शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी ४० लाख पंपांची गरज

By admin | Updated: May 14, 2016 02:35 IST

राज्यातील शेतकऱ्यांसाठी ऊर्जा बचत करणाऱ्या ४० लाख पंपांची गरज असून, त्यासाठी कोणत्याही कंपन्या पुढाकार घेत असतील तर सरकार त्यांना सर्व प्रकारची मदत करेल

मुंंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी ऊर्जा बचत करणाऱ्या ४० लाख पंपांची गरज असून, त्यासाठी कोणत्याही कंपन्या पुढाकार घेत असतील तर सरकार त्यांना सर्व प्रकारची मदत करेल, असे आश्वासन ऊर्जामंत्री चंद्रेशखर बावनकुळे यांनी दिले. गोरेगाव येथील मुंबई प्रदर्शन केंद्रात आयोजित ‘एलईडी एक्स्पो २०१६’च्या उद्घाटनवेळी ते बोलत होते. या वेळी महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्थेचे महासंचालक नितीन गद्रे आणि बेस्टचे महासंचालक जगदीश पाटील उपस्थित होते.ऊर्जा क्षेत्रात एलईडी तंत्रज्ञानाने आपले महत्त्व विशद केल्याचे सांगत चंद्रशेखर बावनकुळे या वेळी म्हणाले की, देशासह विदेशात वाणिज्यिक, उद्योग, घरगुती इत्यादी क्षेत्रात एलईडीचा वापर ऊर्जाबचतीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी एलईडी तंत्रज्ञान मोलाची भूमिका बजावत आहे. भारतासारख्या विकसनशील देशाची ऊर्जेची गरज लक्षात घेता केंद्र आणि राज्य सरकार एलईडी तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यास कटिबद्ध आहे. भविष्यात एलईडी तंत्रज्ञानावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील सर्व शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या क्षेत्रात सध्या अस्तित्वात असलेले सर्व दिवे/ ट्युबलाईट / पथदिवे हे एलईडीमध्ये बदलण्याबाबतचे आदेश दिले आहेत. शिवाय १०० शहरांतील रस्त्यांवरील पथदिवे बदलून एलईडी पथदिवे बसवण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. दरम्यान, या प्रदर्शानात चीन, हाँगकाँग, कोरिया, तैवान आणि अमेरिका येथील १५०हून अधिक कंपन्या सहभागी झाल्या असून, हे प्रदर्शन १४ मेपर्यंत खुले आहे. (प्रतिनिधी)