शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

३५ उमेदवार कोट्यधीश

By admin | Updated: September 29, 2014 01:06 IST

विधानसभा निवडणुकांमध्ये उपराजधानीत अनेक ‘वजनदार’ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. नागपुरातील ६ मतदारसंघात अर्ज केलेल्या उमेदवारापैकी ३५ जण (२०.७१ टक्के) कोट्यधीश आहेत.

योगेश पांडे -नागपूरविधानसभा निवडणुकांमध्ये उपराजधानीत अनेक ‘वजनदार’ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. नागपुरातील ६ मतदारसंघात अर्ज केलेल्या उमेदवारापैकी ३५ जण (२०.७१ टक्के) कोट्यधीश आहेत. १६९ उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांच्या आधारे ही बाब समोर आली आहे. उमेदवार व कुटुंबीयांची संपत्ती मिळून १३७ जणांची संपत्ती १ लाख ते १ कोटी इतकी आहे. केवळ ३२ (१८.९९ टक्के) उमेदवारांची कौटुंबिक संपत्ती १ लाखाहून कमी आहे. ‘लोकमत’ने सर्व उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्राचे शिक्षण, गुन्हे, वय, अपक्ष या मुद्यांच्या आधारे विश्लेषण केले. ३३ टक्के उमेदवार पदवीधरएकीकडे राजकीय पक्ष तसेच उमेदवारांकडून शिक्षणप्रसार तसेच हायटेक सोयीसुविधांबद्दल मोठमोठी आश्वासने देण्यात येत आहेत. परंतु प्रत्यक्ष दिव्याखाली मात्र अंधारच असल्याचे दिसून येत आहे. अर्ज दाखल केलेल्या १६९ पैकी केवळ ५६ उमेदवार पदवीधर आहे. ९२ उमेदवारांचे शिक्षण तर केवळ बारावीपर्यंतच झाले आहे. ही टक्केवारी चक्क ५४.४४ टक्के इतकी आहे.अर्ध्याहून अधिक उमेदवार ‘तरुण’राजकारणात साधारणत: ४५ च्या खालील उमेदवाराला तरुण म्हणण्यात येते. उपराजधानीतील अनेक पक्षांनी तरुण उमेदवारांना संधी दिली आहे. सहाही मतदारसंघात १६९ पैकी ८८ उमेदवारांचे वय ४५ किंवा त्याहून कमी आहे. ही टक्केवारी ५२.०७ टक्के इतकी आहे. त्यामुळे यंदाचा प्रचारदेखील युवापिढीला केंद्रस्थानी ठेवूनच करण्यात येईल हे निश्चित.अपक्षांचे ‘बल्ले बल्ले’भाजपा-शिवसेना आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही मोठ्या पक्षांत बिघाडी झाल्याने सर्वच मतदारसंघात रंगत वाढली आहे. मोठ्या पक्षांशिवाय स्थानिक पक्षांचे उमेदवार रिंगणात उतरले आहेत. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे ४४.९७ टक्के म्हणजेच ७६ उमेदवार अपक्ष आहेत. यात मोठ्या पक्षांकडून उमेदवारी न मिळालेल्या काही नाराजांचादेखील समावेश आहे.१० टक्के उमेदवारांवर गुन्हेउमेदवारांची छबी पाहून मत देण्याकडे मतदारांचा कल वाढला आहे. नागपुरात अर्ज दाखल केलेल्यांपैकी १८ उमेदवारांवर निरनिराळे गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे मोठ्या पक्षाच्या नामवंत उमेदवारांची संख्याच यात जास्त आहे. अ़नेक उमेदवारांवरील गु्न्हे हे राजकीय आंदोलनांसंदर्भात आहेत व न्यायालयीन खटले सुरू आहेत.