शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

राज्यातील 3361 गुरुजींना महिनाभर पगार नाही; आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 05:14 IST

गुरुवारपर्यंत शिक्षकांचे वेतन न काढल्यास २५ जानेवारीपासून राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिक्षकांकडून देण्यात आला आहे. 

मुंबई : अर्धा महिना उलटला तरी डिसेंबरचे वेतन अद्याप न झाल्याने अंशत अनुदानित शाळेतील शिक्षकांनी मंगळवारी शिक्षक आमदारांसोबत मंत्रालयात ठिय्या मांडला. राज्यातील तब्बल ३३६१ शिक्षक अद्याप वेतन न झाल्याने त्यांच्यासमोर बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे गुरुवारपर्यंत शिक्षकांचे वेतन न काढल्यास २५ जानेवारीपासून राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिक्षकांकडून देण्यात आला आहे. राज्यातील अंशत अनुदानित शाळांमधील शिक्षकांना डिसेंबरचे वेतन अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे त्यांची अवस्था बिकट झाली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी कायम विनाअनुदानित शाळा कृती समिती आणि शिक्षक आमदार विक्रम काळे आणि सुधीर तांबे यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिक्षकांचे वेतन काढण्याबाबत होत असलेल्या विलंबाची तक्रार केली. शिक्षकांच्या तक्रारीची दखल घेत शिक्षणमंत्र्यांनी सचिवांना तातडीने सूचना देत आंदोलनाची गरज नसल्याचे सांगितले; मात्र वेतनासंदर्भातील शासन आदेश आजच काढावा, यासाठी आमदार विक्रम काळे व सुधीर तांबे यांनी कृती समितीच्या पदाधिकांसह मंत्रालयातच ठाण मांडून बसले, तसेच टेबल टु टेबल पाठपुरावा करत याच आठवड्यात वेतन खात्यावर जमा होईल, यासाठी प्रयत्न सुरू केले. ‘सेवा संरक्षणाचा निर्णय तत्काळ घ्या’ सेवासंरक्षण हा विषय लालफीतीत अडकल्यासंदर्भातील विचारणाही यावेळी शिक्षकांकडून करण्यात आली असता, फाइल तयार असून, लवकरच निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले. मात्र सेवा संरक्षणाचा निर्णय तत्काळ न झाल्यास २५ जानेवारीपासून राज्यभर अंदोलन करण्याचा इशारा आमदार व शिक्षकांनी यावेळी शिक्षणमंत्र्यांना दिला.यावेळी कृती समितीचे संजय डावरे, धनाजी साळुंखे, पुंडलीक रहाटे, गुलाब पाल यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.