शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

किनाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ३९८ कोटी

By admin | Updated: February 5, 2016 02:57 IST

जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने, राज्यातील मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या पाच किनारी जिल्ह्यांत ३९८ कोटींचा ‘राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प’ राबविण्यात येणार आहे

जयंत धुळप, अलिबागजागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने, राज्यातील मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या पाच किनारी जिल्ह्यांत ३९८ कोटींचा ‘राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प’ राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिल्यावर तत्काळ यंत्रणा कामाला लागली आहे. रायगड जिल्ह्यात या प्रकल्पांतर्गत प्रस्तावित चक्रीवादळ निवारा केंद्र, समुद्र उधाण प्रतिबंधक खार बांधबंदिस्ती आणि अलिबाग शहरातील भूमिगत वीज वाहिनींच्या अंतिम मंजुरीपूर्वी पाहणीसाठी जागतिक बँकेचे शिष्टमंडळ रविवार, ७ फेब्रुवारीला रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याची माहिती रायगडचे निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल यांनी दिली आहे.जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने किनारी भागातील पाच जिल्ह्यात होणाऱ्या या प्रकल्पात, राज्य शासनाचा २५ टक्के तर केंद्र शासनाचा ७५ टक्के हिस्सा राहील. राज्याच्या हिश्शाचे ८४ कोटी येत्या पाच वर्षांत उपलब्ध करून होणार आहेत. प्रकल्पातील भाग ‘अ’ आणि ‘ड’ साठी केंदाकडून १०० टक्के म्हणजे ५८ कोटी ९५ लाख रु पये प्राप्त होणार आहेत. तर भाग ‘ब’ साठी केंद्राकडून ७५ टक्के म्हणजे २५५ कोटी प्राप्त होणार आहे.भरतीचे पाणी भातशेतीत जावून शेती नापीक होऊ नये याकरिता खारलॅन्ड विभागाच्या माध्यमातून समुद्र भरती संरक्षक बांधबंदिस्तीचे काम करण्यात येते. परंतु गेल्या काही वर्षांपासून शासकीय निधी न मिळाल्याने तसेच अन्य कारणास्तव या खारबांधबंदिस्तीची कामे झाली नाहीत. परिणामी जिल्ह्यातील शेकडो एकर शेती नापीक झाली. आता राष्ट्रीय चक्र ीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत या खारबांध बंदिस्तीची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. या अंतर्गत श्रीवर्धन तालुक्यातील कार्ले तर अलिबागमधील फणसापूर, काचळी व पिटकरी या चार गावांची पाहणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यात खारबांधबंदिस्तीसाठी सुमारे १०० कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे. दरम्यान, जागतिक बँकेच्या राज्यस्तरीय तज्ज्ञ शिष्टमंडळाने गेल्या महिन्यातच या सर्व प्रस्तावित कामांची पाहणी करुन आपला अहवाल सादर केला आहे.