शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

मराठवाड्यात ४ शेतकऱ्यांची आत्महत्या

By admin | Updated: October 5, 2015 03:06 IST

कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून मराठवाड्यात चार शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. उस्मानाबाद जिल्ह्णातील वाशी येथील महादेव वसंत सांडसे (३५) यांना गोलेगाव शिवारात

औरंगाबाद : कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून मराठवाड्यात चार शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. उस्मानाबाद जिल्ह्णातील वाशी येथील महादेव वसंत सांडसे (३५) यांना गोलेगाव शिवारात चार एकर शेती आहे़ महादेव सांडसे यांच्या डोक्यावर खासगी सावकाराचे कर्ज होते़ सततची नापिकी आणि खासगी सावकाराकडून पैशासाठी होणारा तगादा याला कंटाळून सांडसे यांनी रविवारी सकाळी शेतात गळफास लावून आत्महत्या केली़तुळजापूर तालुक्यातील काटी येथील बाळासाहेब एकनाथ घाणे यांना गावच्या शिवारात साडेतीन एकर जमीन आहे. खरीप हंगामात त्यांनी मूग, उडीद बियाणाची पेरणी केली होती. पावसाने दडी मारल्याने उगवलेलेपीक जागेवर करपून गेले. त्यामुळे शनिवारी रात्री बाळासाहेब घाणे हे शेतातील गोठ्यावर झोपायला गेले होते. तेथेच त्यांनी गळफास लावून घेतला.हिंगोली तालुक्यातील पांगरी (बाळसखा) येथील ३५ वर्षीय विष्णू महादजी लिंबोळे यांनी शनिवारी आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीते ‘मी जीवनाला कंटाळून आत्महत्या करीत आहे’ असा मजकूर लिहिलेला असल्याचे पोलिसांनी सांगितले. मानवत तालुक्यातील सोमठाणा येथील अमृत विश्वनाथराव निर्वळ (४०) यांनी शनिवारी सततच्या नापिकी व कर्जबाजारीपणास कंटाळून खदानीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. त्यांना १ हेक्टर शेती आहे़ शेतीवर वडिलांनी घेतलेले कर्ज आहे़ (प्रतिनिधी)