शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

यंदा अभियांत्रिकीच्या ४० हजार जागा रिक्त?

By admin | Updated: June 18, 2016 03:25 IST

राज्यातील प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या सुमारे १ लाख ५७ हजार जागांवर प्रवेशासाठी सुमारे १ लाख १४ हजार अर्ज अंतिम झाले आहेत. त्यामुळे यंदाही अभियांत्रिकीच्या ४० हजारांहून

पुणे : राज्यातील प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या सुमारे १ लाख ५७ हजार जागांवर प्रवेशासाठी सुमारे १ लाख १४ हजार अर्ज अंतिम झाले आहेत. त्यामुळे यंदाही अभियांत्रिकीच्या ४० हजारांहून अधिक जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे; मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. राज्यातील शासकीय, खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी ‘एमएचटी-सीईटी’ घेण्यात आली. ही सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा तुलनेने वाढली होती. सुमारे २ लाख ६० हजार विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले. त्यामुळे यावर्षी अभियांत्रिकी प्रवेशासाठी मोठी स्पर्धा वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांकडून आॅनलाइन अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया गुरुवारी संपली. सुमारे १ लाख २५ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी आॅनलाइन नोंदणी केली. शुक्रवारपर्यंत या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी व प्रवेश अर्ज अंतिम करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. ‘या मुदतीत सुमारे १ लाख ५७ हजार जागांसाठी सुमारे १ लाख १४ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज अंतिम झाले आहेत. प्रवेशक्षमतेत बदल होण्याची शक्यता आहे, अशी माहिती राज्याचे तंत्र शिक्षण संचालक डॉ. सुभाष महाजन यांनी दिली.दरम्यान, यावर्षी मागील वर्षीच्या तुलनेत अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काही प्रमाणात वाढली आहे. मागील वर्षी सुमारे १ लाख ७ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यावर्षी हे प्रमाण सुमारे ७ हजारांनी वाढले आहे. तसेच, मागील वर्षीची प्रवेशक्षमताही सुमारे १ लाख ६४ हजार एवढी होती. त्यामुळे रिक्त जागांची संख्या ६० हजारांहून अधिक होती. यावर्षी तुलनेने प्रवेशक्षमता कमी असून, प्रवेश अर्ज वाढले आहेत. त्यामुळे यंदा रिक्त जागांचे प्रमाण दरवर्षीपेक्षा कमी राहणार आहे. - तंत्र शिक्षण संचालनालयाने राज्यातील अभियांत्रिकी शिक्षण देणाऱ्या संस्थांची पाहणी केली होती. या पाहणीमध्ये काही संस्थांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा आढळून आल्या नाहीत. तसेच प्राचार्य, प्राध्यापकांची पदेही रिक्त आढळून आली. अशा संस्थांचा अहवाला अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेकडे (एआयसीटीई) पाठविण्यात आला होता. परिषदेने संबंधित संस्थांची मान्यता रद्द केली आहे. तसेच काही संस्थांनी इलेक्टॉनिक्स अ‍ॅन्ड टेली कम्युनिकेशन या अभ्यासक्रमाला कमी प्रवेश होत असल्याने जागा सरेंडर केल्या. त्यामुळे यावर्षीच्या प्रवेश क्षमतेत घट झाली आहे. अद्याप ही प्रक्रिया सुरू असल्याने प्रवेशक्षमता आणखी कमी होण्याची शक्यता आहे.