. त्यामुळे यावर्षी अभियांत्रिकी प्रवेशासाठी मोठी स्पर्धा वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांकडून आॅनलाइन अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया गुरुवारी संपली. सुमारे १ लाख २५ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी आॅनलाइन नोंदणी केली. शुक्रवारपर्यंत या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी व प्रवेश अर्ज अंतिम करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. ‘या मुदतीत सुमारे १ लाख ५७ हजार जागांसाठी सुमारे १ लाख १४ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज अंतिम झाले आहेत. प्रवेशक्षमतेत बदल होण्याची शक्यता आहे, अशी माहिती राज्याचे तंत्र शिक्षण संचालक डॉ. सुभाष महाजन यांनी दिली.दरम्यान, यावर्षी मागील वर्षीच्या तुलनेत अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काही प्रमाणात वाढली आहे. मागील वर्षी सुमारे १ लाख ७ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यावर्षी हे प्रमाण सुमारे ७ हजारांनी वाढले आहे. तसेच, मागील वर्षीची प्रवेशक्षमताही सुमारे १ लाख ६४ हजार एवढी होती. त्यामुळे रिक्त जागांची संख्या ६० हजारांहून अधिक होती. यावर्षी तुलनेने प्रवेशक्षमता कमी असून, प्रवेश अर्ज वाढले आहेत. त्यामुळे यंदा रिक्त जागांचे प्रमाण दरवर्षीपेक्षा कमी राहणार आहे. - तंत्र शिक्षण संचालनालयाने राज्यातील अभियांत्रिकी शिक्षण देणाऱ्या संस्थांची पाहणी केली होती. या पाहणीमध्ये काही संस्थांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा आढळून आल्या नाहीत. तसेच प्राचार्य, प्राध्यापकांची पदेही रिक्त आढळून आली. अशा संस्थांचा अहवाला अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेकडे (एआयसीटीई) पाठविण्यात आला होता. परिषदेने संबंधित संस्थांची मान्यता रद्द केली आहे. तसेच काही संस्थांनी इलेक्टॉनिक्स अ‍ॅन्ड टेली कम्युनिकेशन या अभ्यासक्रमाला कमी प्रवेश होत असल्याने जागा सरेंडर केल्या. त्यामुळे यावर्षीच्या प्रवेश क्षमतेत घट झाली आहे. अद्याप ही प्रक्रिया सुरू असल्याने प्रवेशक्षमता आणखी कमी होण्याची शक्यता आहे.