शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
2
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
3
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
4
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
5
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
6
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
7
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
8
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
9
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
10
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
11
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
12
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
13
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
14
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
15
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
16
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
17
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
18
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
19
ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने
20
Shrejal Guleria : अभिमानास्पद! वडील सैन्यात सुभेदार, लेक बनली फ्लाइंग ऑफिसर; तिसरी पिढी देशसेवेसाठी सज्ज
Daily Top 2Weekly Top 5

यंदा अभियांत्रिकीच्या ४० हजार जागा रिक्त?

By admin | Updated: June 18, 2016 03:25 IST

राज्यातील प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या सुमारे १ लाख ५७ हजार जागांवर प्रवेशासाठी सुमारे १ लाख १४ हजार अर्ज अंतिम झाले आहेत. त्यामुळे यंदाही अभियांत्रिकीच्या ४० हजारांहून

पुणे : राज्यातील प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या सुमारे १ लाख ५७ हजार जागांवर प्रवेशासाठी सुमारे १ लाख १४ हजार अर्ज अंतिम झाले आहेत. त्यामुळे यंदाही अभियांत्रिकीच्या ४० हजारांहून अधिक जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे; मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. राज्यातील शासकीय, खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी ‘एमएचटी-सीईटी’ घेण्यात आली. ही सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा तुलनेने वाढली होती. सुमारे २ लाख ६० हजार विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले. त्यामुळे यावर्षी अभियांत्रिकी प्रवेशासाठी मोठी स्पर्धा वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांकडून आॅनलाइन अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया गुरुवारी संपली. सुमारे १ लाख २५ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी आॅनलाइन नोंदणी केली. शुक्रवारपर्यंत या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी व प्रवेश अर्ज अंतिम करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. ‘या मुदतीत सुमारे १ लाख ५७ हजार जागांसाठी सुमारे १ लाख १४ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज अंतिम झाले आहेत. प्रवेशक्षमतेत बदल होण्याची शक्यता आहे, अशी माहिती राज्याचे तंत्र शिक्षण संचालक डॉ. सुभाष महाजन यांनी दिली.दरम्यान, यावर्षी मागील वर्षीच्या तुलनेत अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काही प्रमाणात वाढली आहे. मागील वर्षी सुमारे १ लाख ७ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यावर्षी हे प्रमाण सुमारे ७ हजारांनी वाढले आहे. तसेच, मागील वर्षीची प्रवेशक्षमताही सुमारे १ लाख ६४ हजार एवढी होती. त्यामुळे रिक्त जागांची संख्या ६० हजारांहून अधिक होती. यावर्षी तुलनेने प्रवेशक्षमता कमी असून, प्रवेश अर्ज वाढले आहेत. त्यामुळे यंदा रिक्त जागांचे प्रमाण दरवर्षीपेक्षा कमी राहणार आहे. - तंत्र शिक्षण संचालनालयाने राज्यातील अभियांत्रिकी शिक्षण देणाऱ्या संस्थांची पाहणी केली होती. या पाहणीमध्ये काही संस्थांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा आढळून आल्या नाहीत. तसेच प्राचार्य, प्राध्यापकांची पदेही रिक्त आढळून आली. अशा संस्थांचा अहवाला अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेकडे (एआयसीटीई) पाठविण्यात आला होता. परिषदेने संबंधित संस्थांची मान्यता रद्द केली आहे. तसेच काही संस्थांनी इलेक्टॉनिक्स अ‍ॅन्ड टेली कम्युनिकेशन या अभ्यासक्रमाला कमी प्रवेश होत असल्याने जागा सरेंडर केल्या. त्यामुळे यावर्षीच्या प्रवेश क्षमतेत घट झाली आहे. अद्याप ही प्रक्रिया सुरू असल्याने प्रवेशक्षमता आणखी कमी होण्याची शक्यता आहे.