शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

किटकजन्य आजाराने घेतले दोन वर्षात ३८१ बळी

By admin | Updated: May 30, 2015 01:59 IST

वर्षभरात रुग्णसंख्येत वाढ : दोन वर्षात १ लाख ९७ हजार बाधित.

बुलडाणा : गत दोन वर्षांमध्ये किटकजन्य आजाराने राज्यभरात ३८१ रूग्णांना जीव गमवावा लागला. गतवर्षी किटकजन्य आजाराचे ८८ हजार रुग्ण राज्यात होते. यावर्षी रुग्णांची संख्या वाढून एक लाखाच्यावर गेली आहे. हिवताप, हत्तीरोग, मेंदुज्वर, डेंग्यूताप, चिकुनगुनीया, चंडिपुरा आदी किटकजन्य आजारांमुळे राज्यभरात दोन वर्षात ३८१ लोकांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे २0१४ आणि २0१५ या दोन वर्षात किटकजन्य आजाराची लागण झालेले १ लाख ९७ हजार रुग्ण राज्यात आढळून आले असल्याची माहिती राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या अहवालातून पुढे आली आहे. दरवर्षी पावसाळ्यात किटकजन्य आजाराने शहरी भागासह ग्रामीण जनता त्रस्त होते. किटकजन्य आजारांमुळे निर्माण होणार्‍या धोक्याकडे लक्ष वेधण्यासाठी आणि त्याचा समूळ नायनाट करण्यासाठी शासन, स्थानिक आरोग्य प्रशासन यांच्या समन्वयातून पावसाळ्यापूर्वी जून ते ऑगस्टदरम्यान विशेष स्वच्छता व जनजागृती कार्यक्रम राज्यभरात राबविण्यात येतात; मात्र या योजना राबविणार्‍या स्थानिक आरोग्य यंत्रणेमध्ये अद्यापही बरीच पदे रिक्त आहे. याशिवाय आरोग्य योजनासाठी मिळणारा निधी अपुरा पडत असल्यामुळे योजनांची अंमलबजावणी करण्याकडे दुर्लक्ष होत असून, त्यामुळेही किटकजन्य व विषाणूजन्य रुग्णांच्या संख्येत वाढत होत आहे.

*डेंग्यूचे रुग्ण सर्वाधिक

         २0१४-१५ या वर्षात ऑगस्टपासून डिसेंबरपर्यंत डेंग्यूसदृश्य तापाने राज्यभरात थैमान घातले होते. डेंग्यू पसरविणार्‍या एडिस एजिप्टाय डासाने संपूर्ण राज्याला डेंग्यूच्या विळख्यात ओढले आणि राज्यातील १२२ रुग्णाला मृत्यूच्या दारापयर्ंत नेऊन पोहोचवीले. ५८ हजार ५९४ नागरिक डेंग्यूने बाधीत झाले होते. तर २0१३-१४ या वर्षात डेंग्यूमुळे १२६ लोकांचा मृत्यू झाला,४१ हजार ६२२ लोक बाधीत झाले होते.