शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

किनाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ३९८ कोटी

By admin | Updated: February 5, 2016 02:57 IST

जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने, राज्यातील मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या पाच किनारी जिल्ह्यांत ३९८ कोटींचा ‘राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प’ राबविण्यात येणार आहे

जयंत धुळप, अलिबागजागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने, राज्यातील मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या पाच किनारी जिल्ह्यांत ३९८ कोटींचा ‘राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प’ राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिल्यावर तत्काळ यंत्रणा कामाला लागली आहे. रायगड जिल्ह्यात या प्रकल्पांतर्गत प्रस्तावित चक्रीवादळ निवारा केंद्र, समुद्र उधाण प्रतिबंधक खार बांधबंदिस्ती आणि अलिबाग शहरातील भूमिगत वीज वाहिनींच्या अंतिम मंजुरीपूर्वी पाहणीसाठी जागतिक बँकेचे शिष्टमंडळ रविवार, ७ फेब्रुवारीला रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याची माहिती रायगडचे निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल यांनी दिली आहे.जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने किनारी भागातील पाच जिल्ह्यात होणाऱ्या या प्रकल्पात, राज्य शासनाचा २५ टक्के तर केंद्र शासनाचा ७५ टक्के हिस्सा राहील. राज्याच्या हिश्शाचे ८४ कोटी येत्या पाच वर्षांत उपलब्ध करून होणार आहेत. प्रकल्पातील भाग ‘अ’ आणि ‘ड’ साठी केंदाकडून १०० टक्के म्हणजे ५८ कोटी ९५ लाख रु पये प्राप्त होणार आहेत. तर भाग ‘ब’ साठी केंद्राकडून ७५ टक्के म्हणजे २५५ कोटी प्राप्त होणार आहे.भरतीचे पाणी भातशेतीत जावून शेती नापीक होऊ नये याकरिता खारलॅन्ड विभागाच्या माध्यमातून समुद्र भरती संरक्षक बांधबंदिस्तीचे काम करण्यात येते. परंतु गेल्या काही वर्षांपासून शासकीय निधी न मिळाल्याने तसेच अन्य कारणास्तव या खारबांधबंदिस्तीची कामे झाली नाहीत. परिणामी जिल्ह्यातील शेकडो एकर शेती नापीक झाली. आता राष्ट्रीय चक्र ीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत या खारबांध बंदिस्तीची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. या अंतर्गत श्रीवर्धन तालुक्यातील कार्ले तर अलिबागमधील फणसापूर, काचळी व पिटकरी या चार गावांची पाहणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यात खारबांधबंदिस्तीसाठी सुमारे १०० कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे. दरम्यान, जागतिक बँकेच्या राज्यस्तरीय तज्ज्ञ शिष्टमंडळाने गेल्या महिन्यातच या सर्व प्रस्तावित कामांची पाहणी करुन आपला अहवाल सादर केला आहे.