शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

कोकणपट्ट्यात ४ लाख क्विंटल भात पडून

By admin | Updated: May 26, 2015 23:44 IST

जिल्ह्यात २४ हजार क्विंटल भात शिल्लक : एफसीआयने नाकारल्याचा परिणाम; साठा संपवण्यासाठी ई-टेंडरची उपाययोजना

मिलिंद पारकर- कणकवली -भात उचल न झाल्याने जिल्हाभरातील भातसाठ्याचा आणि पुन्हा खरेदीचा प्रश्न निर्माण झाला आहे. बुधवारी कॉँग्रेसने गोदामे रिकामे करण्यासाठी आंदोलन पुकारले आहे. गेल्या दोन वर्षांत यावर नेमकी उपाययोजना झाली नसल्याने प्रश्न जटील झाला असून ई-टेंडरचा उपाय काढून प्रशासन स्वस्थ बसले आहे. त्यामुळे कोकण पट्ट्यात ४ ते ५ लाख क्विंटल भात खरेदी विक्री संघ व मिलरकडे पडून आहे.भात साठ्याची उचल न झाल्याने हळूहळू सिंधुदुर्गात प्रश्न जटील बनला असून त्यावर राजकारण पेटले आहे. पंधरा दिवसांत यावर उपाय काढू असे सांगणाऱ्या पालकमंत्र्यांनी पुढे कोणतीच हालचाल केली नाही. भाड्याची गोदामे घेण्यात येतील, असेही सांगण्यात आले होते. मात्र, तसाही प्रयत्न झाला नाही. आता पावसाळा तोंडावर आला असून शेतकऱ्यांना खुल्या बाजारात पड्या भावाने भात विकण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.भातसाठ्याची प्रक्रियाआॅक्टोबर महिन्यापासून खरेदी-विक्री संघात शेतकऱ्यांकडून भात खरेदी केली जाते. त्यानंतर भरडाईसाठीची निविदा काढली जाते. बॅँक गॅरंटी, करारनामा आदी पूर्तता करून बॅँक गॅरंटीएवढे भात मिलरला दिले जाते. भात भरडाई झाल्यानंतर तयार झालेला तांदूळ भारतीय अन्न महामंडळाकडे तपासणीसाठी जातो. तेथे तांदळाला मान्यता मिळाल्यानंतर जिल्हा पुरवठा विभागाच्या मान्यतेने तो तांदूळ जमा केला जातो. तेवढ्याच रकमेचा भात परत मिलिंगसाठी दिला जातो. देवगड तालुक्यात खरेदी देवगड तालुक्यात मूळात भात खरेदी कमी झाली होती. त्यामुळे तेथे जागा शिल्लक होती. त्यामुळे यावेळी देवगडमध्ये ४७२ क्विंटल भात खरेदी झाली आहे. मात्र, आता तेथेही क्षमता संपल्याने भात खरेदी थांबणार आहे. १३१० चा दर ९०० रूपयांवर२०१३-१४ मध्ये भाताचा दर १३१० रूपये होता. मात्र, एफसीआयकडून नाकारण्याचा प्रकार झाल्यानंतर मिलरकडून भाताची उचल बंद झाली. साठलेले भात आता खराब झाले आहे. कोणीही उचल करत नसल्याने शासनाने ९०० रूपयांवर दर आणून ठेवला आहे. आता शासनाने ई-टेंडर काढून भात उचल करण्याचा प्रयत्न चालवला आहे.एफसीआयकडून नाकारलाआॅक्टोबर २०१३ मधील घेण्यात आलेला भात भरडाई केल्यानंतर तुकडा जास्त पडतो या कारणास्तव भारतीय अन्न महामंडळाकडून नाकारण्यात आला. पूर्ण कोकण पट्ट्यात सुमारे ४ ते ५ लाख क्विंटल भात खरेदी-विक्री संघ आणि मिलरकडे पडून आहे. सिंधुदुर्गातील २० गोदामांमध्ये मिळून सुमारे २४ हजार क्विंटल भात पडून आहे. भातसाठ्याने खत ठेवायला जागा अपुरीआॅक्टोबर पासून पहिले तीन महिने भात खरेदी करून ठिकठिकाणच्या खरेदी-विक्री संघांच्या गोदामांमध्ये साठवण केली जाते. त्यानंतर मिलरकडून पुढील तीन महिन्यात भात उचल होत असल्याने पावसाळ्याच्या तोंडावर आलेले खत ठेवण्यासाठी जागा होते. मात्र, आता भातसाठ्याचा प्रश्न निकाली न निघाल्याने खत ठेवायला जागा नाही, अशी स्थिती आली आहे. जिल्हातील गोदामांमध्ये ५० ते १५० मेट्रिक टन एवढीच जागा आहे. जास्त दिवस ठेवल्यास तुकडा आता खरेदी-विक्री संघाच्या गोदामांमध्ये जमा असलेला भात हा बहुतांश मसुरी, इंद्रायणी, कोमल या जातीचा आहे. वेळच्या वेळी भातावर प्रक्रिया करून तांदूळ केल्यास भाताचा तुकडा पडत नाही. परंतु जास्त दिवस भात तसेच पडून राहिल्यानंतर प्रोसेसिंग केल्यावर तुकडा पडण्याची शक्यता जास्त असते.