शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

ठाणे मेट्रोतून जाणार ४० हजार प्रवासी

By admin | Updated: June 8, 2016 04:57 IST

वडाळा ते कासारवडली मेट्रोला मुख्यमंत्र्यांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतर त्या कामाला वेग येण्याची चिन्हे आहेत.

ठाणे : वडाळा ते कासारवडली मेट्रोला मुख्यमंत्र्यांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतर त्या कामाला वेग येण्याची चिन्हे आहेत. ठाण्यातील १२ जंक्शनवरुन सुमारे २०० वातानुकूलीत बसमधून जेवढे प्रवासी जाऊ शकतात तेवढीच वाहतूक क्षमता वडाळा- ठाणे या मेट्रो सेवेची असेल आणि दररोज गर्दीच्या वेळांमध्ये सुमारे ४० हजार प्रवासी त्यातून प्रवास करतील, असा अंदाज दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनच्या अभ्यासामधून व्यक्त करण्यात आला आहे. या मेट्रो लिंकमुळे ठाण्यातील प्रवाशांचा मुंबईकडील प्रवास अधिक वेगवान होणार आहे. एवढे प्रवासी कमी झाल्याने शहरातील वाहतुकीवरील ताणही कमी होण्याची चिन्हे आहेत.अनेक वर्षे कागदावर राहिलेल्या आणि खर्चाच्या मुद्यावरुन गटांगळ्या खात असलेल्या ठाणे मेट्रोला मुख्यमंत्र्यानी नुकताच हिरवा कंदील दाखवला. ठाण्याच्या वाढत्या लोकसंख्येसाठी स्थानिक वाहतूक व्यवस्था कुचकामी ठरल्याने सर्व आशा मेट्रोवर आहेत. दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनने या मार्गाचा अभ्यास केला असून नुकतेच त्याचे सादरीकरण मुख्यमंत्र्यांसमोर झाले. ठाण्यासाठी मेट्रोची आवश्यकता आणि वाढते प्रवासी यांचा अभ्यास केल्यानंतर हाती आलेल्या आकडेवारीनुसार येत्या १० वर्षात शहरातील १२ प्रस्तावित मेट्रो जंक्शनवरील प्रवासी संख्येत तिप्पट वाढ होईल. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, विशेषत: माजिवड्याच्या पुढे राहणाऱ्यांसाठी हा प्रकल्प अत्यावश्यक आहे. कारण येथून कामासाठी मुंबईला जाणाऱ्यांसाठी कोणतीही वेगवान वाहतूक सेवा उपलब्ध नाही. सध्या येथून घोडबंदर मार्गे मुंबईकडे जा-ये करताना एका दिशेच्या प्रवासासाठी सुमारे दोन तास लागतात. २०२१ आणि २०३१ या दहा वर्षांत गर्दीच्या वेळी ठाण्यात कोणत्याही दिशेकडे मेट्रोमधून प्रवास करू शकणाऱ्या संभाव्य प्रवासी संख्येची आकडेवारीही या अभ्यासातून समोर आली. त्यानुसार २०३१ पर्यंत सुमारे ४० हजार प्रवाशी यातून प्रवास करु शकतील.