शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात 40 हजार कोटींची वाढ - मुख्यमंत्री

By admin | Updated: April 7, 2017 23:00 IST

एकीकडे विरोधकांनी शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणावरून सरकारला लक्ष्य करत कर्जमाफीसाठी रान उठवलेले असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - एकीकडे विरोधकांनी शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणावरून सरकारला लक्ष्य करत कर्जमाफीसाठी रान उठवलेले असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षात शेतकऱ्यांच्या उत्पन्नात ४० हजार कोटी रुपयांनी वाढ झाल्यासा दावा विधानपरिषदेत केला. तसेच समृद्धी हायवेवरून टीका करणाऱ्या विरोधकांना प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी "आपल्यासाठी विमान आहे. हा मार्ग लोकांसाठी आहे," असा टोलाही विरोधकांना लगावला. 
आज विधानपरिषदेत  अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या आरोपांना सविस्तर उत्तर दिले. "पराभूत झाल्यानंतर विरोधकांनी कर्जमाफीचा मुद्दा उचलला. इव्हीएममध्ये घोटाळा झाला असे आम्हालाही वाटले होते. तुम्हालाही वाटणार, सत्य पचवायला आणि पराभव स्वीकारायला वेळ लागतो, सवय होईल." असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. 
राज्याला पुनर्वसनापासून गुंतवणुकीपर्यंत नेल्याशिवाय शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल होणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले. गेल्या हंगामात तुरीचे उत्पादन ४.४४ लाख मेट्रीक टनांवरून २० लाख मेट्रिक टन एवढे झाले. जवळपास पाच पटीने उत्पन्न वाढले. पण सरकाने तूर खरेदी केल्याने भाव पडले नाहीत, असेही त्यांनी सांगितले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी शेतीच्या उत्पन्नात ४० हजार कोटींनी वाढ झाल्याचेही त्यांनी सांगितले.