शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

कोकणपट्ट्यात ४ लाख क्विंटल भात पडून

By admin | Updated: May 26, 2015 23:44 IST

जिल्ह्यात २४ हजार क्विंटल भात शिल्लक : एफसीआयने नाकारल्याचा परिणाम; साठा संपवण्यासाठी ई-टेंडरची उपाययोजना

मिलिंद पारकर- कणकवली -भात उचल न झाल्याने जिल्हाभरातील भातसाठ्याचा आणि पुन्हा खरेदीचा प्रश्न निर्माण झाला आहे. बुधवारी कॉँग्रेसने गोदामे रिकामे करण्यासाठी आंदोलन पुकारले आहे. गेल्या दोन वर्षांत यावर नेमकी उपाययोजना झाली नसल्याने प्रश्न जटील झाला असून ई-टेंडरचा उपाय काढून प्रशासन स्वस्थ बसले आहे. त्यामुळे कोकण पट्ट्यात ४ ते ५ लाख क्विंटल भात खरेदी विक्री संघ व मिलरकडे पडून आहे.भात साठ्याची उचल न झाल्याने हळूहळू सिंधुदुर्गात प्रश्न जटील बनला असून त्यावर राजकारण पेटले आहे. पंधरा दिवसांत यावर उपाय काढू असे सांगणाऱ्या पालकमंत्र्यांनी पुढे कोणतीच हालचाल केली नाही. भाड्याची गोदामे घेण्यात येतील, असेही सांगण्यात आले होते. मात्र, तसाही प्रयत्न झाला नाही. आता पावसाळा तोंडावर आला असून शेतकऱ्यांना खुल्या बाजारात पड्या भावाने भात विकण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.भातसाठ्याची प्रक्रियाआॅक्टोबर महिन्यापासून खरेदी-विक्री संघात शेतकऱ्यांकडून भात खरेदी केली जाते. त्यानंतर भरडाईसाठीची निविदा काढली जाते. बॅँक गॅरंटी, करारनामा आदी पूर्तता करून बॅँक गॅरंटीएवढे भात मिलरला दिले जाते. भात भरडाई झाल्यानंतर तयार झालेला तांदूळ भारतीय अन्न महामंडळाकडे तपासणीसाठी जातो. तेथे तांदळाला मान्यता मिळाल्यानंतर जिल्हा पुरवठा विभागाच्या मान्यतेने तो तांदूळ जमा केला जातो. तेवढ्याच रकमेचा भात परत मिलिंगसाठी दिला जातो. देवगड तालुक्यात खरेदी देवगड तालुक्यात मूळात भात खरेदी कमी झाली होती. त्यामुळे तेथे जागा शिल्लक होती. त्यामुळे यावेळी देवगडमध्ये ४७२ क्विंटल भात खरेदी झाली आहे. मात्र, आता तेथेही क्षमता संपल्याने भात खरेदी थांबणार आहे. १३१० चा दर ९०० रूपयांवर२०१३-१४ मध्ये भाताचा दर १३१० रूपये होता. मात्र, एफसीआयकडून नाकारण्याचा प्रकार झाल्यानंतर मिलरकडून भाताची उचल बंद झाली. साठलेले भात आता खराब झाले आहे. कोणीही उचल करत नसल्याने शासनाने ९०० रूपयांवर दर आणून ठेवला आहे. आता शासनाने ई-टेंडर काढून भात उचल करण्याचा प्रयत्न चालवला आहे.एफसीआयकडून नाकारलाआॅक्टोबर २०१३ मधील घेण्यात आलेला भात भरडाई केल्यानंतर तुकडा जास्त पडतो या कारणास्तव भारतीय अन्न महामंडळाकडून नाकारण्यात आला. पूर्ण कोकण पट्ट्यात सुमारे ४ ते ५ लाख क्विंटल भात खरेदी-विक्री संघ आणि मिलरकडे पडून आहे. सिंधुदुर्गातील २० गोदामांमध्ये मिळून सुमारे २४ हजार क्विंटल भात पडून आहे. भातसाठ्याने खत ठेवायला जागा अपुरीआॅक्टोबर पासून पहिले तीन महिने भात खरेदी करून ठिकठिकाणच्या खरेदी-विक्री संघांच्या गोदामांमध्ये साठवण केली जाते. त्यानंतर मिलरकडून पुढील तीन महिन्यात भात उचल होत असल्याने पावसाळ्याच्या तोंडावर आलेले खत ठेवण्यासाठी जागा होते. मात्र, आता भातसाठ्याचा प्रश्न निकाली न निघाल्याने खत ठेवायला जागा नाही, अशी स्थिती आली आहे. जिल्हातील गोदामांमध्ये ५० ते १५० मेट्रिक टन एवढीच जागा आहे. जास्त दिवस ठेवल्यास तुकडा आता खरेदी-विक्री संघाच्या गोदामांमध्ये जमा असलेला भात हा बहुतांश मसुरी, इंद्रायणी, कोमल या जातीचा आहे. वेळच्या वेळी भातावर प्रक्रिया करून तांदूळ केल्यास भाताचा तुकडा पडत नाही. परंतु जास्त दिवस भात तसेच पडून राहिल्यानंतर प्रोसेसिंग केल्यावर तुकडा पडण्याची शक्यता जास्त असते.