शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

जिरायती भागाला रोज ४ लाख लिटर पाणी

By admin | Updated: May 19, 2016 01:58 IST

तालुक्यातील जिरायतीभागात पाणीप्रश्न गंभीर झाला आहे.

बारामती : तालुक्यातील जिरायतीभागात पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. या भागातील पाण्याचे स्रोत पूर्णत: संपल्याने पाण्याचे नियोजन करणे प्रशासनासाठी अवघड बनले आहे. या पार्श्वभूमीवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार बारामती नगरपरिषदेच्या वतीने जिरायती भागातील जवळपास ४० गावांना दररोज १० हजार लिटर याप्रमाणे प्रतिदिन ४ लाख लिटर पाणी पुरविण्यास ५ मे पासून सुरुवात करण्यात आली आहे. बारामती शहरातील नागरिकांच्या पाण्याची गरज भागवून पिण्यासाठीचे शुद्ध पाणी जिरायती भागाला पुरविले जात आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी बारामती नगर परिषदेच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याबाबत पत्र दिले होते. जिरायतभागात पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी नगर परिषदेने लक्ष देण्याची सूचना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. जिरायत भागातील पाण्याची भयंकर स्थिती लक्षात घेऊन जगताप यांनी शहरात होणारा पाणीपुरवठा, उपलब्ध पाणीसाठा आणि भविष्यातील पाण्याचे नियोजन याबाबत मुख्याधिकारी नीलेश देशमुख व संबंधित विभागप्रमुखांशी चर्चा केली. त्यानुसार शहराची पाण्याची गरज भागवून जवळपास प्रतिदिन ४ लाख लिटर पाणी देणो शक्य असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे जिरायतभागाला दररोज ४ लाख लिटर पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यातून जवळपास १० गावांना दररोज १० हजार लिटर पाणी उपलब्ध होऊ लागले आहे. बारामती शहरात ४० दिवस पाणी पुरेल इतके पाणी साठविण्यासाठी दोन तलाव उपलब्ध झाले आहेत. सद्य:स्थितीत हे तलाव भरलेले आहेत. येणाऱ्या १ जूनला धरणातून पिण्यासाठी पाण्याचे आवर्तन सुटणार असल्याने उपलब्ध पाण्यात शहराची गरज भागवून जिरायत भागाला पाणीपुरवठा करणे शक्य झालेले आहे. जिरायतभागाला शुद्ध पाण्याचा पुरवठा होऊ लागल्याने येथील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.दरम्यान, बारामती नगर परिषदेच्या वतीने अवचट इस्टेट येथील वॉटर स्टँड पोस्ट येथून पाण्याचे टँकर पाठविले जातात. या ठिकाणी आज नगराध्यक्ष योगेश जगताप यांच्यासह सभापती करण खलाटे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, पाणीपुरवठा सभापती शैलेश बगाडे, उपसभापती दत्तात्रय लोंढे, सतीश तावरे, बाळासाहेब पाटील, राजेंद्र खराडे, संभाजी माने, महादेव सूर्यवंशी, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख विजय सूर्यवंशी यांनी भेट दिली. (वार्ताहर)नियोजनामुळे बारामती शहर पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनले आहे. शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी दोन साठवण तलाव उपलब्ध झाले आहेत. त्यानुसार नगर परिषदेच्या प्रशासनाच्या सहकार्याने जिरायतभागाला दररोज ४ लाख लिटर पाणी पुरविले जात असल्याचे नगराध्यक्ष योगेश जगताप यांनी सांगितले. जिरायतभागाला पाणीपुरवठा करताना शहरात कोणतीही पाणीकपात केलेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.