शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

३८० कुटुंबांचे होणार पुनर्वसन

By admin | Updated: August 15, 2016 00:59 IST

नदीकाठच्या ३८० कुटुंबांचे बीएसयूपी योजनेअंतर्गत महापालिकेच्या वतीने स्थलांतर करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे

पुणे : मंगळवार पेठेतील जुना बाजाराच्या मागे नदीकाठच्या ३८० कुटुंबांचे बीएसयूपी योजनेअंतर्गत महापालिकेच्या वतीने स्थलांतर करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या कुटुंबीयांना घरे देण्यासाठी महापालिकेच्या वतीने शुक्रवारी, १९ आॅगस्ट रोजी सुनावणीचे आयोजन केले आहे. त्यांच्याकडील कागदपत्रांची छाननी करून त्यांना हडपसर येथे मालकी हक्काच्या घरांचा ताबा दिला जाणार आहे.जुन्या बाजाराच्या मागील बाजूस नदीकाठी राहत असलेल्या ३८० कुटुंबांना पावसाळ््यामध्ये मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतो. खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानंतर त्यांच्या घरांमध्ये पाणी जात असे. सर्व सामान घरात सोडून त्यांना महापालिकेतील शाळेचा आसरा घ्यावा लागत असे. या कुटुंबांचे बीएसयूपी योजनेअंतर्गत स्थलांतर करण्याचा प्रस्ताव नगरसेवक अजय तायडे यांनी डिसेंबर २०१५ मध्ये प्रशासनासमोर ठेवला. मात्र, अनेक दिवसांपासून या प्रस्तावावर कार्यवाहीच झाली नव्हती. अखेर या कुटुंबांचे पुनर्वसन करण्यासाठी येत्या शुक्रवारी, १९ आॅगस्ट रोजी सुनावणी घेण्याची जाहिरात महापालिका प्रशासनाकडून प्रकाशित करण्यात आली आहे. संबंधित कुटुंबांना पालिकेच्या वतीने नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नदीपात्रात अतिक्रमण करून घरे बांधण्यात आली असल्याने या कुटुंबांना महापालिकेच्या वतीने ड्रेनेज, पाणी या कोणत्याही मूलभूत सुविधा पुरता येत नव्हत्या. त्यामुळे त्यांना प्रचंड अडचणींचा सामना या कुटुंबांना करावा लागत होता. हडपसर येथे महापालिकेने बांधलेल्या घरांमध्ये या कुटुंबांचे स्थलांतर होणार आहे. जुन्या बाजारात परिसरातील नदीपात्रातील मोठी जागा प्रशासनाला मोकळी मिळणार आहे. कुटुंबांचे स्थलांतर करण्याच्या प्रस्तावास तत्कालीन अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी मंजुरी दिली होती. (प्रतिनिधी)>अतिक्रमणास अटकाव : मोकळ््या झालेल्या जागेत संरक्षक भिंतनदीकाठच्या ३८० कुटुंबांचे स्थलांतर झाल्यानंतर मोठी जागा मोकळी होणार आहे. जुना बाजारचा नदीकाठ यामुळे मोकळा घेणार आहे. या ठिकाणी लगेच महापालिकेकडून संरक्षक भिंत बांधली जाणार आहे. बीएसयूपी योजनेंतर्गत स्थलांतर करण्याच्या प्रस्तावामध्ये संरक्षक भिंत बांधण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे पुन्हा या ठिकाणी अतिक्रमण होऊ शकणार नाही.जुन्या बाजारातील आपले मतदारांचे स्थलांतर होईल, या भीतीपोटी काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून कुटुंबांच्या पुनर्वसनामध्ये खोडा घातला जात होता. जुन्या बाजारातच तुम्हाला झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवून घरे देऊ, अशी आश्वासने दिली जात होती. मात्र हा परिसर नदीपात्रातील असल्याने कायद्यातीन तरतुदीनुसार येथे झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविणे शक्य नव्हते. येथील नागरिकांना याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी स्थलांतरास तयारी दर्शविली आहे. हडपसर येथील महापालिकेच्या इमारतीमध्ये स्थलांतरित होणाऱ्या या कुटुंबांचा राहणीमानाचा दर्जा यामुळे सुधारणार आहे. त्यांना चांगल्या आरोग्याच्या सुविधा मिळणार आहेत. झोपडपट्टीमध्ये नदीकाठी त्यांना अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये राहावे लागत होते. त्यापासून त्यांची सुटका होणार आहे.