शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

३७ हजारांपैकी बियाण्यांचे ४ हजार ८४७ नमुने ‘नापास’

By admin | Updated: July 31, 2014 01:00 IST

पेरणीसाठी वापरण्यात येणाऱ्या बियाण्यांच्या उगवण क्षमतेची टक्केवारी जाणून घेण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी २०१३-१४ या आर्थिक वर्षात कृषी विभागाच्या प्रयोगशाळेत सुमारे ३७ हजार ८९२ बियाण्यांची तपासणी

बियाण्यांची तपासणी : राज्यात पुणे, परभणी व नागपूर येथे प्रयोगशाळाप्रफुल्ल लुंगे - सेलू (वर्धा)पेरणीसाठी वापरण्यात येणाऱ्या बियाण्यांच्या उगवण क्षमतेची टक्केवारी जाणून घेण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी २०१३-१४ या आर्थिक वर्षात कृषी विभागाच्या प्रयोगशाळेत सुमारे ३७ हजार ८९२ बियाण्यांची तपासणी करून घेतली़ पैकी ४ हजार ८४७ बियाण्यांचे नमुने ‘नापास’ झाले आहेत़ नापास बियाण्यांची टक्केवारी १२.८४ टक्के आहे.शेतकऱ्यांकडील बियाण्यांच्या उगवण क्षमतेबाबत संशय असल्यास तपासणी करून घेता येते़ यातून संभाव्य धोका टाळता येऊ शकतो़ बियाण्यांची तपासणी करण्यासाठी कृषी विभागाने पुणे, परभणी व नागपूर येथे स्वतंत्र बियाणे तपासणी प्रयोगशाळा उभारली आहे. दरवर्षी सुमारे ४८ हजार नमूने तपासले जातील, एवढी प्रयोगशाळांची क्षमता आहे. या ठिकाणी शेतकरी तसेच विविध बियाणे कंपन्या, कृषी संस्था खरीप, रबी व उन्हाळी हंगामात विविध वाणांच्या बियाण्यांची तपासणी करून घेतात़ यात प्रामुख्याने सोयाबीन, हरभरा, गहू, बाजरी, ज्वारी, भूईमुग, तूर, उडीद, कापूस, भात तसेच इतर भाजीपाला पिकांच्या बियाण्यांची तपासणी करून घेतली जाते़ यामुळे बियाण्यांच्या उगवण क्षमतेबाबत चिंता राहत नाही़ पेरणीनंतर बियाणे उगविले नाही तर काय, ही भिती दूर होऊन संभाव्य धोका टाळता येतो.शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील बियाण्यांची योग्यवेळी चाचणी करून घेतली तर उगवण क्षमतेबाबत साशंकता राहत नाही. यामुळे दर्जेदार बियाणे पेरणीसाठी वापरता येतात. जे बियाणे चाचणीअंती नापास झाले, तेच बियाणे चाचणी न करता लावले गेले तर उगवण क्षमतेवर परिणाम होऊन आर्थिक फटका बसतो. प्रयोगशाळेत बियाण्यांच्या उगवण क्षमतेची खात्री झाल्यावर भविष्यात येणाऱ्या संकटावर मात करता येते़ शेतकऱ्यांनी प्रयोगशाळेचा आधार घेऊन बियाण्यांच्या उगवण क्षमतेची चाचणी करून घेणे निश्चितच फायद्याचे आहे.