शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
6
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
7
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
8
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
9
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
10
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
11
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
12
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
13
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
14
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
15
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
16
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
17
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
18
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
19
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
20
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ

जिल्ह्यातील ३६७ तलाठी बेमुदत संपावर

By admin | Updated: April 27, 2016 03:29 IST

रायगड जिल्ह्यातील १५ तहसील कार्यालयांतर्गत कार्यरत एकूण ३७० तलाठी व ५७ मंडळ अधिकारी असे सर्व मंगळवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत.

अलिबाग: रायगड जिल्ह्यातील १५ तहसील कार्यालयांतर्गत कार्यरत एकूण ३७० तलाठी व ५७ मंडळ अधिकारी असे सर्व मंगळवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. परिणामी जनसामान्यांच्या विविध कामांचा पहिल्या दिवसापासूनच मोठा खोळंबा झाल्याचे सर्वत्र पहायला मिळाले.गेल्या ८ जानेवारी २0१६ पासून, महाराष्ट्र शासनाच्या महसूल खात्याने सर्वसामान्य जनतेशी संबंधित अशा सातबारा उतारे, फेरफार नोंदी, आदि महत्वाच्या दस्तऐवजांकरिता आॅनलाइन प्रणाली सक्तीची करुन, पूर्वीचे हाती नोंदी घालण्याची पद्धत रद्दबातल केली. यामुळे सध्या जनतेला अनंत अडचणींना सामोरे जावे लागत असून, सर्वत्र तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयात प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे महसुली कामकाजावर विपरीत परिणाम झाला आहे. अनेकांची महत्वाची कामे अडून राहिली असल्याने, पूर्वीप्रमाणे तलाठ्यांनी हाती नोंदी घालणे, सातबारा देणे सुरु ठेवावे तसेच सरकारी संगणकांच्या सर्व्हरची क्षमता वाढवून जनसामान्यांची ही समस्या लवकरात लवकर दूर करावी अशी मागणी करणारे निवेदन सामाजिक कार्यकर्ते दिलीप जोग यांनी अलिबाग तहसीलदार कार्यालय, रायगड जिल्हाधिकारी कार्यालय यांना देवून त्याच्या प्रती राज्याचे महसूलमंत्री तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविल्या आहेत.गेल्या सुमारे दोन वर्षापूर्वी या आॅनलाइन प्रणालीचे कामकाज सुरु झाले व एलएमएस प्रणालीद्वारे महसुली नोंदींचा डेटा तयार करण्याच्या कामास सुरुवात झाली. त्यातच तलाठी आॅफिसला प्रिंटर नसणे, इंटरनेट कनेक्टीव्हीटी नसणे, कित्येकदा लाइट नसणे, त्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यास तांत्रिक सहाय्यक नसणे अशा अनेक अडचणी तेव्हापासून आजही असल्याचे जोग यांनी सांगितले.