शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'व्होट क्रॉसिंग'वर सर्वात मोठा दावा
2
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
3
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
4
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
5
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
6
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
7
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
8
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
9
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
10
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
11
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
12
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
13
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
14
Thane Fraud: पोलिसालाही ‘तो’ शेअर्स महागात, कोट्यवधीचा ऑनलाइन डल्ला
15
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
16
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
17
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
18
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
19
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
20
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या

जिरायती भागाला रोज ४ लाख लिटर पाणी

By admin | Updated: May 19, 2016 01:58 IST

तालुक्यातील जिरायतीभागात पाणीप्रश्न गंभीर झाला आहे.

बारामती : तालुक्यातील जिरायतीभागात पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. या भागातील पाण्याचे स्रोत पूर्णत: संपल्याने पाण्याचे नियोजन करणे प्रशासनासाठी अवघड बनले आहे. या पार्श्वभूमीवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार बारामती नगरपरिषदेच्या वतीने जिरायती भागातील जवळपास ४० गावांना दररोज १० हजार लिटर याप्रमाणे प्रतिदिन ४ लाख लिटर पाणी पुरविण्यास ५ मे पासून सुरुवात करण्यात आली आहे. बारामती शहरातील नागरिकांच्या पाण्याची गरज भागवून पिण्यासाठीचे शुद्ध पाणी जिरायती भागाला पुरविले जात आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी बारामती नगर परिषदेच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याबाबत पत्र दिले होते. जिरायतभागात पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी नगर परिषदेने लक्ष देण्याची सूचना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. जिरायत भागातील पाण्याची भयंकर स्थिती लक्षात घेऊन जगताप यांनी शहरात होणारा पाणीपुरवठा, उपलब्ध पाणीसाठा आणि भविष्यातील पाण्याचे नियोजन याबाबत मुख्याधिकारी नीलेश देशमुख व संबंधित विभागप्रमुखांशी चर्चा केली. त्यानुसार शहराची पाण्याची गरज भागवून जवळपास प्रतिदिन ४ लाख लिटर पाणी देणो शक्य असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे जिरायतभागाला दररोज ४ लाख लिटर पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यातून जवळपास १० गावांना दररोज १० हजार लिटर पाणी उपलब्ध होऊ लागले आहे. बारामती शहरात ४० दिवस पाणी पुरेल इतके पाणी साठविण्यासाठी दोन तलाव उपलब्ध झाले आहेत. सद्य:स्थितीत हे तलाव भरलेले आहेत. येणाऱ्या १ जूनला धरणातून पिण्यासाठी पाण्याचे आवर्तन सुटणार असल्याने उपलब्ध पाण्यात शहराची गरज भागवून जिरायत भागाला पाणीपुरवठा करणे शक्य झालेले आहे. जिरायतभागाला शुद्ध पाण्याचा पुरवठा होऊ लागल्याने येथील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.दरम्यान, बारामती नगर परिषदेच्या वतीने अवचट इस्टेट येथील वॉटर स्टँड पोस्ट येथून पाण्याचे टँकर पाठविले जातात. या ठिकाणी आज नगराध्यक्ष योगेश जगताप यांच्यासह सभापती करण खलाटे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, पाणीपुरवठा सभापती शैलेश बगाडे, उपसभापती दत्तात्रय लोंढे, सतीश तावरे, बाळासाहेब पाटील, राजेंद्र खराडे, संभाजी माने, महादेव सूर्यवंशी, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख विजय सूर्यवंशी यांनी भेट दिली. (वार्ताहर)नियोजनामुळे बारामती शहर पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनले आहे. शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी दोन साठवण तलाव उपलब्ध झाले आहेत. त्यानुसार नगर परिषदेच्या प्रशासनाच्या सहकार्याने जिरायतभागाला दररोज ४ लाख लिटर पाणी पुरविले जात असल्याचे नगराध्यक्ष योगेश जगताप यांनी सांगितले. जिरायतभागाला पाणीपुरवठा करताना शहरात कोणतीही पाणीकपात केलेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.