शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

महाडमधील ३४ गावे दरडीच्या छायेत

By admin | Updated: May 21, 2016 03:08 IST

दरडींचा धोका होवू नये यासाठी ३४ गावांमधील सुमारे नऊ हजार ग्रामस्थांना अन्यत्र स्थलांतर करण्याच्या सूचना महसूल विभागामार्फत देण्यात आल्या

महाड : तालुक्यात जुलै २००५ मध्ये अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीत झालेल्या जीवितहानी आणि वित्तहानीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तसेच दरडींचा धोका होवू नये यासाठी ३४ गावांमधील सुमारे नऊ हजार ग्रामस्थांना अन्यत्र स्थलांतर करण्याच्या सूचना महसूल विभागामार्फत देण्यात आल्या आहेत.२००५ च्या नैसर्गिक आपत्तीमध्ये महाड तालुक्यातील दासगांव, जुई, रोहन-वलंग, कोंडीवते या गावावर दरडी कोसळून शेकडो जणांचे बळी गेले होते, तर असंख्य कुटुंबाचे संसार बेघर झाले होते. त्यावेळी प्राईड इंडिया, लालबागचा राजा ट्रस्ट, जनकल्याण ट्रस्ट आदि सेवाभावी संस्थांच्या आर्थिक सहकार्यातून रोहन, जुई, कोंडीवते, दासगाव आदिवासीवाडी येथील दरडग्रस्त कुटुंबांना मोफत घरे देण्यात आली होती. मात्र गेल्या दहा वर्षांपासून तालुक्यातील अनेक गावांना दरडींचा धोका सतावत आहे. भूगर्भ शास्त्रज्ञांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार महाडमधील ३४ गावांना या दरडींचा धोका असल्याचा अहवाल दिला आहे. त्यानुसार दासगाव, नडगाव तर्फे बिरवाडी, रायगडवाडी, मांडले, कोथर्डे, वाकी बुद्रुक, कडसरी, लिंगाणा, सव, चोचिवे,मुठवली, लोअर तुडील, जुई बुद्रुक, कोसबी, कुंबळे, वराठी, खैरे तर्फे तुडील आंबेशिवघर, कुर्लेदंडवाडी, कोथेरी, जंगमवाडी, शिंगरकोड मोरेवाडी, मुमुर्शी, बौध्दवाडी, मुमुर्शी गावठाण, पिंपळकोंड, आंबेनवी, मोहात, सह्याद्रीवाडी (आंबेशिवथर) लोअर तुडील, नामोळी कोंड, पारमाची, माझेरी, आंबीवली पानेरीवाडी, या गावातील २ हजार ५७३ घरांना दरडीचा धोका असून या पार्श्वभूमीवर दोन हजार ५० कुटुंबातील ९ हजार ग्रामस्थांना पावसाळ्यात तीन महिने अन्य ठिकाणी स्थलांतर करावे अशा सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी प्रांताधिकारी सुषमा सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली आपत्कालीन आढावा बैठक डॉ. आंबेडकर सभागृहात घेतली. त्यावेळी महसूल विभागाचे तलाठी, मंडल अधिकारी यांनी सतर्क रहावे अशा सूचना दिल्या आहेत. या बैठकीला तहसीलदार संदीप कदम, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, पोलीस निरीक्षक नितीन जगताप, नायब तहसीलदार सचिन गोसावी आदि विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. महसूल विभागामार्फत दरडग्रस्त गावांतील कुटुंबांना स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी प्रत्यक्षात त्याला स्थानिक ग्रामस्थ किती प्रतिसाद देतात याकडे लक्ष लागलेले आहे. यापैकी अनेक धोकादायक ठिकाणची कुटुंबे आपले घर गाव सोडून अन्यत्र स्थलांतर करण्याच्या मन:स्थितीत नाहीत.>अधिकाऱ्यांना सूचनायंदाच्या हंगामात नेहमीपेक्षा अधिक पर्जन्यवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यातर्फे दिल्यामुळे महसूल यंत्रणेमार्फत विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. दरडग्रस्त गावातील ग्रामस्थांनी दरडींचा धोका टाळण्यासाठी स्वत:हून स्थलांतरित व्हावे. जर ही कुटुंबे स्थलांतरित झाली नाहीत तर त्या कुटुंबाचे जबरदस्तीने स्थलांतर करण्यात येणार असल्याचा इशारा प्रांताधिकारी सुषमा सातपुते यांनी दिला आहे.