शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
3
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
4
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
5
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
6
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
7
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
8
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
9
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
10
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
11
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
12
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
13
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
14
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
15
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
16
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
17
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
18
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
19
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
20
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?

४ हजार ७०० क्युसेक्सने नीरा नदीमध्ये पाणी सोडले

By admin | Updated: October 3, 2016 01:53 IST

नीरा देवघर, भाटघर, वीर व गुंजवणी धरणक्षेत्रात पावसाची संततधार सुरू झाल्याने पुन्हा एकदा चारही धरणे ‘ओव्हरफ्लो’ झाली आहेत.

सोमेश्वरनगर : गेल्या दोन दिवसांपासून नीरा देवघर, भाटघर, वीर व गुंजवणी धरणक्षेत्रात पावसाची संततधार सुरू झाल्याने पुन्हा एकदा चारही धरणे ‘ओव्हरफ्लो’ झाली आहेत. रविवारी सकाळी सहा वाजता वीर धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने नीरा नदीमध्ये ४ हजार ७०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून नीरा खोऱ्यामध्ये समाधानकारक पाऊस नव्हता. मात्र, यावर्षी पावसाने शेतकऱ्यांची पाण्याची चिंता मिटवली असून, बळीराजा सुखावला आहे. गेल्या आठवड्यापासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून, अजून १० ते १२ दिवस हा परतीचा पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच वरील चारही धरणे १०० टक्के भरली होती. मात्र, अनेक भागांतून पाऊस झाला नव्हता. बारामतीचा जिरायत पट्टा पावसापासून वंचित होता. मात्र गेल्या आठ दिवसांपासून बारामतीच्या जिरायत पट्ट्यामध्येही जोरदार पावसाने हजेरी लावल्याने जिरायती भागातील शेतकरी सुखावला आहे. बागायती भागात याउलट चित्र असून, बागायती भागात शेतीचे नुकसान होण्याच्या मार्गावर आहे. तरकारी पिके व उसाच्या लहान लागवडी याचे नुकसान होत आहे. काल नीरा देवघर धरणक्षेत्रात ४४ मिमी, भाटघर धरणक्षेत्रात ४१ मिमी, वीर धरणक्षेत्रात २३ मिमी तर गुंजवणी धरणक्षेत्रात ४१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे नीरा देवघर धरणामधून ३५० क्युसेक्स, भाटघर धरणामधून १३०० क्युसेक्स तर गुंजवणी धरणामधून १७५० क्युसेक्सने वीर धरणामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने आज सकाळी सहा वाजता वीर धरणामधून नीरा नदीमध्ये ४ हजार ७०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले. (वार्ताहर)