शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

‘दुष्काळ निवारणासाठी हवेत ४ हजार कोटी’

By admin | Updated: April 28, 2016 05:57 IST

राज्यातील दुष्काळ निवारणासाठी राज्य शासनाने ४ हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव जागतिक बॅँकेकडे सादर केला

मुंबई : राज्यातील दुष्काळ निवारणासाठी राज्य शासनाने ४ हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव जागतिक बॅँकेकडे सादर केला असून हा प्रस्ताव भविष्यात संपूर्ण देशामध्ये रोल मॉडेल म्हणून स्वीकारला जाईल,असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.जागतिक बँकेचे कंट्री डायरेक्टर ओनो रुहल यांनी आज फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय, अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त) सुधीर श्रीवास्तव आदी उपस्थित होते. दुष्काळावर मात करण्यासाठी तसेच जलयुक्त शिवार योजना, जलसंधारण, वातावरण बदल, खारपाणपट्टा, रिक्लेमेशन आदी उपाययोजनांचा समावेश या प्रस्तावात करण्यात आला आहे. मराठवाडा, विदर्भासह जळगाव, अकोला, बुलढाणा व अमरावतीतील अंदाजे ९०० गावांमध्ये खारपाणपट्टा रिक्लेमेशन करून या जमिनीची उत्पादकता वाढविण्याच उद्दिष्ट असेल. रुहल म्हणाले की, दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी आमची पूर्र्ण सहकार्याची भूमिका असेल. दुष्काळ निवारण्यासाठी जागतिक बँकेकडून जगभरातील उत्तम तज्ज्ञ व आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करु न दिले जाईल. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पावसाळ्यापूर्वी लगेच करावयाची कामे व पुढील ५ वर्षातील कामांबाबत जागतिक बँकेकडे सविस्तर प्रस्ताव पाठवावा, असे रुहल म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)