शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

पुण्याच्या ३४ गावांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2016 05:38 IST

पुणे महापालिकेभोवतालच्या ३४ गावांचा समावेश पुणे महापालिकेत करण्याबाबत निर्णय घेण्याचा आदेश उच्च न्यायालयाने आॅगस्टमध्ये देऊनही राज्य सरकारने त्याबाबत काहीही निर्णय

मुंबई : पुणे महापालिकेभोवतालच्या ३४ गावांचा समावेश पुणे महापालिकेत करण्याबाबत निर्णय घेण्याचा आदेश उच्च न्यायालयाने आॅगस्टमध्ये देऊनही राज्य सरकारने त्याबाबत काहीही निर्णय न घेताच पुणे महापालिका व जिल्हा परिषदांना प्रारूप प्रभाग रचना करण्याचा आदेश दिला. ३४ गावांचा प्रश्न टांगणीवरच असल्याने महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकीला स्थगिती द्यावी, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने या याचिकेवर राज्य सरकारला दोन आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.भोवतालच्या ३४ गावांचा समावेश पुणे महापालिकेत करण्याबाबत राज्य सरकारने २०१४मध्ये प्रारूप अधिसूचना काढली. परंतु, ही अधिसूचना अंतिम नसल्याने ३४ गावांचा प्रश्न तसाच राहिला. याविरोधात श्रीरंग चव्हाण - पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ही याचिका निकाली काढताना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला २०१४ची अधिसूचना अंतिम करण्याबाबत तीन महिन्यांत निर्णय घेण्याचा आदेश दिला. उच्च न्यायालयाने दिलेली तीन महिन्यांची मुदत संपत आल्याने व त्यातच महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचना करण्यात आल्याने पुण्याचे रहिवासी बाळासाहेब हगवणे यांनी पुणे महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. प्रभागरचना केल्यानंतर राज्य सरकारने संबंधित ३४ गावांचा समावेश पुणे महापालिकेत करण्याचा निर्णय घेतला तर पुन्हा प्रभाग रचनेची प्रक्रिया पार पाडावी लागेल. हेच जिल्हा परिषदांच्या बाबतीत घडेल. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाला निवडणुका पुढे ढकलण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)