शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

नाशिक विभागात ३७ कोटींचा घोटाळा

By admin | Updated: May 13, 2017 02:21 IST

ठाणे, अमरावती, नागपूरपाठोपाठ नाशिकमध्येही आदिवासी योजनांमध्ये मोठा घोटाळा झाला आहे. नाशिक विभागातील नाशिक, कळवळ, राजूर, तळोदा, नंदुरबार व यावल

दीप्ती देशमुख । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ठाणे, अमरावती, नागपूरपाठोपाठ नाशिकमध्येही आदिवासी योजनांमध्ये मोठा घोटाळा झाला आहे. नाशिक विभागातील नाशिक, कळवळ, राजूर, तळोदा, नंदुरबार व यावल या सहा प्रकल्प अधिकाऱ्यांनी एकूण ३७ कोटी २५ लाख २३ हजार ८०० रुपयांचा घोटाळा केला आहे. तसेच काही योजनांमध्ये करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांची चौकशी सुरू असल्याचे एम. जी. गायकवाड समितीने अहवालात म्हटले आहे.नाशिकमध्ये ‘कन्यादान’ योजनेअंतर्गत ८०० विवाह झाल्याचा दावा प्रकल्प अधिकाऱ्यांनी केला होता. लाभार्थ्यांची खोटी यादी दाखवून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला. सीबीआय चौकशी सुरू आहे. त्याशिवाय यावल येथे दुभती जनावरे खरेदी-वाटप प्रकणात २ कोटी ४३ लाख ५३ हजार रुपयांचा घोटाळा झाला. त्याच्या चौकशीची शिफारस समितीने केली आहे. कळवण प्रकल्प अधिकाऱ्यांनीही दुभती जनावरे वाटपाबाबत खोटी कागदपत्रे बनवून १४ कोटी ५७ लाख १६ हजार ३८० रुपये लाटले. त्याचीही सीबीआय चौकशी सुरू असल्याने समितीने त्यावर मत नोंदवण्यास नकार दिला. अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपये हडपून संबंधित संस्थांनाही त्याचा लाभ दिला आहे. वस्तू खरेदी करताना ठराविक कंत्राटदारांनाच वारंवार कंत्राट दिले आहे. निविदा प्रक्रियेला बगल देत प्रकल्प अधिकाऱ्यांनी मनमानी कारभार केला.नाशिकच्या बहिराम मोतीराम यांनी अ‍ॅड. राजेंद्र रघुवंशी यांच्यामार्फत उच्च न्यायालयात जनहित याचिका केली आहे. त्यावरील सुनावणीत राज्य सरकारने या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. एम. जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. समितीने काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयात अहवाल सादर केला आहे. (समाप्त) सहा प्रकल्प विभागांचा समावेश२००४ ते २००९ या कालावधीत नाशिकमध्ये ६ कोटी ३२ लाख ९६ हजार ८७२ रुपये, कळवण २ कोटी ८२ लाख २७ हजार ८८१, राजूर २ कोटी ९९ लाख ७१ हजार ४९० रुपये, नंदुरबार ६ कोटी ८२ लाख २ हजार ७१०, यावल २ कोटी २४ लाख ६८ हजार ८१६ रुपये तर तळोदाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी १६ कोटी ३ लाख, ५६ हजार ३१ रुपयांचा घोटाळा केला आहे.