शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

४ हजार ७०० क्युसेक्सने नीरा नदीमध्ये पाणी सोडले

By admin | Updated: October 3, 2016 01:53 IST

नीरा देवघर, भाटघर, वीर व गुंजवणी धरणक्षेत्रात पावसाची संततधार सुरू झाल्याने पुन्हा एकदा चारही धरणे ‘ओव्हरफ्लो’ झाली आहेत.

सोमेश्वरनगर : गेल्या दोन दिवसांपासून नीरा देवघर, भाटघर, वीर व गुंजवणी धरणक्षेत्रात पावसाची संततधार सुरू झाल्याने पुन्हा एकदा चारही धरणे ‘ओव्हरफ्लो’ झाली आहेत. रविवारी सकाळी सहा वाजता वीर धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने नीरा नदीमध्ये ४ हजार ७०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून नीरा खोऱ्यामध्ये समाधानकारक पाऊस नव्हता. मात्र, यावर्षी पावसाने शेतकऱ्यांची पाण्याची चिंता मिटवली असून, बळीराजा सुखावला आहे. गेल्या आठवड्यापासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून, अजून १० ते १२ दिवस हा परतीचा पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच वरील चारही धरणे १०० टक्के भरली होती. मात्र, अनेक भागांतून पाऊस झाला नव्हता. बारामतीचा जिरायत पट्टा पावसापासून वंचित होता. मात्र गेल्या आठ दिवसांपासून बारामतीच्या जिरायत पट्ट्यामध्येही जोरदार पावसाने हजेरी लावल्याने जिरायती भागातील शेतकरी सुखावला आहे. बागायती भागात याउलट चित्र असून, बागायती भागात शेतीचे नुकसान होण्याच्या मार्गावर आहे. तरकारी पिके व उसाच्या लहान लागवडी याचे नुकसान होत आहे. काल नीरा देवघर धरणक्षेत्रात ४४ मिमी, भाटघर धरणक्षेत्रात ४१ मिमी, वीर धरणक्षेत्रात २३ मिमी तर गुंजवणी धरणक्षेत्रात ४१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे नीरा देवघर धरणामधून ३५० क्युसेक्स, भाटघर धरणामधून १३०० क्युसेक्स तर गुंजवणी धरणामधून १७५० क्युसेक्सने वीर धरणामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने आज सकाळी सहा वाजता वीर धरणामधून नीरा नदीमध्ये ४ हजार ७०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले. (वार्ताहर)