शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

शेतकऱ्यांसाठी ४० लाख पंपांची गरज

By admin | Updated: May 14, 2016 02:35 IST

राज्यातील शेतकऱ्यांसाठी ऊर्जा बचत करणाऱ्या ४० लाख पंपांची गरज असून, त्यासाठी कोणत्याही कंपन्या पुढाकार घेत असतील तर सरकार त्यांना सर्व प्रकारची मदत करेल

मुंंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी ऊर्जा बचत करणाऱ्या ४० लाख पंपांची गरज असून, त्यासाठी कोणत्याही कंपन्या पुढाकार घेत असतील तर सरकार त्यांना सर्व प्रकारची मदत करेल, असे आश्वासन ऊर्जामंत्री चंद्रेशखर बावनकुळे यांनी दिले. गोरेगाव येथील मुंबई प्रदर्शन केंद्रात आयोजित ‘एलईडी एक्स्पो २०१६’च्या उद्घाटनवेळी ते बोलत होते. या वेळी महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्थेचे महासंचालक नितीन गद्रे आणि बेस्टचे महासंचालक जगदीश पाटील उपस्थित होते.ऊर्जा क्षेत्रात एलईडी तंत्रज्ञानाने आपले महत्त्व विशद केल्याचे सांगत चंद्रशेखर बावनकुळे या वेळी म्हणाले की, देशासह विदेशात वाणिज्यिक, उद्योग, घरगुती इत्यादी क्षेत्रात एलईडीचा वापर ऊर्जाबचतीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी एलईडी तंत्रज्ञान मोलाची भूमिका बजावत आहे. भारतासारख्या विकसनशील देशाची ऊर्जेची गरज लक्षात घेता केंद्र आणि राज्य सरकार एलईडी तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यास कटिबद्ध आहे. भविष्यात एलईडी तंत्रज्ञानावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील सर्व शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या क्षेत्रात सध्या अस्तित्वात असलेले सर्व दिवे/ ट्युबलाईट / पथदिवे हे एलईडीमध्ये बदलण्याबाबतचे आदेश दिले आहेत. शिवाय १०० शहरांतील रस्त्यांवरील पथदिवे बदलून एलईडी पथदिवे बसवण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. दरम्यान, या प्रदर्शानात चीन, हाँगकाँग, कोरिया, तैवान आणि अमेरिका येथील १५०हून अधिक कंपन्या सहभागी झाल्या असून, हे प्रदर्शन १४ मेपर्यंत खुले आहे. (प्रतिनिधी)