शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
2
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
3
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
4
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
5
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
6
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
7
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
8
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
9
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
10
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
11
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
12
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
13
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
14
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
15
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
16
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
17
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
18
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
19
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
20
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!

विभागात ३५२ टँकर सुरू

By admin | Updated: April 30, 2016 01:41 IST

उन्हाच्या वाढत्या झळांनी लोकांच्या तोंडचे पाणी पळविले असून, तब्बल सात लाख ५२ हजार ८८५ पेक्षा अधिक जनतेला पाणी टंचाईच्या झळा

पुणे : उन्हाच्या वाढत्या झळांनी लोकांच्या तोंडचे पाणी पळविले असून, तब्बल सात लाख ५२ हजार ८८५ पेक्षा अधिक जनतेला पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. उन्हाचा कडाका असाच कायम राहिल्यास टँकरची संख्या ५०० पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.यंदा विभागात सरासरी केवळ ७० ते ८० टक्के पाऊस झाल्याने उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता व्यक्त केली होती. तो आता खरा ठरत असून, एप्रिल महिन्यातच विभागात ३५२ टँकर सुरू असून, ३१२ गावे व तब्बल २ हजार १६३ वाड्यावस्त्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. टँकरची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, मेअखेरपर्यंत टँकरची संख्या ५००च्या पुढे जाण्याची शक्यता आहे. सन २००३-०४मध्ये देखील विभागात गंभीर पाणीटंचाई होती. तीच परिस्थिती यंदा असल्याची चर्चा आहे. एका जत तालुक्यात सध्या ८० टँकर सुरू आहेत. तर माण, बारामती, इंदापूर, पुरंदर आणि दौंड तालुक्यातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. येथे टँकर भरण्याचे पाण्याच्या स्रोतदेखील आटले आहेत. यामुळे येत्या काही दिवसांत पाणी टंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता आहे.>विभागात सर्वाधिक १२६ टँकर सांगली जिल्ह्यात सुरू असून, पुणे १०१, सातारा १०३ आणि सोलापूर जिल्ह्यात २२ टँकर सुरू आहेत. यामध्ये सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात ८०, तासगाव १५, कवठेमहांकाळ ९, सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात ५७, कोरेगाव १०, वाई ४, पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात ३४, इंदापूर २१, पुरंदर १६ आणि दौंड तालुक्यात २३ व जुन्नर तालुक्यात ६ टँकर सुरू आहेत.