शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
3
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
4
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
5
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
6
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
7
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
8
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
9
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
10
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
11
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
12
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
13
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
14
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
15
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
16
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
18
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
19
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
20
'आता मतदार काय ते ठरवतील', विरोध करूनही दिलीप मानेना प्रवेश, सुभाष देशमुखांचा भाजपला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

किटकजन्य आजाराने घेतले दोन वर्षात ३८१ बळी

By admin | Updated: May 30, 2015 01:59 IST

वर्षभरात रुग्णसंख्येत वाढ : दोन वर्षात १ लाख ९७ हजार बाधित.

बुलडाणा : गत दोन वर्षांमध्ये किटकजन्य आजाराने राज्यभरात ३८१ रूग्णांना जीव गमवावा लागला. गतवर्षी किटकजन्य आजाराचे ८८ हजार रुग्ण राज्यात होते. यावर्षी रुग्णांची संख्या वाढून एक लाखाच्यावर गेली आहे. हिवताप, हत्तीरोग, मेंदुज्वर, डेंग्यूताप, चिकुनगुनीया, चंडिपुरा आदी किटकजन्य आजारांमुळे राज्यभरात दोन वर्षात ३८१ लोकांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे २0१४ आणि २0१५ या दोन वर्षात किटकजन्य आजाराची लागण झालेले १ लाख ९७ हजार रुग्ण राज्यात आढळून आले असल्याची माहिती राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या अहवालातून पुढे आली आहे. दरवर्षी पावसाळ्यात किटकजन्य आजाराने शहरी भागासह ग्रामीण जनता त्रस्त होते. किटकजन्य आजारांमुळे निर्माण होणार्‍या धोक्याकडे लक्ष वेधण्यासाठी आणि त्याचा समूळ नायनाट करण्यासाठी शासन, स्थानिक आरोग्य प्रशासन यांच्या समन्वयातून पावसाळ्यापूर्वी जून ते ऑगस्टदरम्यान विशेष स्वच्छता व जनजागृती कार्यक्रम राज्यभरात राबविण्यात येतात; मात्र या योजना राबविणार्‍या स्थानिक आरोग्य यंत्रणेमध्ये अद्यापही बरीच पदे रिक्त आहे. याशिवाय आरोग्य योजनासाठी मिळणारा निधी अपुरा पडत असल्यामुळे योजनांची अंमलबजावणी करण्याकडे दुर्लक्ष होत असून, त्यामुळेही किटकजन्य व विषाणूजन्य रुग्णांच्या संख्येत वाढत होत आहे.

*डेंग्यूचे रुग्ण सर्वाधिक

         २0१४-१५ या वर्षात ऑगस्टपासून डिसेंबरपर्यंत डेंग्यूसदृश्य तापाने राज्यभरात थैमान घातले होते. डेंग्यू पसरविणार्‍या एडिस एजिप्टाय डासाने संपूर्ण राज्याला डेंग्यूच्या विळख्यात ओढले आणि राज्यातील १२२ रुग्णाला मृत्यूच्या दारापयर्ंत नेऊन पोहोचवीले. ५८ हजार ५९४ नागरिक डेंग्यूने बाधीत झाले होते. तर २0१३-१४ या वर्षात डेंग्यूमुळे १२६ लोकांचा मृत्यू झाला,४१ हजार ६२२ लोक बाधीत झाले होते.